रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

बलात्कारपर्व...

नेहमी चांगल्या गोष्टी घडु लागल्या की 'पर्व' हा शब्द वापरायचे संकेत आहेत पण अपवादात्मक परिस्थितीत वाईट गोष्टी नित्यनेमाने घडु लागल्या की उपहासात्मकरित्या 'पर्व' शब्दाचा वापर करायची वेळ येते. जेव्हा इंदिरा गांधीनी देशावर आणीबाणी लादुन लोकशाहीचे धिँडवडे उडवले तेव्हा आचार्य विनोबा भावेँनी(?) 'अनुशासनपर्व' या शब्दाचा वापर केला होता. असो, तर सांगायचा मुद्दा असा की 16 डिसेँबर रोजी दिल्ली गँगरेप झाला आणि त्यानंतर एखादा साथीचा रोग यावा त्याप्रमाणे संपुर्ण देशात बलात्काराची साथ पसरली. अर्थातच 16 डिसेँबरपुर्वी देशात बलात्कर होत नव्हते अस मला मुळीच म्हणायच नाही पण 'त्या' घटनेनंतर माध्यमांमध्ये बलात्काराच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळु लागली. टीव्ही मिडीया असो वा प्रिँट मिडिया, गेल्या कित्येक महिन्यात बलात्कर शब्दाचा समावेश नसलेले एक वर्तमानपत्र शोधुन सुद्धा सापडणार नाही. बलात्काराच्या चर्चा घराघरात रंगु लागल्या. रात्री टीव्हीवरील चर्चा पाहताना बलात्का-यांना भरचौकात फाशी द्यायला हवी, त्याची धिँड काढायला हवी, अशा संतप्त प्रतिक्रिया खासकरुन महिला वर्गातुन उमटु लागल्या.सोशल नेटवर्किँग साईट्सवर तर त्यापुढेही जाऊन शिवाजी महाराज असते तर त्यांनी बलात्का-यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते किँवा कडेलोट केला असता अशा बाता मारल्या जाऊ लागल्या. काहीँनी तर बलात्का-यांचे लिँग छाटुन त्याला उर्वरित आयुष्य नपुंसक म्हणुन जगायची शिक्षा द्यावी असे स्टेटस टाकुन मित्रमंडळीँच्या टाळ्या मिळवल्या. आश्चर्य म्हणजे यातील एकही जण सभोवतालची परिस्थिती, आपली कायदेपद्धती यांचे भान न ठेवता प्रतिक्रिया नोँदवत होता आणि अशा अर्धवटांना 'होय महाराजा' म्हणुन उत्स्फुर्तपणे दाद देणारे महाभाग देखील इकडे उपस्थित होते.
बलात्का-यांना फाशी द्या म्हणणारे एक गोष्ट विसरत आहेत की कोणतीही शिक्षा देण्यासाठी सबळ पुराव्यांची गरज असते. बलात्कारासारख्या गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद केली तर बलात्कारीत महिला प्रमुख पुरावा असेल. अशा परिस्थितीत बलात्कारानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बलात्कार करणारे नराधम बलात्कार करुन झाल्यानंतर संबंधित महिलेची हत्या करायला मागेपुढे पाहणार नाहीत. बलात्का-यांना फाशीच्या शिक्षेची तरतुद म्हणजे पिडीत महिलांना आगीतुन फोफाट्यात लोटण्यासारखे आहे.तसही शिक्षेच्या भितीने बलात्कार कमी होतील अशी भाबडी आशा बाळगणे हेच मुळी चुकीचे आहे. आजही आपल्या देशात बलात्का-यांसाठी जन्मठेपेपर्यँतच्या शिक्षेची तरतुद आहे. क्षणिक सुखांसाठी आयुष्यातील महत्वाची वर्षे तुरुंगात खितपत पडणे कोणालाच परवडणार नाही तरी देखील बलात्कार होतच असतात. त्यासाठी बलात्कारामागची कारणे आणि आपण बलात्कारांची संख्या कमी करण्यात एक समाज म्हणुन अपयशी ठरणार असु तर पिडीत महिलेवरील बलात्काराच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी काही उपाय करता येईल का, यावर मते मांडली पाहिजेत. हल्लीच आयबीएन लोकमतवर बलात्कार करणा-या अल्पवयीन तरुणांना शिक्षेत सुट द्यावी का यावर चर्चासत्र होते. त्यात एका मान्यवर महिलेने शिक्षा भोगुन बाहेर पडलेल्या तरुणांना तिने कसे योग्य मार्गावर आणले याची उदाहरणे दिलीत तर आमच्याच घरात बायकांनी त्या महिलेवर प्रखर टिका केली. समोरच्याचे म्हणणे समजुन न घेता, फुकटची भावनिक बडबड करण्यात आपणा भारतीय लोकांचा हात कोणीच धरु शकणार नाही. तरी सुद्धा अशा बिनडोक समाजासमोर मी माझे मुद्दे आता मांडणार आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहणा-यांना शिव्याच खाव्या लागतात.
माझच म्हणण खर असा दुराग्रह मुळीच नाही. त्यातही नक्कीच चुका असतील आणि त्या सुधारताही येतील पण उगाच फालतु बडबड करण्यापेक्षा नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवलेले केव्हाही चांगलेच...!

1) मला सर्वप्रथम बलात्कारासाठी कारणीभुत वाटते ती आपल्या देशातील 'मिश्र संस्क्रुती...' आपल्या देशाचे मिश्र अर्थव्यवस्थेने उडत असलेले धिँडवडे आपण पाहतच आहोत. अगदी त्याप्रमाणेच भारतीय संस्क्रुतीने वागायचे की पाश्चात्यांचे अनुकरण करायचे अशा द्विधा मनःस्थितीत भारतातील तरुण पिढी आढळते. भारतीय संस्क्रुतीला वाटाण्याच्या अक्षता दाखवताना एकविसाव्या शतकाचे कारण पुढे करत आपण पाश्चात्य संस्क्रुती स्वीकारली खरी पण निम्म्याहुन जास्त समाज अजुनही भारतीय संस्क्रुतीला धरुन चालतो. त्यातही बहुसंख्य लोक 'ना घर का, ना घाट का' प्रकारातील आहेत. त्यांना पाश्चात्यांप्रमाणे अनुकरण करायला आवडते पण त्याचे परिणाम भोगायची त्यांची मानसिकता नसते. या लोकांचा पुढारलेपणा सोयीप्रमाणे बदलत जातो.
अजुनही लैँगिकता किँवा त्याच्याशी निगडीत शब्द वापरताना आपण कुठला तरी घोर अपराध करत आहोत अशी भावना या तथाकथित पुढारलेल्या स्त्री किँवा पुरुषाच्या मनात असते. अगदी रोजच्या आयुष्यातील उदाहरण द्यायचे झाले तर मेडिकलच्या दुकानात कंडोम मागताना दुकानदाराची नजर चुकवणारे पुरुष किँवा गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी करताना काव-याबाव-या होणा-या स्त्रिया सगळ काही सांगुन जातात. इतकेच कशाला पण निसर्गनियमाने येणारी मासिक पाळी आली तरी एकविसाव्या शतकातील मुली त्याबद्दल घरात चर्चा चेह-यावर नाहक अपराधी भाव आणतात.
बहुसंख्य पाश्चात्य देशात स्त्रिया टु पीस बिकीनीवर वावरतात. आता मोर नाचतो म्हणुन लांडोरही नाचतो, त्याप्रमाणे भारतातल्या तरुणी देखील तोकडे कपडे वापरुन आपण पाश्चात्यांचे अनुकरण करतो म्हणजेच पुढारलेले आहोत हे समाजाला दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आता त्यांना पाहुन कोणी विक्रुत तरुण वासनेच्या आहारी जात त्यांच्यावर बलात्कार करत असतील तर तोकड्या कपड्या घालणा-या तरुणीँचा त्यात काहीच दोष नाही, असे विधान करुन आपण त्या तरुणीँना पाठीशी तर घालत नाही ना...? पाश्चात्य देशात बिकीनीवर वावरणा-या तरुणीँवर बलात्कार होत असतीलही पण त्यांच्याकरीता भारतातील महिलांप्रमाणे सेक्स फार मोठी गोष्ट नसते आणि त्यामुळेच तिकडे बलात्कारांचा जास्त गवागवा होत नाही.आता काही महिला लगेच संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याची तलवार काढुन मला गप्प करतील. खरोखरच शाब्दिक युक्तीवादात बाजी मारता येईलही पण प्रत्यक्ष आयुष्यात बलात्कारानंतर गेलेली अब्रु परत मिळवता येत नाही. शरीराचे उघडे भाग जास्तीत जास्त झाकण्यासाठी कपडे असतात, जास्तीत जास्त उघडे ठेवण्यासाठी नाही. जमाना कितीही बदलला तरी द्रौपदीच्या नशीबी नेहमीच वस्त्रहरण येते आणि सीतेला आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेतुन जावेच लागते. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टीँचे अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही पण शरीराचा किती भाग उघडा ठेवुन समाजात वावरावे याचा निर्णय प्रत्येक स्त्रीने आपल्या सदसदविवेकबुद्धीला स्मरुन घ्यायची वेळ आली आहे.

2) निर्जन ठिकाणी आपल्या प्रियकरासोबत लैँगिक सुख घेणा-या तरुणीँच प्रमाण आपल्या देशात वाढत आहे. 'खुल्लम खुल्ला प्यार करेँगे हम दोनो' अस म्हणुन कोणत्याही झाडीत शिरुन लैँगिक चाळे करताना प्रेमीयुगुल दिसतात. अशा तरुणीँनी एक गोष्ट नीट ध्यानात ठेवावी की तुमचा प्रियकर म्हणजे कोणी 'सुपरमँन' नव्हे. पाच-सहा जणांच्या टोळक्यांनी फिरणा-या रोडरोमियोँची नजर जेव्हा झाडीत प्रणय करत असलेल्या तरुणीच्या अर्धनग्न शरीरावर पडते, तेव्हा दांडगाईच्या जोरावर प्रियकराची मारपीट करुन ते हातात आयत्या सापडलेल्या तरुणीवर बलात्कार करतात. झुंडशाहीसमोर कितीही ताकदवान असलेला प्रियकर टिकाव धरु शकत नाही. लग्नाअगोदर प्रियकर असला तरीही असले चाळे करणे कधीही योग्य नव्हे पण आपल्या कामवासनांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर अशा प्रेमीयुगुलांनी थेट हाँटेलमध्ये रुम बुक करुन खोलीच्या आत असले कार्यक्रम आटपावेत.

3) पुरुषांमधील वासनांध झालेले जनावर जेव्हा रस्त्यावर मोकाट फिरु लागते, तेव्हा ती वासना कोणीतरी शमवणे फार गरजेचे होते. त्यामुळेच वेश्याव्यवसाय जगात फार पुर्वीपासुन चालत आलाय. खर तर अशा पुरुषरुपी जनावरांना झेलुन वेश्या इतर स्त्रियांच त्यांच्यापासुन संरक्षण करत होत्या. मधल्या काळात कित्येक संसार उद्ध्वस्त झाल्याचे कारण पुढे करत सरकारने डान्सबार आणि वेश्याव्यवसाय बंद केले. शरीरावर पोट असणा-या वेश्या सरकारच्या या निर्णयाने देशोधडीला लागल्या. ज्या नराधमांना सुधरवण्याच्या गोष्टी सरकार करत होते, तेच स्त्रीलंपट लोक बाहेर पडुन बलात्कार करु लागले. आता अशा जनावरांना आवर घालायचा असेल तर वेश्याव्यवसाय कायदेशीर करावा लागेल. जेणेकरुन कामवासनेने वेड लागलेल्या पुरुषांना ती शमवण्यासाठी योग्य जागा मिळेल आणि अनेक स्त्रियांवरील बलात्कार रोखता येतील.

4) एकीकडे डान्सबार/ वेश्याव्यवसायावर सरकार बंदी घालते तर दुसरीकडे देशात सेन्साँर बोर्ड सारखी कोणती गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न पडतो. पाँर्नस्टार सनी लियोनला बाँलिवुडमध्ये अभिनेत्री करण्यापर्यँत या लोकांची मजल पोचतेच कशी...? भारत देशात चित्रपटात अभिनय करु शकणारी दुसरी कोणी अभिनेत्रीच शिल्लक राहिली नाही का...?? की यापुढे जास्तीत जास्त प्रणय द्रुश्ये, भडक कपडे, चुंबनद्रुश्ये हेच चित्रपटांचे प्रमुख विषय असणार आहेत...???
उगाच प्रेक्षकांवर उपकार केल्यागत नटीच्या अंगावर कपड्याचे दोन तुकडे चिकटवण्याचे नियम तरी सेन्साँर बोर्ड का ठेवतय...? त्यापेक्षा नट्यांच्या अंगावर कपडे नसलेल्या ब्लु फिल्मच थिएटरमध्ये दाखवा ना...! आणखीन चांगला धंदा होईल आणि सनीताई लियाँन आपले तिकडचे कारनामे थेट इकडे येऊन थिएटरमध्येच दाखवेल. उगाच तिला बिचारीला अभिनय करायचे कष्ट कशासाठी...! त्या एकट्या सनी लियाँनला तरी का दोष द्यावा...? आपल्या नट्यांनी काय थोडे पराक्रम केलेत...??
कुर्बान चित्रपटात संपुर्ण पाठ उघडी असलेले पोस्टर करीना कपुरने प्रसिद्ध केलेले तेव्हाच तिच्या कानाखाली सणसणीत आवाज काढायला पाहिजे होता.ती कोण काल सकाळची पुनम पांडे रोज उठुन नग्न होण्याच्या घोषणा करुन वाद ओढवुन घेते आणि आपला मिडीया बेशरमपणे तिच्या बातम्या दाखवतो. आता अशा हलकट नटीला महिलांनीच एकदा बंद काळोख्या खोलीत नागड करुन चाबकांनी चोप दिला पाहिजे. देशात कोठेही बलात्कार झाला की आपल्याला समाजाची भरपुर काळजी असल्यागत याच निर्लज्ज नट्या छातीवर 'Being human' लिहुन, हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर येतात. त्यावेळी त्यांना जाब विचारला पाहिजे की पडद्यावर उघड्या अंगाने नाचताना तुमचे सामाजिक भान कोठे गेलेले...? यांच्या पडद्यावरील बिभीत्स वर्तनाने मुळातच ताळतंत्र सोडलेली तरुण पिढी ख-या आयुष्यातही ते शारिरीक सुख घेऊ पाहतात आणि त्यात बळी जातो तो बिचा-या सभ्य मुलीँचा...! अगोदर सेन्साँर बोर्डाचे नियम कडक करा आणि पडद्यावरील नट्यांचे देहप्रदर्शन, प्रणय थांबवा. देशातील बलात्काराचे प्रमाण थोडे तरी कमी होईल.

5) सेक्स हा विषय आजही घराघरात अस्प्रुश्य मानला जातो. पुढारलेल्या समाजातील आईवडीलही आपल्या मुलांसोबत ठराविक वयात होणा-या लैँगिक बदलांबाबत माहिती देण्यास किँवा त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यास टाळाटाळ करतात, हे आपण 'बालक पालक' चित्रपटात पाहिलेच आहे. परिणामी तरुण वयातच मुलांच्या मनात सेक्स या विषयाबद्दल कुतुहल निर्माण होते. त्याच गोँधळलेल्या मनःस्थितीत सध्या बाजारात अत्यंत सहजपणे मिळणा-या ब्लु फिल्म्स हातात पडल्या की त्यातले भयानक प्रकार पाहुन बहुतांश मुलामुलीँच्या मनाचा थरकाप उडतो. मात्र काही मुलांचे या कामक्रिडेबद्दल औत्सुक्य कमालीचे वाढते. हे सगळे अनुभव लवकरात लवकर घेता यावेत यासाठी ती अधीर होतात आणि अशा मनःस्थितीत संधी मिळाली की मागचापुढचा विचार न करता एखाद्या सरळसाध्या मुलीवर बलात्कार करुन मोकळे होतात. आता कायद्याने यात मुले गुन्हेगार असतीलही पण त्या मुलांमध्ये टाळाटाळ करुन सेक्सविषयी कुतुहल निर्माण करणारे पालक तितकेच गुन्हेगार असतात.

6) सध्या आपल्याकडे मुलीचे लग्नाच्या वेळी वय 18 वर्षे तर मुलाचे लग्नाच्या वेळी वय 21 वर्षे असणे कायद्याने बंधनकारक आहे पण ज्या तीव्रतेने बलात्कार होत आहेत ते पाहता मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे करण्यासंबंधी विचार करायला हवा.

7) बलात्कारानंतर एका स्त्रीचे पुढील संपुर्ण आयुष्य कोणतीही चुक नसताना विनाकारण उद्ध्वस्त होते. पुर्वीच्या काळात एखाद्या स्त्रीला दुर्देवाने लवकर वैधव्य आले तर तिला बोडकी करुन घरात बसवायची अनिष्ट प्रथा होती. पुढे समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे विधवांचे पुर्नविवाह होऊ लागले. आता बलात्कार झालेल्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहायची मानसिकता आपण बदलायला हवी. त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगु द्यावे. बलात्कार करणा-याशीच बलात्कारित स्त्रीचे लग्न करुन द्यावे हा चांगला नियम होऊ शकतो पण त्याचे दुष्परिणामही आहेत. एकतर्फी प्रेमात मुलीकडुन होकार मिळत नसेल तर मुले बलात्कार करु शकतात. त्यामुळेच या नियमाची अंमलबजावणी करताना बलात्कारित मुलीचे मत विचारात घ्यावे. तिची इच्छा असेल तरच तिचे त्या मुलाशी लग्न करुन द्यावे.

31 जुलैला मुंबईत बलात्कार झालेल्या मुलीला तिच्या प्रियकराने वा-यावर सोडुन न देता, तिच्याशी लग्न करुन समाजापुढे नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. आपल्या प्रेयसीच्या शरीरावर प्रेम न करता, तिच्या मनावर किँवा स्वभावावर प्रेम करा, हा उदात्त संदेश यातुन मिळत आहे. बलात्कार झाल्यावर त्या मुलीला सावरण्यासाठी मानसिक आधाराची गरज असते आणि त्या परिस्थितीत प्रियकराने साथ सोडली तर तिला सावरणे कठीण होऊन जाते. त्यासाठीच बलात्कारीत तरुणीची प्रियकराने अर्ध्यावर साथ न सोडता तिला शेवटपर्यँत आधार द्यावा.

एवढ्या उपायांवर विचार केला तरीही माझ्या मनात काही प्रश्न किँवा शंका अनुत्तरितच राहतात.

1) तरुणीँच्या तंग तोकड्या कपड्याने बलात्कार करणा-या पुरुषामध्ये दडलेल्या जनावराची कामवासना चेकाळुन बलात्कार होतो असे ग्रुहित धरले तर मग 70 वर्षाच्या आजीबाईँवर बलात्कार कसा काय होऊ शकतो...? आजीबाईँनी तर तोकडे कपडे घातलेले नसतात ना...?? 4 वर्षाच्या चिमुरडीवर कोणत्या मानसिकतेतुन बलात्कार होत असतील...??? 70 वर्षाच्या व्रुद्ध आजीबाईँकडे पाहुन किँवा 4 वर्षाच्या लहान मुलीकडे पाहुन कोणाचीही कामवासना कशी काय उत्तेजित होऊ शकते...????

2) बलात्का-यांमध्ये अल्पवयीन किँवा प्रौढ असा मतभेद करण्यामागे कारण काय...? ज्याला बलात्कार करण्याचे ज्ञान आहे तो अजाण कसा काय असु शकतो...???

3) दिल्ली गँगरेपच्या वेळी बलात्कारी त्या मुलीचा बलात्कार करुन थांबले नाहीत तर त्यांनी बलात्कारानंतर त्या मुलीच्या गुप्तांगामध्ये लोखंडी राँड घुसवला. तिचे हाल हाल केले आणि नंतर त्या मुलीने प्राण सोडले. जर बलात्कारामध्ये कामवासना शमवणे हे एकच कारण मानायचे ठरवले तर एका स्त्रीचा इतका निर्घुण खुन करायची काय गरज...? यामध्ये दिवसेँदिवस मेहनत करुन पुरुषांपेक्षा पुढारत चाललेल्या स्त्रीजातीबद्दल असंतुष्ट विक्रुत पुरुषांच्या मनात दडलेला प्रचंड मत्सर किँवा द्वेष तर उफाळुन येत नसेल ना...???
असे एक ना अनेक प्रश्न आजच्या घडीला मनात आल्यावाचुन राहत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायला गेले की मन अस्वस्थ होते. सोशल मिडीयावर आपण एकमेकांचे विचार तर जाणुन घेऊ शकतो हे झुकेरबर्गचे उपकारच मानायला हवे.

बलात्कार रोखण्यासाठी माझ्या मनात असलेले सगळे उपाय मी तुमच्यासमोर ठेवले. त्यामुळे बलात्कार 100% बंद होतील असे अजिबात नाही पण त्यांचे प्रमाण हळुहळु कमी होईल एवढे नक्की...! शेवटी समाजाला बलात्काराची किड लागली आहे आणि कोणतीही किड एकाएकी नष्ट होत नसते. त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. आपण सगळेजण मिळुन भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना नक्कीच करु शकतो. शेवटी आपल्या देशातील घाण आपल्यालाच साफ करावी लागेल ना...???
"हम होँगे कामयाब एक दिन.."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा