रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

तोडा, फोडा आणि 'अणुप्रकल्प' करा...

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अभ्यासताना ब्रिटीशांनी भारतीय क्रांतिकारकांची एकी तोडण्यासाठी अवलंबिलेल्या 'तोडा, फोडा आणि राज्य करा' या नीतीबद्दल ऐकुन होतो. 66 वर्षापुर्वी ब्रिटीशांच्या गुलामगिरीतुन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले खरे पण अजुनही आपण वैचारिक पारतंत्र्यातच वावरत आहोत. थोडक्यात काय तर राज्यकर्ते बदलले, गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आलेत पण एखादा कमजोर दुवा हेरत, एकजुट झालेल्या लोकांमध्ये फुट पाडुन, आंदोलनाची ताकद कमी करण्याचे कसब काँग्रेसने इंग्रजांकडुन वारसाहक्कात पदरात पाडुन घेतले आहे. काँग्रेसच्या याच व्रुत्तीचा प्रत्यय जैतापुरात आला.
जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांना कँन्सर झालाय ही गोष्ट काँग्रेसच्या धुर्त नेत्यांनी केव्हाच हेरली होती. प्रक्रुती खंगलेल्या माणसाकडे एका देशव्यापी आंदोलनाची जबाददारी देणे, हेच मुर्खपणाचे होते. फक्त शारिरिकच नव्हे तर मानसिक खच्चीकरण झालेली प्रवीण गवाणकरांसारखी माणसे अध्यक्षपदी असली की त्यांच्यावर विश्वास दाखवुन ठामपणे उभ्या असलेल्या लाखो लोकांना तोँडघशी पाडायला ती कधी मागेपुढे पाहत नाहीत.पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्य कितीही शुर असले तरी कैसर विल्यम्ससारखा पळपुटा राजा त्यांचे नेत्रुत्व करत होता. अर्थातच त्याने शरणागती पत्करल्याने झक मारत जर्मन सैन्याला शस्त्रे खाली ठेवुन शरणागती पत्करावी लागली. सद्य परिस्थितीत प्रवीण गवाणकर कैसर विल्यम्स प्रमाणे पळपुटे असले तरी जैतापुर आंदोलनाचे सर्वेसर्वा नक्कीच नाहीत. मग अशा माणसाने वैयक्तिक स्वार्थापोटी आमिषांना बळी पडत आंदोलन अर्ध्यावर सोडुन पळ काढला तर 'जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाला पुर्णविराम' या मथळ्याखाली वर्तमानपत्रे, टीव्ही व्रुत्तवाहिन्या बातम्या का देत आहेत...? पत्रकारितेतील नितीमत्ता, शुचितता, तत्वे एवढ्या लवकर अणुऊर्जा आयोगाला विकुन मोकळे झालात का...?? एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की प्रवीण गवाणकरांना महत्व द्यायला ते कोणी जैतापुर संस्थानाचे छत्रपती नव्हते. जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात आंदोलन उभे राहिले आणि त्या आंदोलनाची कमान गवाणकरांकडे सोपवण्यात आली म्हणुन त्यांचे नाव देशाच्या कानाकोप-यात पोहोचले. आज गवाणकरांची सेटलमेँट झाल्यानंतर ते आंदोलन सोडत आहेत म्हणजे जणु काही सगळे आंदोलनच संपले, असा अर्थ का काढत आहात...?गवाणकर काल म्हणाले, "गेली नऊ वर्षे आंदोलनाची धुरा सांभाळताना जनता माझ्यासोबत होती आणि मीही त्यांच्याशी 'प्रामाणिक' राहिलो."
गवाणकर, प्रामाणिक या शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला कळतो का...? आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक असाल तर मग अप्रामाणिक कोण ते सुद्धा एकदा सांगुनच टाका. प्रामाणिक शब्द तोँडातुन काढताना मनाचीही लाज वाटली नाही...? आज प्रामाणिकपणा तुमच्या या भ्याड क्रुत्यामुळे कलंकित झालाय.
जर दुर्धर आजारामुळे शरीर साथ देत नसल्याने आंदोलन पुढे चालवणे शक्य नव्हते तर अगोदरच वाट धरायची होती ना...! तुमच्याशिवाय आंदोलन अडुन पडलय हा साक्षात्कार तुम्हाला कधी आणि कसा झाला..? आंदोलनाची धुरा सांभाळुन जैतापुरच्या जनतेवर आपण फार मोठे उपकार केले आहेत, या आवेशात वावरु नका. जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करण्यासाठी तबरेज सायेकर,इरफान काझी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या तुलनेत तुमचे कार्य शुल्लकच म्हणावे लागेल. 9 वर्षे अविरत संघर्ष घेतल्यावर निर्णायक क्षणी जास्तीत जास्त मोबदला घेऊन स्वतःची तुंबडी भरुन घेण्यासाठी आंदोलन गुंडाळण्याचा लांच्छनास्पद प्रकार तुम्ही केलात.त्यासाठी कोकणची जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
शिवरायांच्या हिँदवी स्वराज्याचे स्वप्नात अडथळे आणण्यासाठी खंडोजी खोपड्यांसारख्या गद्दारानी शर्थीचे प्रयत्न केले होते पण कावळ्याच्या शापाने गाई-गुरे मरत नाहीत ना...? खंडोजी खोपड्यांनी गद्दारी केली तरी हिँदवी स्वराज्य उभेच राहिले. अगदी त्याचप्रमाणे प्रवीण गवाणकरांनी कोकणच्या मातीशी गद्दारी केली तरी आम्ही जैतापुर प्रकल्प रद्द करुनच दाखवणार. भविष्यात जेव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात जैतापुरच्या लढ्याची महती नक्कीच असणार आणि त्यावेळी तुमच्या पळपुटेपणाचे किस्से वाचुन पुढची पिढी देखील तुमचा उल्लेख 'जैतापुरचे खंडोजी' असाच करेल. प्रकल्पविरोधी भाषणांमध्ये भगतसिँगचे नाव अगदी उत्स्फुर्तपणे घ्यायचात, मग भगतसिँगने ब्रिटिशांशी सेटलमेँट न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोवळ्या वयात फासावर जाणे पसंत केले ही गोष्ट कशी काय विसरलात...?जैतापुरच्या अणुप्रकल्पाचे म्हणाल तर जोपर्यँत साखळीनाटेचे मच्छिमार आणि माडबनचे शेतकरी प्रकल्पाविरोधी आहेत तोपर्यँत प्रकल्पाचे बांधकाम आम्ही होऊच देणार नाही. लोकशाहीचे बुरखे पांघरुन प्रत्यक्षात हुकुमशाही करणारे काँग्रेसचे तालिबानी सरकार असली नसती थेड करुन अणुप्रकल्प आमच्यावर लादणार असेल तर त्यांचा खरा मुखवटा जगासमोर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.प्रस्तावित जैतापुर अणुप्रकल्पासाठी लागणा-या 750 हेक्टर जमीनीत तब्बल 2300 भु-धारक आहेत आणि त्यातील 500 पेक्षा कमी लोकांनी सरकारकडुन जमीनीचा मोबदला घेतला आहे (आकडेवारीत बोलायचे झाले तर 20-25% लोकांनी.) गवाणकरांसारखे गद्दार गळाला लागुन सुद्धा या विनाशकारी प्रकल्पाला अजुनही 75 ते 80 टक्के लोक विरोधच करत आहेत.जयराम रमेश पर्यावरण मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पात पर्यावरणविषयक तरतुदी धाब्यावर बसविण्यात आल्यात हे मान्य केले आणि त्यांच्या या प्रामाणिकपणाचा मोबदला म्हणुन त्यांच्याकडुन पर्यावरण खात्याचा पदभार काँग्रेसने काढुन घेतला.
कोकणी लोक (कोकणस्थ) ताठ कणा आणि कणखर बाण्यासाठीच देशात प्रसिद्ध आहेत. जैतापुर प्रकल्पानंतर आपल्याप्रमाणे कोकणातील पुढची पिढी कँन्सरसारख्या दुर्धर रोगाने त्रस्त व्हावी अशीच गवाणकरांची इच्छा दिसतेय पण ती आम्ही कदापि पुर्ण होऊ देणार नाही. डाँ. मिलिँद देसाईँच्या मते किनारपट्टीवरचे मच्छिमार प्रकल्पानंतर उपासमारीने मेले तरी चालतील पण जमिनीचा भरघोस मोबदला घेऊन यांच्या घरात भरभराट व्हायला हवी. प्रवीण गवाणकर किँवा मिलीँद देसाई अशा कुपमंडुक प्रव्रुत्तीच्या लोकांनी एक गोष्ट नीट ध्यानात घ्यावी की जैतापुर अणुप्रकल्प हा स्थानिक प्रश्न नसुन एव्हाना आंतरराष्ट्रीय प्रश्न बनला आहे.जैतापुर अणुप्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर केवळ माडबनला नाही तर मुंबईसह संपुर्ण कोकणला धोका पोहचु शकतो आणि त्यासाठीच शेवटच्या श्वासापर्यँत आम्ही हे आंदोलन सुरु ठेवु. तुमच्यासारखी दोन सडकी टाळकी कमी झाली म्हणुन आमच्या आंदोलनात तसुभरही फरक पडणार नाही. जैतापुर प्रकल्प कोकणसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे आणि तशीच वेळ आली तर जैतापुर प्रकल्प रद्द करण्यासाठी कोकणातली प्रत्येक स्त्री लढेल, प्रत्येक पुरुष लढेल, प्रसंगी लहान मुलेही रस्त्यावर उतरतील पण आता माघार संभव नाही. जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प कोकणातुन तडीपार करुनच शांत बसु.
। एकमुखाने गर्जा ।
॥ नको अणुऊर्जा ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा