शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

".... आणि कणकवली 'वैभव'मय झाल्याचा मिळाला 'संदेश'..!"



सिँधुदुर्गात नारायण राणे ऐन भरात असतानाही कणकवली शहरात 'आवाज कुणाचा' या घोषणेनंतर 'संदेश पारकरांचा' म्हणणा-यांची संख्या जास्त असायची. त्यावेळी कणकवली-मालवण हा राणेँचा विधानसभा मतदारसंघ असुनही कणकवली शहरात मात्र संदेश समर्थकांची संख्या जास्त असायची. खर तर पारकरांचा राजकीय जन्म हाच मुळी राणेविरोधातुन झाला होता. एखादी व्यक्ती, मग ती कोणत्याही राजकीय पक्षाची असो, तिच्या हाकेला ओ देत वेळप्रसंगी धावणारा नेता अशीच पारकरांची ख्याती होती आणि त्यामुळेच कणकवलीत त्यांचा जनाधार कायम राहिला. त्याच वेळी वैभव नाईकांचे नाव राणेविरोधक म्हणुनच पुढे येत होते पण संदेश पारकर कणकवलीत एखाद्या राजकीय प्रस्थाप्रमाणे असल्याने 'कणकवली संदेशची' आणि 'संदेश कणकवलीचा' अशी आख्यायिका सर्वत्र पसरत राहिली.
2005 मध्ये शिवसेनेत असणा-या राणेँनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबरोबर वैभव नाईक आपल्या कार्यकर्त्याँना घेऊन शिवसेनेत डेरेदाखल झाले. राणेँशी तडजोड करत काँग्रेसमध्ये न थांबण्याच्या त्यांच्या क्रुतीमुळे 'राणेविरोधक' या वैभवच्या प्रतिमेला भक्कम पाठबळ आणि चालना मिळाली.दुसरीकडे दिपक केसरकरांशी असलेले वैर आणि पक्षांतर्गत कलहात संदेश पारकरांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होऊ लागली. पारकरांसमोर काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे असे चार पर्याय होते. यातील शिवसेनेत वैभव नाईक सुरुवातीपासुनच कार्यरत असल्याने एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नव्हत्या. मनसे नवखा पक्ष असल्याने त्यात पारकरांना हवी असलेली सत्तास्थाने त्यांना लवकरात लवकर मिळाली नसती पण एक कुशल संघटक असल्याने चांगलाच वाव होता. भाजप मधील प्रवेश पारकरांसाठी योग्य ठरला असता कारण राणेँना म्हणावा तसा विरोध करता न आल्याने आमदार प्रमोद जठारांची मतदारसंघात ढिली होत असलेली पकड, राणेविरोध तीव्र करत पारकरांना आपला वेगळा ठसा उमटवुन देण्यास मदत करणारी ठरली असती. कदाचित यातुन विधानसभा तिकीटाचा मार्गही मोकळा झाला असता. असे एकापेक्षा एक कित्येक पर्याय समोर असताना पारकर जे करायला नको होते तेच करुन बसले. संदेश पारकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण म्हणजे बुडत्याचा पाय अधिक खोलात जाण्यासारखी गोष्ट होती. ज्या 'राणेविरोध' संकल्पनेतुन पारकरांचा जन्म झाला होता ती संकल्पनाच 'राणेसमर्थक' बनुन पारकरांनी नष्ट केली.
राणेँना विरोध करण्यासाठी पारकरांसोबत उभ्या असलेल्या कणकवलीकरांची घोर निराशा झाली. पारकर त्यांना एक प्रकारे 'पोरक' करुन निघुन गेले. पोरकेपणा आलेल्या कार्यकर्त्याँना एखादा खमका 'नेता' बाप म्हणुन हवा असतो याची वैभवला जाणीव होती. 'मौके पे चौका' मारत काँग्रेसला 'आमने-सामने'च्या जाळ्यात अडकवुन वैभवने जबरदस्त राजकीय खेळी केली. 'आमने-सामने' जिँकला काय किँवा हरला काय, शेवटी विजय वैभवचाच होणार होता कारण या 'आमने-सामने' नंतर राणेविरोधक ही वैभवची प्रतिमा आणखीनच उजळ होत त्याला पारकरांच्या मागे राणेविरोधासाठी थांबलेल्या कार्यकर्त्याँचे समर्थन आपोआप मिळणार होते. ही गोष्ट काँग्रेस नेतेमंडळीँच्या लक्षातच आली नाही. काँग्रेससाठी 'दुष्काळात तेरावा महिना' असल्यागत पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केला. त्यावेळी शिवसैनिकांच्या रक्षणाखातर वैभवने स्वतः पोलिसांवर धावुन जात 'राडा' केला. राडा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात वैभवच्या क्रुतीने नवचैतन्य पसरले. कणकवलीत राडा झाला आणि त्यात पारकरांचे चुकुनही नाव नाही, अशी ही एक दुर्मिळ घटना होती. कणकवलीकर पारकरांच्या काँग्रेसप्रवेशानंतर राणेँना त्यांच्याच भाषेत उत्तर देणा-या नेत्याच्या शोधात असतानाच वैभवने त्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्या. एका घटनेने वैभव नाईकचे नाव 'ढाण्या वाघ' म्हणुन थेट व्रुत्तवाहिन्यांवर झळकले. वयाची साठी ओलांडलेल्या राणे साहेबांनंतर सिँधुदुर्गचा वारसदार कोण, या प्रश्नाची चर्चा दबक्या आवाजात सुरु असायची. कणकवलीच्या राड्यानंतर शर्यतीत असलेल्या नितेश आणि निलेश या राणेपुत्रांना मागे टाकत वैभवने लोकांच्या ह्रुदयावर कब्जा केला. वैभवला अटक झाल्यानंतर कोणतेही आयोजन नसताना कणकवलीकरांनी उद्धव ठाकरेँच्या भेटीदरम्यान केलेली अनपेक्षित गर्दी नारायण राणेँचा वारसदार वैभव नाईक या गोष्टीवर शिक्कामोर्तब करणारी होती. ती गर्दी नुसत्या शिवसैनिकांची नक्कीच नव्हती. त्या गर्दीत राणेँना पोटतिडकीने विरोध करणारा सामान्य कणकवलीकर खास 'संदेश' देण्यासाठी आला होता- "कणकवली 'वैभव'मय झाली आहे. आता सिँधुदुर्ग 'वैभव'मय करायची सुवर्णसंधी आहे. तेव्हा लागलीच कामाला लागा."

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१३

शिवसेनेचे गत'वैभव' पुन्हा परतले...!


 'नडला त्याला फोडला' हे ब्रीदवाक्य घेऊनच शिवसेनेचा जन्म झाला आणि त्यातही कोकणी माणसाचा वाटा सिँहाचा होता. 90 च्या दशकात शिवसेना ख-या अर्थाने कोकणात पाळेमुळे धरु लागली. कोकणचा प्रांत महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात सभ्य आणि विद्वान लोकांचा मतदारसंघ म्हणुन ओळखला जायचा तरीही संयमी कोकणात शिवसेनेची 'राडा संस्क्रुती' रुजवण्यात बाळासाहेबांचे तत्कालीन खंदे शिलेदार नारायण राणेँनी यश मिळवले. 1990 नंतर राणेँनी मागे वळुन पाहिले नाही आणि बघता बघता अवघ्या कोकण प्रांतावर शिवसेनेचा भगवा फडकवला. यशाच्या धुंदीत बाळासाहेब राणेँच्या एका टेकुवर कोकणात शिवसेनेचा मनोरा उभारण्याची चुक करुन बसले आणि जेव्हा अंतर्गत मतभेदांमुळे राणेँनी आपला आधार काढुन घेतला तेव्हा शिवसेनेच्या सत्तेचा मनोरा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. एकेक मावळा गोळा करुन बांधलेला कोकणातील शिवसेनेचा गड एकाएकी कोसळणे म्हातारपणात बाळासाहेबांना सहन होणारे नव्हते. त्या वयातही आपला पट्टशिष्य राणेँना निवडणुकीत हरवण्यासाठी बाळासाहेबातील द्रोणाचार्य पुढे सरसावला. यावेळी सुद्धा महाभारताचीच पुनराव्रुत्ती होऊन अर्जुनाप्रमाणे राणेँनीही 'गुरुची विद्या गुरुला' देत बाळासाहेबांच्या उमेदवाराचा अनामत रक्कम जप्त करुन पराभव केला. पश्चाताप करण्यावाचुन बाळासाहेबांसमोर अन्य कोणता पर्याय नव्हता. अशा बिकट परिस्थितीत बाळासाहेबांची मदत करण्यासाठी काँग्रेसमधुन शिवसेनेत प्रवेश करत पुढे सरसावला तो वैभव नाईक...!
राजकरणात नशीबाचे फासेच असे पडले होते की नाथ पै, दंडवते यांच्या कर्मभुमीला ज्या शिवसेनेने श्रीधरजी नाईक यांची हत्या करुन लाल केली त्याच शिवसेनेत त्याला प्रवेश करावा लागत होता. वैभवने जिल्हाप्रमुख होताच शिवसेनेतील मरगळ झटकली आणि पुन्हा एकदा आहेत त्या शिवसैनिकांना हातीशी धरुन शिवसेनेची वज्रमुठ पुन्हा बांधायचा प्रयत्न केला. 2009 मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघातुन विधानसभेची निवडणुक लढवण्यासाठी वैभव नाईक दस्तरखुद्द नारायण राणेँसमोर दंड थोपटत उभा राहिला. 2005 पोटनिवडणुकीतील उपरकरांप्रमाणे राणे साहेब वैभव नाईकची अनामत रक्कम जप्त करतील अशी चर्चा सर्वत्र होत होती.त्यातकरुन अगदी निवडणुकीदिवशीच वैभव नाईकवर रिव्हाँलर रोखण्यात आली पण न डगमगता वैभव ठामपणे राजकीय दहशतवादाविरोधात उभा राहिला. निवडणुकीचा निकाल आला तेव्हा एकेकाळी कोकणवर वर्चस्व असणारा नारायण राणेँसारखा मातब्बर नेता अवघ्या 25 हजार मतांनी जिँकला होता. वैभवच्या पराभवातच त्याचा खुप मोठा विजय होता. 2009 लोकसभा निवडणुकांवेळी राजकीय दहशतवादाविरोधात शड्डु ठोकणा-या वैभवलाच अंकुश राणे खुनप्रकरणात नाहक गोवण्यात आले. सत्याची कास धरणा-या वैभवने स्वतःच अंकुश राणे खुनप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. गेली 5 वर्षे त्याच्यावरील खोटे आरोप अजुन सिद्ध व्हायचे आहेत.

अशा या वैभव नाईकने कालच कणकवलीत पोलिसांसोबत राडा केला आणि निमित्त होते 'आमने-सामने'चे...!
मुळात लोकसभेसाठी शिवसेनेकडुन तिकीट मिळवुन खासदारकीची दिवास्वप्ने पाहणा-या विनायक राऊत नामक स्वयंघोषित नेत्याने 'आमने-सामने'ची फुस लावली. काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवल्यावर आमदार राऊतांनी कारणे देत सोयीस्करपणे पळवाट काढली. कार्यकर्त्यांचे जाळे मजबुत असणा-या काँग्रेसला एकट्याने शिँगावर घेणे भातुकलीचा खेळ नव्हे.शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्यावर वैभव नाईक ढाण्या वाघाप्रमाणे डरकाळी देत 'आमने-सामने'चे आव्हान स्वीकारण्यास सज्ज झाला. 'आमने-सामने' हा असा राजकीय सामना होता, ज्याचा निकाल कोणीही कितीही लढले तरी अनिर्णित असाच लागणार होता कारण या सामन्याचा निकाल ठरवणारा पंचच कोणी नव्हता. फक्त काँग्रेस-शिवसेनेचे खेळाडु या राजकीय सामन्याच्या खेळपट्टीवर उतरण्याचे धारिष्ट्य दाखवतात का पळ काढतात, हेच पाहणे औत्सुक्याचे होते. काँग्रेसचे तीन जण सभाग्रुहात आपल्या कार्यकर्त्याँनीशी दाखल झाले. त्यानंतर थोड्याच वेळात काँग्रेस कार्यकर्त्याँनी भरलेल्या त्या सभाग्रुहात वैभव एकटाच घुसला, त्याला पोलिसांनी रोखले आणि नंतर कालचा राडा घडला. मला त्यावर भाष्य न करता एक सामान्य नागरिक म्हणुन काही मुलभुत प्रश्न केवळ उत्सुकतेपोटी विचारायचे आहेत.
1) पोलिसांना आमने-सामने होऊ द्यायचे नसेल तर अगोदरच काँग्रेसच्या पदाधिका-यांना सभाग्रुहात जाण्यापासुन रोखले का नाही...?
वैभव नाईक तिकडे आल्यावर शांततेचा प्रश्न कसा काय निर्माण होतो...??
मुळातच आमने-सामने ही विचारांची लढाई होती. ती काही कुस्तीस्पर्धा नव्हती. मग शांततेचा भंग होण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो...???
शिवाय वैभवला हाणामारी करायचीच असती तर तो शिवसैनिकांना घेऊन सभाग्रुहात गेला असता. ज्यांना हुल्लडबाजी करायची होती तेच कार्यकर्त्याँना सभाग्रुहात घेऊन येणार हा साधा हिशेब आहे आणि कार्यकर्ते घेऊन सभाग्रुहात कोण आलेले हे जगजाहीर आहे.

2) वैभवला पोलिसांनी अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्याँनी आमने-सामने जिँकल्याच्या आवेशात फटाके फोडले. त्यानंतर वैभवला पोलिसांनी सोडल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडले. मग फक्त शिवसैनिकांवरच लाठीमार का करण्यात आला...? कायदा फटाके फोडणा-या काँग्रेस कार्यकर्त्याँना लागु होत नाही का...??

3) पोलिसांनी लाठीमार करताना शिवसेना कार्यालयानजीकच्या हाँटेलमध्ये चहा पिणा-या ग्राहकांना विनाकारण मार का दिला...?

4) दोन दिवसापुर्वीच महिला शक्तीच्या नावे भाषणे ठोकणारे नेते शिवसेना कार्यालयात घुसुन पोलिसांनी महिलांना अमानुषपणे त्यांच्या पाठीवर वळ उठेपर्यँत मारले तेव्हा कुठे होते...? की तुमचे महिलाप्रेम फक्त निवडणुकात मते मिळवण्यापुरतीच आहे...??

5) कणकवली राडा प्रकरणाबाबत ग्रुहमंत्री आबा पाटीलांची अजुनही प्रतिक्रिया का आली नाही...? काल महिलांवर लाठीमार करण्यात पुरुषार्थ दाखवणारे आबांचे पोलिस आझाद मैदान दंगलीवेळी झोपले होते का...?? ग्रुहखात सांभाळता येत नसेल तर आबांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

7) रमेश मणचेकर खुन प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले होते. अंकुश राणेँच्या खुन्याचा पोलीस गेली पाच वर्षे तपास लागलेला नाही. होँडा शोरुम जाळकांडातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत मोकाट फिरतायेत. वैभव नाईक सातत्याने याप्रश्नी लोकांमध्ये आवाज उठवत होते. काल पोलिसांनी वैभववर केलेला लाठीमार याचीच तर प्रतिक्रिया नसेल...? अशा कठीण प्रसंगी भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन वैभव नाईकला पाठिँबा द्यायची गरज आहे. काल पोलिसांकडुन मार खाणारा वैभव होता, उद्या तो तुमच्यापैकीच कुणीतरी असेल.

या सगळ्यात एक प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतो-
"सत्तेच्या माजापुढे सामान्य लोक खरच इतका क्षुल्लक असतो का...?"

बाकी कोणी काही म्हणो पण कालच्या आंदोलनामुळे काही गोष्टी शिवसेनेकरता नक्कीच आश्वासार्ह घडल्या.

1) राणेँच्या एक्झिटनंतर शिवसेना आणि राडा यांच सिँधुदुर्गातील नात संपल्यात जमा होत पण वैभवने शिवसैनिक कसा राडा करु शकतात हे महाराष्ट्राला दाखवुन दिले.

2) बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि शिवसेनेच्या मवाळ कारभारानंतर नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या शिवसैनिकांना ऐन निवडणुकांपुर्वी जोश आला.

3) राडा विरोधकांनाही करता येतो याची काँग्रेस समर्थकांनाही जाणीव झाली.

4) दस्तरखुद्द पालकमंत्र्यांना त्यांचे होम ग्राऊंड कणकवलीमध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकापुढे आपल्या गाड्यांचा ताफा नाईलाजास्तव पुन्हा आपल्या बंगल्याकडे वळवावा लागला, यापेक्षा वैभवकरिता आणखी मोठे यश ते कोणते...???

आदरणीय बाळासाहेब ठाकरेँना श्रद्धांजली राज्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दिली पण वैभवने काल दिलेल्या श्रद्धांजलीने बाळासाहेब नक्कीच क्रुतक्रुत्य झाले असतील.

(ता.क- कमेँटमधील प्रतिक्रियांना पोस्ट एडिट करुन उत्तर देत आहे.

सिँधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस आयोजित आमने-सामने असा फलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी लिहिला होता. आदल्या दिवशी महिला मेळाव्यात आमने-सामनेला मी गेलो असतो तर कानफटात लगावली असती असे चिथावणीखोर वक्तव्य पालकमंत्र्यांनी केले होते. मग प्रतिबंधात्मक कारवाई करताना पोलिसांनी एकट्या वैभवलाच अटकेत का घेतले...? अलीकडच्याच राजापुर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राजन साळवी सिँधुदुर्गातील हाँटेलात येऊन का राहु शकत नाहीत याची सर्वप्रथम कारणे पोलीसांनी स्पष्ट करावीत. त्यांना सिँधुदुर्ग जिल्ह्यातुन तडीपारीचा कोणता आदेश आहे का...?? नसल्यास एका आमदाराला हाँटेलमध्ये घुसुन बाहेर काढण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला...??? वैभवच्या राड्याचे समर्थन होणार नसेल तर पोलिसांच्या पक्षपातीपणाचेही समर्थन कोणी करु नये. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणुन पोलिस आदल्या दिवशीच काँग्रेस-शिवसेनेच्या पदाधिका-यांना अटक करु शकली असती. पण तसे न करता आमने-सामनेच्या दिवशी पोलिसांनी काँग्रेस पदाधिका-यांना सभाग्रुहात जाऊ दिले आणि वैभवला मात्र अटक केली. आता या घटनेत कोणाचा 'हात' आहे हे न कळायला सिँधुदुर्गातील जनता दुधखुळी नाही. अशा काँग्रेसच्या पोलीस अधिक्षकाची तात्काळ बदली करण्यासाठी विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवावा.
"राडा कोणताही असो, मारणारा कार्यकर्ता असतो आणि मार खाणाराही कार्यकर्ता असतो." ही गोष्ट खरी असली तरी कालच्या राड्यात आपल्याला अटक झाल्यानंतरही वैभवमधील नेत्याने संयम बाळगला होता. पण फटाके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पक्षपाती पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केला आणि त्याच वेळी फटाके फोडणा-या काँग्रेस कार्यकर्त्याँना मात्र मोकाट सोडले हे ऐकुन वैभव चिडला. त्यानंतरच त्याने पोलीस अधिक्षकांच्या श्रीमुखात भडकावली आणि कार्यकर्त्याँसोबत आपणही पोलिसांवर वाघासारखा तुटुन पडला, लाठ्या खाऊन जखमी झाला आणि आज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कार्यकर्त्याँना चिथावुन स्वतः रणभुमीतुन पळ काढणा-या आमदार विनायक राऊतांसारखा वैभवचा स्वभाव नाही. वाघाच कातड पांघरुन वाघ होता येत नाही हे राऊतांना एव्हाना समजलच असेल. शौर्य रक्तात असाव लागत. वैभवसारख...!!!)

'कळणे'वासियांची न 'कळणा'री मानसिकता...!




                19 मार्च 2009...! कळण्यातील लोक साखरझोपेत असतानाच बुलडोझर, जेसीबीच्या आवाजात 'मिनरल अँण्ड मेटल्स' या कंपनीने कळण्यातील 100 टक्के लोकांनी जनसुनावणीत केलेला विरोध झुगारुन पोलिसांच्या उपस्थितीत मायनिंग सुरु केले. संतप्त कळणेवासियांनी रास्ता रोको आणि कंपनीची यंत्रे बंद पाडण्याचा प्रयत्न केला. लोकांचा रुद्रावतार पाहुन कंपनीचे सुरक्षारक्षक सैरावरा पळु लागले आणि या धावपळीत पडुन एका सुरक्षारक्षकाचा म्रुत्यु झाला. कळण्यातील शिक्षक, डाँक्टर अशा प्रतिष्ठित पदांवर काम करणा-या 16 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर काही आंदोलक भुमिगत झाले. अशा प्रकारे कळण्यातील जनआंदोलनाचा सरकारने गळा घोटला.                कळणे मायनिँगविरोधी आंदोलनासाठी राज्यभर गाजले. मात्र त्याअगोदर 'कळणे' हे नदीच्या काठी वसलेले निसर्गरम्य गाव होते. बारमाही वाहणा-या नदीच्या पाण्यावर गावक-यांनी स्वकष्टाने माड, सुपारी, केळी, अननस, काजु यांच्या बागायती उभ्या केल्या होत्या. सुमारे 600 हेक्टर क्षेत्रात गावकरी 100 टक्के अनुदानातुन काजु लागवड करत लाखो रुपयाचे उत्पादन मिळवत होते. त्याशिवाय प्रत्येक कुटुबांच्या परस बागेत असलेल्या 200 माडाच्या आणि 200 पोफळीच्या झाडांनी वेगळे उत्पन्न मिळायचे. अशा बाग-बागायती मायनिँगसाठी उद्धस्त करु पाहणा-यांना विरोध करण्यासाठी कळण्यातील माऊली मंदिरात 'प्रार्थना सत्याग्रह' करण्यात आला. कळणेवासीयांवर झालेला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत माऊली मंदिरात प्रार्थना सत्याग्रहसुरूच ठेवण्याचा आणि मतदानाचा हक्कदेखील नाकारण्याचा निर्णय जनतेने एकमताने घेतला. देवी माऊलीला देखील आपल्या गावातील लोकांचा अभिमान वाटावा अशी ही एकजुट होती. या घटनेला धड पाच वर्षे देखील पुर्ण झाली नसतील आणि मधल्या काळात मायनिँग कंपनीने अशी काही जादुची कांडी फिरवली की 20 नोव्हेँबर 2013 रोजी झालेल्या ग्रामसभेत कळणेवासियांनी 2 विरुद्ध 156 मतांनी इको सेँसिटीव्ह झोन विरोधी ठराव संमत केला. पर्यायाने त्यांनी गावातील मायनिँगने होणा-या विध्वंसाला एकमताने पाठिँबा दिला. द्रुढनिश्चयी लोकांची मानसिकता बदलण्यामागे, मायनिँगविरोधी एकजुट तुटण्यामागे नेमकी कोणती कारणे असतील...?

                जनआंदोलनाचा विरोध डावलुन कंपनीने मायनिँग सुरु केले असले तरी जनतेचा तीव्र विरोध असताना काही ना काही अडचणी निर्माण होतच राहतील याची कंपनीला जाणीव होती. सर्वप्रथम जनतेचे ऐक्य तोडण्यासाठी कंपनीने ब्रिटीशांच्या 'तोडा, फोडा आणि उद्देश साध्य करा' नीतीचा वापर करत गावातील काही लोकांना रोजगाराचे आमिष दाखवले. त्यांना प्रकल्पामध्ये छोटी-मोठी कंत्राटे दिली. खनिज वाहुन नेण्यासाठी डंपरची आवश्यकता असायची. सुरुवातीला काही ग्रामस्थांना डंपर खरेदी करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले. पुढे काही ग्रामस्थांनी डंपर विकत घेण्यासाठी बँकांकडुन कर्जे घेतली आणि पुर्णपणे कंपनीच्या जाळ्यात अडकले. आता कळणे इको-सेँसिटीव्ह झोन होऊन मायनिँग बंद झाले तर आपल्याला कर्जाचे हप्ते थकवणे मुश्किल होईल, याची जाणीव ग्रामस्थांना झाली. एव्हाना नकळत का होईना काही ग्रामस्थांसाठी मायनिँग ही जगण्याची गरज बनली होती. दुसरीकडे दोन वर्षात मायनिँग कंपनीने कळण्याचा हिरवागार निसर्ग लालेलाल केल्याने संघर्ष करणा-या आंदोलकांमध्ये नैराश्य पसरले आणि ते कंपनीच्या पथ्थ्यावर पडणारे ठरले.कळण्यातील मायनिँगवर उदरनिर्वाह असणा-यांची संख्या वाढत जाऊन 300-400 च्या घरात जाऊन पोहोचल्याने गावातील सामाजिक ऐक्य संपुष्टात येऊन मायनिंग समर्थक-विरोधक यांच्यात खटके उडु लागले. मायनिँगचे समर्थन करणा-या लोकांना स्वतःच्या ऐहिक सुखासमोर पर्यावरणासारख्या गोष्टी क्षुल्लक वाटु लागल्या. कळण्यात याअगोदरही काजु कारखान्यात 200 लोकांना रोजगार मिळतच होता पण मायनिँगच्या मायेत अंध झाल्याने तो देखील त्यांना दिसेनासा झाला. स्वार्थापोटी आपण पुढच्या पिढ्यांच्या नशीबात काय वाढुन ठेवत आहोत याची जाणीव सुद्धा नव्हती. त्यात भर पडली ती इको सेँसिटीव्ह झोन बद्दल जाणीवपुर्वक अपप्रचार करणा-या सर्वपक्षीय राजकरण्यांची...!

                इको सेँसिटीव्ह झोनमध्ये घरे बांधता येणार नाहीत, झावळीच्या घरात राहावे लागेल, रस्ते बांधता येणार नाहीत, गावात एसटी येणार नाही, दोडामार्गचा विकास खुंटेल. सत्ताधारी काय किँवा विरोधक काय तोँडाला वाट्टेल ते बोलत होते. त्या सर्वाँना एकच प्रश्न विचारावासा वाटतो, महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान आणि डहाणुचा इको सेँसिटीव्ह झोन मध्ये समावेश होतो. या प्रदेशात किती लोक झावळीच्या घरामध्ये राहतात...? यातील किती टक्के भागात रस्ते नाहीत...?? विकासाच म्हणाल तर महाबळेश्वरला 2010-11 या एका वर्षात 11 लाख पर्यटकांनी भेट दिली आणि 100 कोटी रुपयांची स्ट्राँबेरी विकली गेली. सिँधुदुर्गला देशातील एकमेव 'पर्यटन जिल्हा' घोषित करुन आज 16 वर्षे लोटली, मग अजुनही महाबळेश्वरच्या धर्तीवर इको-टुरिझमच्या द्रुष्टीने कोणतेही प्रयत्न का करण्यात आले नाही...? तिकडे तुम्हाला कोणत्या गाडगीळ किँवा कस्तुरीरंगनने रोखले होते का...?? मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः अपघाताचा सापळा बनला तरी इतक्या वर्षात त्याचे चौपदरीकरण करण्यात आले नाही मात्र गाडगीळ अहवालाला विरोध करताना नेतेमंडळीँना चौपदरीकरणाची आठवण झाली. दोडामार्ग तालुक्याच्या निर्मितीपासुन त्याला मागासच ठेवण्यात आला मात्र त्यातील खनिजसंपन्न 13 गावे इकोसेँसिटीव्ह करण्याची वेळ आली तेव्हा यांना दोडामार्गच्या विकासाची आठवण झाली. हा विकास नक्की जनतेचा आहे की नेतेमंडळीँचा, याबाबत जरा स्पष्टीकरण द्याल का...? कारण सिँधुदुर्गात एरव्ही दुर्मिळ असणारी सर्वपक्षीय युती जेव्हा इको-सेँसिटीव्हला विरोध करायची वेळ येते तेव्हाच नजरेस पडते. 'हमाम मे सब नंगे है' याच यापेक्षा आदर्श उदाहरण आणखी कोणत असेल...? जिल्ह्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप इको सेन्सिटीव्ह आणि मेजर मायनिँग प्रकल्प दोघांनाही विरोध करतोय. त्यांना म्हणे सुवर्णमध्य काढुन कोकणातील मेजर मायनिँग रोखण्यासाठी वेगळे कायदे तयार करायचे आहेत. भाजपला युती सरकारच्या 5 वर्षाच्या काळात हे कायदे करण्यापासुन कोणी रोखले होते, जरा समजु शकेल का...?

                 आता जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी इको सेँसिटीव्ह झोनबाबत अधिक्रुतरीत्या कोणत्या अटी ठेवल्यात त्यांची यादी देतो. म्हणजे सर्वपक्षीय नेतेमंडळीँच्या म्हणण्यातील फोलपणा तुमच्या नजरेस पडेल.इको सेँसिटीव्ह झोनमध्ये खालील गोष्टीँना निर्बँध घालण्यात आले आहेत.

1) व्यापारी उद्देशाने निर्माण करावयाचे खाणकाम.

2) प्रदुषण निर्माण करणारे कारखाने

3) मोठे जलविद्युत प्रकल्प

4) जळाऊ लाकडाचा व्यापारी वापर

5) आरगिरणी स्थापित करणे

6) धोकादायक पदार्थाँचा वापर व निर्मिती

7) हवाई किँवा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे होणारे पर्यटन

8) नैसर्गिक पाण्यात मलमुत्र व प्रदुषणयुक्त पाणी सोडणारे प्रकल्प

9) दैनंदिन बाबीँवर काही प्रतिबंध होणार नाही.

परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलय की जनतेच्या दैनंदिन उपक्रमाला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. तरीही नेतेमंडळी इको सेँसिटीव्हमुळे लोकांना जगण कठीण होऊन जाईल, असा तद्दन खोटा अपप्रचार करत आहेत. नेते अर्धसत्य सांगताना म्हणतात की, इको सेँसिटीव्ह क्षेत्रात लाकडे तोडता येणार नाहीत. वर दिलेल्या चौथ्या अटीत स्पष्टपणे सांगितलय की व्यापारासाठी लाकडे तोडता येणार नाहीत. म्हणजेच एखादा कारखाना काढण्यासाठी जंगलच्या जंगल तोडली जातात, तसे करता येणार नाही पण घरगुती वापरासाठी लाकडे तोडता येऊ शकतील. इको सेँसिटीव्ह झोनमध्ये कोणतेही उद्योग करता येणार नाहीत असे धादांत खोटे बोलणा-यांना मी सांगु इच्छितो की सागरी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग, क्रुषी उत्पादनावर आधारित उद्योग, पर्यटन उद्योग, फर्निचर उद्योग, काजु कारखाना असे 16 प्रकारचे उद्योग करता येतात. फक्त मायनिँगसारखे 'नसते उद्योग' करता येत नाहीत. कळणेवासियांना नम्र विनंती करतो की त्यांनी राजकीय नेत्यांच्या भुलथापांना बळी न पडता एकदा उर्वरित सिँधुदुर्गचा विचार करावा.

                कळण्यात 300-400 फुट खोल खणुन मायनिँग प्रकल्प केला गेला तर आजुबाजुच्या गावांमधील पाण्याचा प्रवाह खाणीच्या दिशेने वाहु लागतो आणि सगळे पाणी खाणीमध्ये जमा होते. परिणामी, फक्त 30-40 फुट खोल असलेल्या विहिरी कोरड्या पडु लागतात. सध्या मायनिँग प्रकल्पांमुळेच सिँधुदुर्गातील लोकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येची भीषणता अनुभवायची असेल तर शेजारील गोवा राज्याचे निरीक्षण करा. अस म्हणतात, लोकांची स्मरणशक्ती खुपच कमी असते. कळणे ग्रामसभेने इको सेँसिटीव्ह झोनला एकमताने विरोध केल्यानंतर तेथील लोकांना कळण्यातील पाच वर्षापुर्वीच्या मायनिँगविरोधी आंदोलनाची आठवण करुन देण्यासाठी लेख लिहिण्याचा प्रपंच केला. कोकणचे कोकणपण टिकवण्यासाठी संघर्ष करायचा की मायनिँगमधुन मिळणा-या मोहजाळात अडकुन निसर्गाचा विध्वंस करायचा, हा निर्णय आता त्यांना घ्यायचा आहे. मायनिँगमुळे डोंगर बोडके झाल्यानंतर पुढच्या पिढ्यांना निसर्ग म्हणुन काय दाखवणार आहात...?

                पर्यावरण रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या जनआंदोलनाचे मरण निश्चितच वेदनादायी होते पण त्याहीपेक्षा कळण्यातील लोकांच्या पर्यावरणाविषयी जाणीवाच संपण कळण्यातीलच नव्हे तर सिँधुदुर्गातील पुढच्या पिढ्यांसाठी घातक आहे. एक वेळ नैराश्येमुळे खचलेल आंदोलन पुन्हा नव्या जोमाने उभारता येत पण जिथे लोकांच्या मनातील पर्यावरणाप्रती ओढच संपली आहे ती पुन्हा कशी निर्माण करायची...? कोणे एकेकाळी आम्ही कष्ट करुन खाणारे कळणेवासी स्वतःचे स्वतःच मालक आहोत आणि आम्हाला कोणत्या कंपनी चालकाच्या हाताखाली काम करायचे नाही, असे कळण्यातील कष्टकरी लोक अभिमानाने सांगायचे. तो स्वाभिमान आता कसा परत आणायचा...? परमेश्वराला मन असत की नाही माहित नाही पण त्यालाही आपल्यासारखच संवेदनशील मन असेल तर कळण्यातील देवी माऊलीच्या मनाची आज काय अवस्था असणार...? पाच वर्षापुर्वी माऊलीच्याच मंदिरात एकी दाखवत मायनिँग प्रकल्पाला विरोध करणा-या ग्रामस्थांनी आज मायनिँग मधुन मिळणा-या पैशांसाठी गमावलेले सामाजिक ऐक्य पाहुन व्यथित झालेली देवी माऊली आज स्वतःलाच प्रश्न विचारत असेल-

"प्रार्थनासभेत मायनिँगला विरोध करणारे कळण्यातले लोक नक्की हेच आहेत का...? मग मंदिरातील खांबांवर लहान मुलांनी मोठ्या हौशेने लावलेला 'कळणे एकजुटीचा विजय असो' हा फलक एकाएकी गायब कसा झाला...?? की काळाच्या ओघात कळणेवासियांच्या एकजुटीच्या संकल्पनाच पुसट झाल्या...???"

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

हिमालयालाही हेवा वाटावा असा सह्याद्रीचा सुपुत्र...




15 नोव्हेँबर 1989... याच दिवशी क्रिकेटच्या क्षितीजावर सचिन नावाच्या ता-याचा उदय झाला आणि आज करियरच्या मावळतीकडे झुकत असताना या ता-याने क्रिकेटच्या क्षितीजालाचवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेजेमतेम दहा ते वीस देशातखेळल्या जाणा-या क्रिकेट खेळाला जगन्मान्यता मिळाली तीच मुळी सचिनमुळे...! क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजे क्रिकेट हे समीकरण आईनस्टाईनच्या e=mc2 सिद्धांतासारखे जगप्रसिद्ध झाले.
गावात भजनाला सुरुवात करण्यापुर्वी नांदी म्हटली जाते आणि या नांदीवरुन एकंदरीत भजनाच्या दर्जाची कल्पना येतेसचिनच्या क्रिकेट करियरची कल्पना त्याच्या क्रिकेट पदार्पणाच्या नांदीवरुनच जाणकरांना आली होतीज्या संघाच नाव घेतल्यावरही भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे राहतात असा पाकिस्तानचा संघ सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नांदी करण्यासाठी मिळालापदार्पणाच्या दौ-यातच अशा दोन घटना घडल्या ज्यांनी सचिन काय चीज आहे याची जाणीव क्रिकेट जगतालाकरुन दिलीपाकिस्तानच्या गोलंदाजीच्या तोफखान्यात त्यावेळी इम्रान खान आणि वसिम अक्रम यांच्यासमवेत वकार युनुसची एंट्री झाली होती.16 वर्षीय सचिनच्या लहानग्या देहयष्टीचा वकारच्या चेँडुने थेट वेध घेतलासचिनने पहिल्यांदाच परिधानकेलेली भारताची पांढरी जर्सी रक्ताने लाल झालीअगदी कसलेला खेळाडु सुद्धा अशा बिकट परिस्थितीत 'रिटायर हर्टहोऊन तंबुमध्ये परतला असता पण रणांगणातुन पळ काढत माघार घेणे सचिनच्या रक्तातच नसावेप्रतिकुल
परिस्थितीतही झुंज देण्याची व्रुत्ती सचिनने बाजीप्रभु देशपांडेतानाजी मालुसुरेँच्या महाराष्ट्राच्या मातीतुनच वारसाहक्कात घेतली होतीएव्हाना जगालाही पहिल्याच दौ-यात सचिनच्या लढवय्या व्रुत्तीचा अनुभव आला होतात्यानंतरच्या सामन्यात पाकिस्तानचा जगविख्यात स्पिनर अब्दुल कादिरने सचिनला 'दुध पीता बच्चाअसे हिणवत खोड काढलीबिचा-या कादिरला तरी कुठे माहित होते की हा 'दुध पीता बच्चाबाळ श्रीक्रुष्णाने पुतना मावशीच्या केलेल्या वधाच्या गोष्टी ऐकुन मोठा झालेला.सचिनने पुढच्याच षटकात कादिरची गोलंदाजी फोडुन काढत त्याची हालत पुतना मावशीपेक्षाही बेकार करुन टाकलीनियतीचा खेळही असा की सचिनची हिच फटकेबाजी कादिरसाठी पुढील आयुष्यात फलदायी ठरावीपुढच्या आयुष्यात सचिन इतका मोठा क्रिकेटपटु बनला की कादिरने क्रिकेट खेळुन जितके पैसे कमावले नसतीलतितके पैसे पुढील काळात विविध
वाहिन्यांना सचिनच्या पहिल्या दौ-यातील आठवणीँच्या मुलाखती देत कमावले.
  मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे हे सचिनकडुनच शिकावेसुरुवातील वन-डेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणा-या सचिनला जेव्हा सलामीला फलंदाजी करायची संधी मिळाली तेव्हा शतकांच्या फुलांची तोरणे करुन तो जगातील सर्वश्रेष्ठसलामीवीर ठरलामधल्या काळात शेन वाँर्नच्या स्पिनने दहशत माजवली होती पण त्याच वाँर्नला सचिनने असा काही धुतला की वाँर्नला जळी-स्थळी-काष्ठी-पाताळी सचिनच सचिन दिसु लागलासचिनचे नेहमीच एक फलंदाज म्हणुन गोडवे गायले जातात पण आमचा सचिन गोलंदाजीतही तितकाच तरबेज होताहिरो कपची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सेमीफायनल कोणी कशी काय विसरु शकेल...? शेवटच्या षटकात जिँकण्यासाठी आफ्रिकेला 6 चेँडुत 3 धावांची गरज असतानासचिनने कर्णधार अझरुद्दीनच्या हातातुन चेँडु काढुन घेतला आणि आपल्या कल्पकतेतुन गोलंदाजीचा असा काही अविष्कार प्रकट केला की भलेभले गोलंदाजही तोँडात बोटे घालुन सचिनची गोलंदाजी पाहु लागलेसचिनने शेवटच्या षटकात आफिक्रेला 3धावाही करु दिल्या नाहीत आणि भारत सामना जिँकलाएका कसोटीत मोईन खानला सचिनने टाकलेला चेँडु इतका वळला की आजही त्याची तुलना 'Magic Ball' या प्रकारात होतेएक अव्वल फलंदाज असुन देखील आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर जमा असलेल्या 200 विकेट्स एक गोलंदाज म्हणुनही तो किती महान होता याचीच साक्ष देतात.
            जगात सर्वाधिक सहा विश्वचषक खेळणारा सचिन हा एकमेव खेळाडु आहे आणि सचिनसाठी देशाला विश्वचषक किती महत्वाच होत याची जाणीव भारत 2011 विश्वकप जिँकल्यावर भर मैदानात युवराजला घट्ट मिठी मारत सचिनच्या डोळ्यात तरळलेले अश्रु करुन देतातया 6 विश्वचषकांपैकी 1996 आणि 2003 मध्ये सचिनने सर्वाधिक धावा केल्या होत्या.त्यामुळेच भारताला या दोन्ही विश्वकपात अनुक्रमे सेमीफायनल आणि फायनलला पोहोचणे शक्य झालेभारताने जिँकलेल्या 2011 विश्वकपातही दिलशान नंतर सर्वाधिक धावा करणारा सचिनच होता.1999 विश्वचषक सुरु असतानाच सचिनच्यावडिलांचे अचानक निधन झालेदेशाची अंतःकरणाने अविरत सेवा करणा-या एका महान खेळाडुच्या मनाची परमेश्वराने घेतलेली ही अग्निपरीक्षाच असावीएकीकडे लहानपणापासुन सावलीप्रमाणे वावरणा-या वडिलांना अग्नी देऊन कायमचा निरोप घ्यायचा होता आणि दुसरीकडे देशाचे आव्हान विश्वचषकात अबाधित राखायचे होतेस्वभावतः भावनिक असणारा सचिन याभावुक परिस्थितीत मात्र स्थितप्रज्ञराहिलावडीलांना अग्नी देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आणि त्याच मनःस्थितीत केनियाविरुद्ध दणदणीत शतक देखील झळकावलेअगदी त्या सामन्यापासुन सचिन प्रत्येकशतकावेळी आणि प्रत्येक रेकाँर्डवेळी वर बँट उंचावुन आकाशाकडे डोळे करत सगळ काही सर्वप्रथम वडिलांना समर्पित करतोसचिनच्या आयुष्यातील त्याच्या वडिलांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी हे पुरेसे आहे.अशा वडिलांना गमावल्यानंतरही सचिन राष्ट्रीय कर्तव्य बजावत विश्वचषकातील उर्वरित सामने खेळला ही गोष्ट त्याची देशाप्रती असलेली निष्ठाक्रिकेटप्रती केलेले समर्पण आणि वडिलांनी केलेले उच्च प्रतीचे संस्कार नमुद करतातकदाचित वडीलांकडुनमिळालेले हेच संस्कार सचिनला 24 वर्षाच्या करियरमध्ये निष्कलंक ठेवु शकलेएवढी वर्षे सार्वजनिक आयुष्यात प्रसिद्धीच्या अत्त्युच्च शिखरावर राहणा-या माणसावर चिखल उडवायला टपलेल्या हितशत्रुंची कमी नसतेचंद्रावरही डाग आहेत पणसचिनच्या करियरवर कोणी ठरवुनही डाग लावु शकला नाहीमँच फिक्सिँगच्या वावटळीत पुर्ण भारतीय टिम ढवळुन निघालीक्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारे भारतीय रसिक हताश झाले पण त्यांचा क्रिकेटवरचा विश्वास कायमराहिला कारण विश्वासाहार्तेचे प्रतीक असलेला सचिन क्रिकेट खेळत होतामुळात भारतात क्रिकेट खेळच धर्माच्या पंक्तीत गणला जाऊ लागला कारण सचिनला लोकांनी मनापासुन 'देवमानला होताआज धोनीकोहलीच्या कमाईशी सचिनच्यासध्याच्या कमाईची तुलना करुन त्याला कमी लेखण्याचा उपद्व्याप काही उपटसुंभ मंडळी करताना दिसतात.त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आज धोनीकोहली ज्या ताटावर बसुन पाचही बोटे तुपात घालुन जेवत आहेत ते ताट तयार करणाराच मुळी सचिन आहेक्रिकेटला भारतात मिळालेल्या ग्लँमरमुळे आज खेळाडुंना भरपुर पैसा मिळतोय पण या खेळाला हे ग्लँमर मिळण सचिन शिवाय कधी शक्यच झाल नसतअन्यथा क्रिकेटची हालतही हाँकीपेक्षा फार वेगळी नसतीअगदी सचिनच्या काळात द्रविडगांगुलीकुंबळे आणि त्यानंतर सेहवागयुवराजधोनीकोहली यांनी भारतीय क्रिकेटसाठी भरीव योगदान दिले पण क्रिकेटरसिकांसाठी ते फार फार तर 'देव-गणम्हणुन गणले गेले कारण सचिन त्यांच्यासाठी नेहमीच 'देव'पदी कायम सिँहासनारुढ राहिलासचिनच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक खेळाडु एकदम धमाका करत आलेकाजव्याप्रमाणे काही काळ चमकले आणि नंतर लुप्तही झाले पण सचिन नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितीजावर 24 वर्षे तळपत राहिलायश मिळवण कठीण असत पण त्याहीपेक्षा मिळवलेल यश टिकवण खुप कठीण असतचारसामन्यात यश मिळाल्यावर हुरळुन जात पबमध्ये दारुच्या पार्ट्या करत फिरणारेबाँलिवुडमधल्या ललनांवर भाळुन पेज थ्री वर अफेयर्सच्या चर्चाँनी रकानेच्या रकाने भरणारे खेळाडु काळाच्या ओघात केव्हाच नाहीसे झाले कारण यश मिळाल्यानंतर त्यांना क्रिकेटशिवाय नसते उद्योगच खुप सुचायचेमात्र गेली 24 वर्षे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला सचिन कधी पब मध्ये दारुच्या पार्ट्या करत असल्याचे निदान माझ्या तरी ऐकीवात नाहीसचिनने अंजलीवर प्रेम करुन तिच्याशीच लग्न करत क्रिकेटसारखा तिच्याशीही एकनिष्ठच राहिलाबाँलिवुडच्या नट्यांची सावली देखील त्याने आपल्या क्रिकेट करियरवर आणि सुखी संसारावर पडु दिली नाहीद्वारकानाथ संझगिरी सचिनची आठवण सांगताना म्हणतात की सचिनला झोपेत चालायची सवय होती आणि सचिन ज्या बिल्डीँगमध्ये राहायचा त्याच्या वरच्याच मजल्यावर विश्वसुंदरी ऐश्वर्या राय राहायची पण चुकुन सुद्धा रात्री झोपेतही सचिनचे पाय ऐश्वर्याच्या घराकडे वळले नाहीतसचिन फक्त 'आदर्श क्रिकेटर' नव्हे तर 'आदर्शपुरुष'ही होताआणि ही किमया होती त्याचे वडील रमेश तेँडुलकर यांनी लहानपणी त्याच्यावर केलेल्या संस्कारांची...!
      क्रिकेटच्या मैदानावार सचिनला डिवचण्यासाठी अनेक खेळाडुंनी शेरेबाजी केलीकाही प्रसंगी त्याला शिव्यादेखील दिल्या आणि त्याने मात्र या सगळ्यांना बँटने उत्तर देऊन गप्प केलेसचिनने कधी प्रतिस्पर्धी खेळाडुंना किँवा विरोधी टिमच्या पाठीराख्यांना शिवीगाळ केली नाहीविराट कोहलीसारख्या तरुण खेळाडुने अंगीभुत कौशल्य असुन मैदानावर असभ्य वर्तनकरताना सचिनचा आदर्श लक्षात घेण्याची गरज आहेराग सचिनला देखील यायचा पण त्याची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असायचीएकदा झिम्बाब्वेच्या हेन्री ओलोँगो या गोलंदाजाने एकदाच सचिनची विकेट मिळाल्यावर बढाया मारायला सुरुवात केलीत्याला पुढच्याच सामन्यात सचिनने असा काही चोपला की पुन्हा कधी तो सचिनकडे नजर वर करुन बघु शकला नाही.2003 विश्वचषकाच्या अगोदर सचिन पाठदुखीने त्रस्त होतात्यावेळी पत्रकार परिषदेत अँडी कँडीक हा इंग्लंडचा गोलंदाज सचिनवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला की सचिनला मी भारतीय संघातील बाकीच्या खेळाडुंप्रमाणेच सामान्य लेखतोपाठदुखीमुळे आता तर तो षटकार देखील मारु शकत नाहीदुस-याच दिवशी सचिनने इंग्लंडविरुद्ध 50 धावांची छोटेखानी खेळी केली आणि याच खेळीत कँडीकला पुढे सरसावत असा षटकार खेचला की चेँडु मैदानाबाहेर जाऊन पडलात्यानंतरच्याच सामन्यात सचिन कँडीकचे आव्हान स्विकारुन त्याला षटकार मारु
शकतो पण शोएब अख्तरच्या वेगाचा सामना करत षटकार खेचु शकत नाही अशा वल्गना अख्तरकडुन करण्यात आल्यात्यावेळी पायाची अप्रतिम हालचाल करुन सचिनने शोएबला लगावलेला षटकार क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात चांगल्या फटक्यांपैकी एक म्हणुन गणला जातोत्यावेळी नाँन स्ट्राईकवर असलेल्या सेहवागने अख्तरला सांगितले की"आखिर बाप बाप होता है...!"
            सचिनने शंभर शतके झळकावली खरी पण माझ्यासाठी सचिनने पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील त्या सामन्यात केलेली 98 धावांची खेळी त्याची आजपर्यँतची सर्वात चांगली खेळी आहेएकीकडे वकारअक्रमअख्तर असा जगातीलसर्वात चांगला वेगवान मारादुसरीकडे भारताला तो सामना जिँकणे अनिवार्य होते आणि त्यात भरीस भर म्हणुन पाकिस्तानने 273 धावांचा उभा केलेला डोँगर या परिस्थितही सचिन अक्षरशः तुटुन पडला आणि पाकड्यांचा फडशा पाडला.आँस्ट्रेलियन गोलंदाज ब्रँड हाँग एकदा सचिनची विकेट मिळवल्यानंतर अतिउत्साहाच्या भरात चेँडुवर सचिनची स्वाक्षरी घेण्यासाठी गेलासचिनने चेह-यावर स्मितहास्य ठेवत हाँगला स्वाक्षरी दिली पण सोबत संदेश लिहुन दिला की यापुढच्या काळाततुला पुन्हा माझी विकेट मिळणार नाही याची नक्की काळजी घेईनआश्चर्य म्हणजे त्यानंतर तब्बल 27 वेळा तेँडुलकरहाँग आमने सामने आले पण हाँग काही सचिनची विकेट घेऊ शकला नाहीएखाद्या प्रतिस्पर्धी खेळाडुचे आव्हान स्वीकारण्यात काहीच गैर नाही पण ते करताना आपली सभ्यता कधी सोडायची नसते हाच संदेश सचिनने अवघ्या क्रिकेट
जगताला दिलासचिनच्या याच सभ्यतेचा सन्मान जगाने केलाआँस्ट्रेलियात हरभजन-सायमंड्स यांच्यातील 'मंकीगेटप्रकरण गाजले तेव्हा आयसीसीच्या कोर्टात दोन्ही संघांकडुन आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेमात्र अंतिम न्याय निवाडा करतानादस्तरखुद्द आयसीसीने सचिनची साक्ष प्रमाण मानुन हरभजनला निर्दोष ठरवलेरेकाँर्डच्या बाबतीत रिकी पाँटिँग सचिनच्या कितीही जवळपास पोहचत असला तरी एक खेळाडु म्हणुन सचिनच्या पायाजवळही पोहोचत नव्हता आणि सचिनच्या याच खिलाडुव्रुत्तीला आयसीसीने विश्वासार्ह ठरवलेसचिनची ही सभ्यताच त्याला संघातील इतर खेळाडुंपेक्षाच नव्हे तरक्रिकेट या खेळापेक्षाही फार मोठ्या उंचीवर घेऊन गेलीत्यामुळेच कोणत्याही प्रश्नावर कधीही एकी  दाखवणारे संसदेतील खासदार जेव्हा वेस्ट इंडिजमध्ये सचिनवर चेँडु कुरतडण्याचे आरोप झाले तेव्हा त्याचा निषेध नोँदवायला एकत्र आले.स्वभावातील सभ्यतेमुळेच क्रिकेटपलीकडे जाऊन सचिन देशाचे प्रतीक म्हणुन ओळखला जाऊ लागला आणि त्याच प्रतीकावर हल्ला झाल्याने देशाच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार एकवटलेभारत देशाला जाती-धर्माच्या किडीने
फार पुर्वीपासुन पोखरले आहेअगदी पुरोगामी महाराष्ट्राचा विचार केला तरी आंबेडकरसावरकरटिळक या राष्ट्रपुरुषांना देखील जाती धर्माच्या चौकटीत विभागले गेलेमात्र सचिन तेँडुलकरने जाती-धर्माच्या सीमा पार करुन सामान्यातील सामान्य माणसाचे प्रेम मिळवलेअशी काय जादु असेल सचिनच्या खेळात जी अनेकांना त्याची भुरळ पाडायची...? तंत्राच म्हणाल तर गावस्करद्रविड यांच्याएवढा सचिन नक्कीच तंत्रशुद्ध नव्हतासचिनचे गुरु आचरेकरच सांगायचे की सचिनची बँटधरण्याची पद्धत तांत्रिकद्रुष्ट्या योग्य नव्हती पण आपण ती मुद्दामच बदलली नाहीआक्रमकतेच म्हणाल तर सेहवागयुवराजधोनी यांच्याएवढा सचिन आक्रमकही नव्हता तरीसुद्धा तो या सगळ्यांना वरचढ ठरलाडाँन ब्रँडमनना सचिन खेळतानात्याच्या खेळात ब्रँडमनना आपल्या खेळाचा अंश दिसु लागलाअगदी क्रिकेटची जाण नसलेल्या सामान्य माणसालाही तो आपला वाटु लागला कारण सचिन तेँडुलकर तंत्र आणि आक्रमकता याचा मिलाफ होतासचिनचा खेळ द्रविडसारखा रटाळ वाटायचानाही आणि सेहवाग-धोनीसारखा ओबडधोबड देखील वाटायचा नाहीहीच त्याच्या खेळाची खासियत होती जी क्रिकेटरसिकांना अक्षरशः वेड लावायचीभारताचा सामना असला की भारताचा स्कोअर किती झाला या प्रश्नाला जोडुन 'तेँडल्याने किती केले...?'हा प्रश्न हमखास असायचाप्रत्येक सामन्यात सचिनने जास्तीत जास्त धावा कराव्यात अशी भाबडी भावना त्यामागे असायचीसचिनबद्दल कित्येक लोकांची आपुलकी एवढी असायची की तो त्यांना त्यांच्या घरातीलच एक सदस्य वाटायचामैदानकोणतेही असो भारताच्या प्रत्येक सामन्यावेळी 'सचिन... सचिन...' हा गजर ठरलेलाच असायचागेल्या पाच-सहा वर्षात आयपीएलमुळे प्रत्येक खेळाडु प्रांतांची लेबल लावुन खेळु लागलेकोणत्याही भारतीय खेळाडुला होम ग्राऊंडचे मैदान वगळता शक्यतो इतरत्र पाठिँबा मिळत नसेविराट कोहलीचा तर वानखेडे स्टेडियमवरप्रेक्षकांनी अक्षरशः हुर्यो उडवलामात्र या सगळ्याला अपवाद होता सचिन तेँडुलकरचा...! सचिन अगदी आयपीएललाही मुंबईबाहेर सामना खेळायला जायचा तेव्हा तिथले प्रेक्षक सचिनची बँटिँग सुरु असताना आपल्या होम टीमला काही काळापुरते विसरुन सचिननामाचा जयघोष सुरु करायचेयालाच म्हणतात प्रांतिक सीमा ओलांडुन पुढे गेलेला खेळाडु...! कुणाचीही तारीफ करण्यात कंजुषी दाखवणारे आँस्ट्रेलियन खेळाडु देखील याच कारणासाठी सचिनची तारीफ करण्यात मश्गुल असायचेमँथ्यु हेडन म्हणायचा की मी देव पाहिलाय आणि तो भारतासाठी कसोटीत चौथ्या क्रमांकावरबँटिँग करतोआँस्ट्रेलियन खेळाडुंनी सचिन पुरेपुर अनुभवला होता.100 शतकांपैकी तब्बल 20 शतके सचिनने बलाढ्य समजल्या जाणा-या आँस्ट्रेलियाविरुद्धच लगावलीशारजामध्ये सचिनने एकापाठोपाठ एक लगावलेली घणाघाती शतके आजहीआँस्ट्रेलियन खेळाडुंच्या स्वप्नामध्ये येत असतीलशारजातील त्या सामन्यात वादळ आल्यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला होता पण नंतर जेव्हा खेळ पुन्हा सुरु करण्यात आला तेव्हा सचिन नावाच्या वादळाने आँस्ट्रेलियन खेळाडुंची दाणादाण उडवलीसचिनच्या याच वैशिष्ट्यामुळे अँडी फ्लाँवर त्याची स्तुती करताना म्हणतो की या जगात दोन प्रकारचे फलंदाज आहेतएक म्हणजे सचिन तेँडुलकर आणि दुसरे बाकीचे फलंदाजसचिनच्या संघसहका-यांमध्येही त्याच्याबद्दल असलेला आदर वेळोवेळी व्यक्त झालेला आहेविश्वचषक जिँकल्यानंतर सचिनला खांद्यावर उचलुन विराट कोहलीनेमैदानाला चक्कर मारलीत्यावेळी तुझ्या खांद्यांना सचिनच ओझ नाही का वाटलअसा प्रश्न पत्रकारातुन विचारण्यात आलात्याला उत्तर देताना विराट म्हणाला,
"ज्या माणसाने गेली 20 वर्षे विनातक्रार करोडो लोकांच्या अपेक्षांच ओझ आपल्या खांद्यावर घेतलत्याच माझ्या खांद्यांना कसल आलय ओझ...?"
खरच हे वाक्य खुप काही बोलुन जात.463 वन-डे आणि 200 कसोटी सचिन क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखालीभरडला गेलादेव या संकल्पनेबद्दल नक्कीच मत-मतांतरे असतील पण इतकी वर्षे करोडो लोकांच्या अपेक्षांचा भार स्वतःच्याखांद्यावर झेलुन त्यांना त्यांच्या आयुष्यातील दुःख विसरायला लावुन निखळ आनंद देणे फक्त देवालाच जमतेआम्ही हा देव माणसामध्ये पाहिलाय आणि तो सुद्धा सचिनमध्येच पाहिलाययशाच्या सातव्या आसमानावर असताना पाय जमिनीवर ठेवुनविनम्रतेचीशालीनतेची जीवंत मुर्ती असलेला सचिन 'देवमाणुस' आहे.
                सचिनच्या निव्रुत्ती देखील त्याच्यासारखीच अनन्य आहेअशी राजेशाही निव्रुत्ती क्रिकेटच नव्हे तर कोणत्याच खेळातील कोणत्याच खेळाडुच्या नशीबी आली नसेलस्वतःच्या होम ग्राऊंडवर निव्रुत्त होणारा सचिन पहिलाच क्रिकेटर
असल्याने पंढरपुरच्या आषाढी एकादशीप्रमाणे वानखेडे स्टेडियमवर अमाप गर्दी लोटतेय कारण क्रिकेटरसिकांसाठी सचिन हा क्रिकेटचा विठ्ठलच होता.विठ्ठलाच्या क्रिकेटच्या मैदानावरील अवतारसमाप्तीच्या कल्पनेनेच देशात करोडो डोळे पाणावले आहेतसचिनला निरोप देण्यासाठी प्रत्येकजण वानखेडेवर येऊ पाहतोय कारण सचिनची निव्रुत्ती हा ऐतिहासिक क्षण आहे.तुम्ही पुढच्या अनेक पिढ्यांना अभिमानाने सांगु शकता की आम्ही क्रिकेटच्या देवाला निव्रुत्त होताना पाहिलयलेखाची समाप्ती करताना मला महाभारतातील भीष्मपितामह आणि सचिनच्या निव्रुत्तीची तुलना करण्याचा मोह आवरणे कठीण होतेय.भीष्मांना महाभारतात इच्छामरणाचे वरदान होते तसेच सचिनलाही इच्छानिव्रुत्तीची सवलत बीसीसीआयने बहाल केली होतीमहाभारतातील युद्धाचा निकाल लागल्यानंतर बाणशय्येवर झोपलेल्या भीष्मांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्या युगपुरुषाचीनिव्रुत्ती बघायला आकाशात देव जमा झाले होतेआज देशाला विश्वचषक मिळवुन दिल्यावर आणि यशाची अनेक एव्हरेस्ट पादाक्रांत केल्यावर सचिनने देखील क्रिकेटमधुन अवतारसमाप्तीची घोषणा केली आहेक्रिकेट एक तपश्चर्या समजुन आयुष्यजगलेल्या या व्रतस्थ खेळाडुची निव्रुत्ती पाहायला स्वर्गातील देव आकाशात पुन्हा उभे राहतीलनदी-सागरपर्वतरांगा सगळे सचिनच्या क्रिकेटमधील कार्याला सलाम देण्यासाठी त्याचा शेवटचा सामना पाहतीलत्यावेळी भारताच्या उत्तर सीमेवरदिमाखात उभ्या असणा-या हिमालय पर्वताला आपल्या सह्याद्रीचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाहीहिमालय नक्कीच सह्याद्रीला साद घालुन सांगेल,
"हे सह्याद्रीतु खरच खुप नशीबवान आहेसनियतीने माझ्या पोटी लाखो गोष्टी दिल्या पण लाखमोलाचा सचिन मात्र तुझ्याच पदरी दिलासचिन खरच 'तयासम तोचिप्रकारातला खेळाडु आणि माणुस आहे.क्रिडाजगतात ऐसा सचिन पुन्हा होणे नाही."