सोमवार, २२ जुलै, २०१३

वेँगुर्ल्यात काढलेली लोकशाहीची धिँड...!

5 डिसेँबर,2011...! याच दिवशी वेँगुर्ल्यात लोकशाहीच्या अधःपतनाची सुरुवात झाली. राजकीय वैमनस्यातुन विलास गावडेंच्या अनुपस्थितीत त्यांची बायका-पोरं घरी असताना नितेश राणेँच्या स्वाभिमान समर्थकांनी  घरावर हल्ला चढवला आणि इतके दिवस राजकीय दहशतीविरोधात लोकांच्या मनात धुमसत असणा-या ज्वालामुखीचा असा काही विस्फोट झाला की वेँगुर्ला नगरपालिकेत काँग्रेस पक्ष औषधालाच शिल्लक राहिला. निवडुन आलेले विरोधी पक्षाचे उमेदवार फार मोठे कर्तुत्ववान नसले तरी ते फक्त काँग्रेसविरोधी आहेत आणि दहशतवादाला खतपाणी घालणा-या काँग्रेसला यावेळी पाडुनच घालायचे, या उग्र भावनेने लोकांनी मतदान केले. फक्त वेँगुर्ल्यातच नव्हे तर सावंतवाडी आणि मालवण नगरपालिकेतही लोकांनी काँग्रेसला अद्दल घडवली. पुढे जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आकडेवारी देऊन सिँधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा सांगली आणि पुणे जिल्ह्यात दहशतवाद कसा जास्त आहे, हे पटवुन देण्याचे आटोकाट प्रयत्न काँग्रेसच्या नेतेमंडळीँनी केले पण दुस-यावर चिखलफेक करुन आपणाला स्वच्छ होता येत नाही, ही मुलभुत गोष्ट ते विसरले. सिँधुदुर्ग जिल्हा सुरुवातीपासुनच सभ्य, सुसंस्क्रुत लोकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे चोरी, दरोडे, बलात्कार यांचे प्रमाण इकडे मुळातच कमी आहे आणि म्हणुनच सांगली किँवा पुण्याशी तुलना करुन सिँधुदुर्गात दहशवाद नाही म्हणणे चुकीचे ठरेल. तुलना दोन समांतर गोष्टीँची होऊ शकते आणि इकडे विषय दहशतवादाचा नाही तर 'राजकीय दहशतवादा'चा आहे. राजकीय नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांच्या क्रुपाशीर्वादाने जो दहशतवाद चालतो त्याला 'राजकीय दहशतवाद' म्हणतात आणि तुलना करायचीच असेल तर मधु दंडवते, नाथ पै यांच्या काळात सिँधुदुर्गात किती राडे किँवा राजकीय हत्या झाल्या आणि आता काँग्रेसच्या काळात किती झाल्या, याची तुलना करा. तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल.

असो, तर वेँगुर्ला नगरपालिकेत लोकांनी धुडकारलेल्या काँग्रेसने, निवडुन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांपैकी, काहीँना हाताशी धरत राष्ट्रवादी काँग्रेसचाच आपल्या मर्जीतील नगराध्यक्ष बसवला. त्यानंतर त्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाची काँग्रेसतर्फे काढलेली शहरातील मिरवणुक म्हणजे काँग्रेसविरोधी मतदान केलेल्या लोकांच्या जखमेवर चोळलेल्या मीठासारखी होती. जनतेने दिलेल्या जनादेशाची, त्यांच्या विरोधी मताची आम्हाला काडीचीही किँमत नाही आणि काँग्रेसविरोधी निवडुन आलेल्या उमेदवारांनाही आम्ही पुढे विकत घेऊन नगरपालिकेची सत्ता हातात घेऊ शकतो, हाच संदेश काँग्रेस वेँगुर्ल्यातील जनतेला, नगराध्यक्षपदाच्या निमित्ताने देत होती. लोकशाहीतील हा किळसवाणा प्रकार लोकशाहीवर मनापासुन श्रद्धा असणा-या बाबु इनामदारांच्या वर्मी लागला आणि भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत इनामदारांनी आपल्या भावना तरुण भारत वर्तमानपत्रात शब्दाद्वारे व्यक्त केल्या. सिँधुदुर्गात लोकशाहीची कत्तलच करु पाहणा-या काँग्रेसला एका सामान्यातील सामान्य माणसाने त्यांच्या पक्षविरोधी बोलणे कदापि मान्य नव्हते. मग काय खड्ड्यात गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ते नागरिकांना बहाल करणारे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान...! अरे हो, आंबेडकरांवरुन दोनच महिन्यांपुर्वी आंबेडकरी विचारांवर व्याख्यान देणा-या आदरणीय नारायण राणे साहेबांची आठवण झाली. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनी राजकरणात घातलेले धुमशान पाहुन आंबेडकरी साहित्याचे सखोल अभ्यासक  असलेले आपले दादा व्यथित होऊन म्हणाले की,

"रिपब्लिकन पक्षाचे राजकरण पाहुन बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा तडफडत असेल."

राणे साहेबांची व्यथा समजण्यासारखी होती आणि त्यात तथ्थ्य होते. राणे साहेब, मग संविधानाची पायमल्ली करत वेँगुर्ल्यातील एका सामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी धिँड पाहुन बाबासाहेब आंबेडकर तडफडत नसतील का...? ज्या काँग्रेस पक्षाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता, तो 125 वर्षाँची परंपरा असलेला महात्मा गांधी, पंडित नेहरु, लालबहादुर शास्त्री, राजीव गांधी अशा कित्येक महापुरुषांचा पक्ष आहे. मग त्याच पक्षाच्या तिकीटावर निवडुन आलेल्या सभापती महोदया सौ. प्रियांका गावडे आपल्या समर्थकांना घेऊन डाँ. प्रभाकर पवारांची अमानुष मारहाण कशी काय करु शकतात...? डाँ. पवार मुजोर आहेत आणि म्हणुनच लोकांच्या सेवेसाठी आम्ही त्यांना मारहाण केली असे स्पष्टीकरण देत काँग्रेसची नेतेमंडळी आपलीच पाठ थोपटुन घेत आहेत. डाँ. पवार मुजोर आहेत का नाहीत हा संशोधनचा विषय आहे. काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीँना कोणी मुजोर आहेत का नाहीत, हे प्रमाणपत्र द्यायचा अधिकार कोणत्या कायद्याने अथवा संविधानाने दिला...? मुळात काँग्रेसचे प्रियांका गावडेँसारखे लोकप्रतिनिधी मुजोर नाहीत, हे कोणी ठरवायचे...? लोकांनी मत देऊन निवडुन दिले म्हणजे पुढची पाच वर्षे कोणालाही मुजोर म्हणत मारझोड करायचा परवाना किँवा आपल्याविरोधी मतप्रदर्शन करणा-याची धिँड काढण्याचा अधिकार या संविधानाने तर आपल्याला नक्कीच दिलेला नाही. बहुतांश वेळा मतांच्या घाणेरड्या राजकरणात जे होते, ते नेहमीच खरे नसते.
काही वेळासाठी राणेसमर्थकांच्या म्हणण्याप्रमाणे डाँ. पवार हे मुजोरच आहेत असे ग्रुहित धरु. अगदी तरीसुद्धा अशा मुजोर वैद्यकीय अधिका-याची वरिष्ठ अधिका-याकडे तक्रार करण्याचा अधिकार सभापतीँना आहे, जनतेचे प्रश्न रेँगाळत ठेवणा-या मुजोर डाँक्टरला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणुन सभापती गावडे प्रयत्नशील राहु शकल्या असत्या, पण समोरचा मुजोर आहे मग लोकप्रतिनिधीही सगळ्या नितीमुल्यांना तिलांजली देत तिथे राडा घालायचा, ही नेमकी कोणती संस्क्रुती...? जुलमी ब्रिटीशांचेही ह्रुदयपरिवर्तन करु पाहणारी महात्मा गांधीची संस्क्रुती काँग्रेसने अंगीकारली आहे.   मग काँग्रेसचेच लोकप्रतिनिधी त्या संस्क्रुतीला हरताळ का फासत आहेत...?
2005 मध्ये जेव्हा शिवसेनेच्या भगव्याला जय महाराष्ट्र करत राणे साहेब गांधीटोपी घालुन काँग्रेसवासी झाले तेव्हा निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसेपाटील म्हणाले होते की, "गांधीटोपी घालुन कोणी महात्मा गांधी होत नसतो." पुढच्या काळात मुळच्या स्वभावाला आवर घालत राणे साहेब काँग्रेसमध्ये ब-यापैकी रुळले पण समर्थकांना 'गांधीटोपी' कधीच मानवली नाही. आता आपल्या राणेसमर्थकांचे बेजबाबदार वर्तन पाहुन गांधीजीँच्या आत्म्याचे स्वर्गात काय हाल होत असतील, याचा विचार राणे साहेबांनी करावा. गांधीजी खुप दुर राहिले पण सिँधुदुर्गची ओळख संपुर्ण देशात बँ.नाथ पै, मधु दंडवते यांसारख्या तत्वांचे पुजारी असलेल्या विद्वान नेत्यांचा मतदारसंघ अशी व्हायची पण आज नाथ पै, दंडवतेँच्याच जिल्ह्यात लोकप्रतिनिधीँनी घातलेला राडा किँवा वेँगुर्ल्यात एका व्रुद्धाची काढलेली धिँड पाहुन त्या दोन महान आत्म्यांचा 'आत्मा' लाखो वेळा मरण पावला असेल.व्रुद्धांचा चरणस्पर्श करुन उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेणारी सिँधुदुर्गाची संस्क्रुती, एका व्यथित व्रुद्धाला धिँड काढण्यापर्यँत कलुषित होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते पण आज काँग्रेसच्या या समाजकंटकांनी 'त्या' संस्क्रुतीचेच धिँडवडे उडवले. धिँड कोण काढतात आणि कशापायी काढतात याची तरी जाणीव त्यांना असायला हवी होती. आपल्या दिवाळखोर वागणुकीमुळे जे समाजासमोवर स्वतःच नागवे झाले आहेत, ते दुस-या कोणाला धिँड काढुन त्याला काय नागव करणार...?
एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा राजकीय आकसापोटी केलेला खुन परवडला कारण समोरची व्यक्ती त्याच क्षणी मरते, निदान पुढील परिणाम भोगण्यासाठी ती जिवंत तरी नसते पण आयुष्यभर आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलेल्या निरपराध व्यक्तीची जेव्हा विनाकारण तुम्ही व्रुद्धापकाळात धिँड काढता, तेव्हा त्या धिँडीतुन होणारी बदनामी त्यापेक्षाही भयानक असते. त्या व्यक्तीचेच नव्हे तर त्याच्या परिवाराचेही तुम्ही मानसिक खच्चीकरण करता. बाबु इनामदारांची धिँड असो किँवा डाँ.प्रभाकर पवारांवरील हल्ला, 'समजुतदारपणा' हा शब्द काँग्रेस कार्यकर्त्याँच्या डिक्शनरीतुन हरवलेला दिसतोय. दमबाजीने प्रश्न कधी सुटत नसतात, उलट ते वाढतात. समजुतदारपणा दाखवल्यानेच प्रश्न सुटु शकतात आणि हा समजुतदारपणा ज्याच्या अंगी आहे, तो जनावरांपेक्षा वेगळा आहे, म्हणुनच त्याला 'माणुस' म्हणतात, या माणुसकीच्या व्याख्येची जाणीव काँग्रेसवाल्यांना करुन देणे निकडीचे बनले आहे. सत्तेच्या धुंदीत मस्त झाल्याने सहजासहजी ती होईल असे वाटत नाही. सामान्य सिँधुदुर्गवासी तोँडातुन चकार शब्द काढला तर आपला देखील 'बाबु इनामदार' होऊन काँग्रेस कार्यकर्ते धिँड काढतील या भितीने बिळात दडुन बसलेत, तथाकथित विद्वांनांनी आपली लेखणी केव्हाचीच गहाण ठेवली आहे. अशा परिस्थितीत आपण माणसांच्या वस्तीत जगतो का जिवंत मढ्यांमध्ये वावरतो, हा यक्षप्रश्न मला नेहमीच पडतो. जिवंतपणे मेलेली ही मढी विधानसभा-लोकसभा निवडणुकीपुरती तरी जिवंत होऊन 'माणुस' बनुन माणुसकीच्या शत्रुविरुद्ध मतदान करतील आणि अमानवीपणे एका गरीब व्रुद्धाची विनाकारण धिँड काढुन सिँधुदुर्गात लोकशाहीचा खुन पाडणा-या काँग्रेसला त्यांची योग्य ती जागा दाखवतील, अशी अपेक्षा करतो.काँग्रेस कार्यकर्त्याँच्या पाशवी अत्यांचारांची साक्ष म्हणुन 19 जुलै,2013 हा दिवस सिँधुदुर्गच्या इतिहासात नेहमीच 'काळा दिवस' म्हणुन गणला जाईल. लेखाच्या शेवटी महान तत्ववेत्ता कार्लाइलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देत थांबतो-

"खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या व्हायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असे समजावे."
मित्रहो, सिँधुदुर्गात खुज्या लोकांच्या सावल्या अगोदरच इतक्या वाढल्या आहेत की आपण आता अस्ताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत मात्र 'सिँधुदुर्गास्त' होऊ देणे आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा