रविवार, ६ एप्रिल, २०१४

नाना पोटी, नाना कळा...!



"नाना पोटी, नाना कळा..."

ऐकलत का...! आपला तथाकथित क्रांतिवीर नाना पाटेकर हल्ली व्यथित झालाय. का तर म्हणे नानाला गेल्या 60 वर्षात कोणी मराठी माणुस पंतप्रधान झालेला बघायचा होता. नाना पाटेकर काही महिन्यापुर्वी 'प्रहार' वर्तमानपत्राच्या समारंभात असाच दुःखी झाला होता. त्यावेळी 'कोकणचा वाघ' पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला नाही याच नानाला दुःख होत. नानाच्या लेखी पडिक आणि ओसाड असलेल्या जमिनी लोक जैतापुर अणुप्रकल्पाला देत नाहीत, याचही प्रचंड दुःख होत. मला वाटत चित्रपटात काम करता करता नानाने साईड बाय साईड अणुशास्त्रातील पदवी संपादन केली असावी. जैतापुर अणुप्रकल्प कोकणच्या फायद्याचा कसा यावर एखादा शास्त्रज्ञ असल्याच्या अविर्भावात तो मुक्ताफळे उधळीत होता. नंतर थोड्याच दिवसात नानाला सिँचन घोटाळेबाज तटकरे प्रेमाचे झटके येऊ लागले. आता वर दिलेला नानाचा पुर्वेतिहास पाहता नानाला अचानाक 'मराठी पंतप्रधान' का पाहिजेय, ते तुमच्या एव्हाना लक्षात आलच असेल. समझनेवालोँको इशारा काफी होता है. नानाची अवस्था सध्या झापड लावलेल्या घोड्यासारखी झालीय. काँग्रेस-एनसीपीच्या प्रेमात बुडाल्याने तो अशी बडबड करतोय. नाना पाटेकर ज्या 'मराठी पंतप्रधाना'कडे बोट दाखवतोय तो नेता कधीच पंतप्रधानपदाच्या आसपास देखील पोहोचला नाही. पंतप्रधान बनण्याची संधी मराठी माणसाकडे चालुन आली होती. राजापुर मतदारसंघाचे माजी खासदार मधु दंडवतेँकडे ती संधी चालुन होती आणि तत्वांच्या पुजा-याने ती विनम्रतापुर्वक नाकारली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर मागच्या दाराने राज्यसभेतुन निवडुन जात किँवा अन्य मतदारसंघातुन निवडणुक लढवुन पुन्हा निवडुन येत मधु दंडवते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. नाना ज्या नेत्याला पंतप्रधानपदी बसवु इच्छितो त्याच्याकडे ही संधी चालुन आली असती तर हव्या तशा राजकीय माकडउड्या मारुन पंतप्रधानपद पदरात पाडुन घेतले असते. मात्र तत्वांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिल्याने दंडवतेनी पंतप्रधानपद नाकारले. माझ्या लोकांनी माझा पराभव केला तेव्हा मी पंतप्रधानपदी बसणे योग्य नव्हे हे दंडवतेँनी अवघ्या देशाला दाखवुन दिले. मराठी माणुस पंतप्रधान बनु शकला नाही कारण पंतप्रधानपद नाकारण्यासाठी लागणारे मोठे मन आणि निःस्वार्थी व्रुत्ती मधु दंडवतेँकडे होती. आम्हाला पंतप्रधानपद न मिळाल्याचे अजिबात दुःख नाही कारण पंतप्रधानपद विनम्रपणे नाकारणारा नेता देशा अन्यत्र कुठेच सापडणार नाही. तत्वांना प्राणापेक्षा जास्त जपणा-या दंडवतेँचा पुढच्या कित्येक पिढ्यांना अभिमानच राहिल. दंडवतेँचा उल्लेख आम्ही 'नाना' असाच करायचो आणि आज हे असले स्वार्थी आणि मिँधेगिरी करणारे 'नाना पाटेकर' जन्माला आले आहेत. नानाने किमान नावाची लाज बाळगली असती तरी खुप झाल असत.

आता नाना ज्या तथाकथित जाणत्या राजाला पंतप्रधानपद मिळाल नाही म्हणुन दुःखी आहे त्याबद्दल बोलु. नानाला आठवण करुन देऊ इच्छितो की काही शतकांपुर्वी महाराष्ट्रात जाणता राजा होऊन गेला होता.

'निश्चयाचा महामेरु, बहुत जनासि आधारु'
अशी त्याची ख्याती होती. तुमचा तथाकथित जाणता राजा
'भ्रष्टाचाराचा महामेरु, बहुत चोरांसि आधारु'
एवढ्या एकाच कामासाठी देशात ओळखला जातो.
म्हणे मराठी माणसे आपल्याच माणसांचे पाय ओढतात. अरे जा, जाऊन विचार त्या आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना की याला तुम्ही पंतप्रधानपदी पाहु इच्छिता का...? जा तिकडे लवासामध्ये जमिनी हडपलेल्या आदिवासी लोकांकडे आणि विचार त्यांना याला पंतप्रधान करुया का...?? असल्या भ्रष्टाचारी नेत्यास पंतप्रधान केल तर उद्या देश विकुन खायलाही मागेपुढे पाहणार नाही अशीच यांची व्रुत्ती आहे. मराठी लोक मुळातच समजुतदार आहेत आणि असल्या भ्रष्ट नेत्याला पंतप्रधानपदासाठी कधीच समर्थन करणार नाहीत.

भ्रष्टाचारी लोकांच्या व्यासपीठावर जाऊन भ्रष्टाचारविरोधी भाषणे कसली देतोस...? काय तर म्हणे लोक षंड आहेत आणि ते भ्रष्टाचारी नेत्यांना जाब विचारत नाहीत.
अरे जाब विचारत नसतीलही पण तुझ्यासारखी लाज-लज्जा सोडुन भ्रष्टाचारी नेत्यांसोबत दिवसा-ढवळ्या फिरत तरी नाहीत. आणखी किती लाचार होशील...? तु ज्या तटकरे, राणे, पवारांसोबत फिरतोस ते कोणी साधुपुरुष आहेत का...?? मग त्यांना का विचारत नाहीस की बाबांनो लोकांना अजुन किती लुबाडणार आहात...??? तिकडे तुझी बोबडी वळत असणार कारण त्यांची तळी उचलण्यासाठीच आजकाल तुला भरपुर मलिदा मिळतोय.

चित्रपटात देशप्रेम उफाळुन आले म्हणुन तुझ्यासारखा मतलबी मनुष्य देशभक्त होत नसतो. तस असत तर आज संजय दत्त तुरुंगात जाण्याऐवजी गांधीवादाचे धडे देत फिरला असता. चित्रपटात गांधीँचे धडे दिले म्हणुन संजय दत्त गांधी बनत नसतो, तो आतंकवादीच राहतो. अरे तुमच्यासारख्या चार कवडीच्या नटांची लायकीच काय असते...? फक्त भारतात मुर्खाँची कमी नाही म्हणुन ते चित्रपटातल्या भुमिका बघुन तुझ्यासारख्या तीनपाट नटाला देशभक्त समजण्याची चुक करुन बसतात. यापुढे चित्रपटातुन लोकांना देशभक्तीचे धडे देण्यापेक्षा काँग्रेस-एनसीपीच्या नेत्यांचा अधिक्रुत भाट बनलास तर आणखी पैसे मिळतील. बर झाल लवकरच तुझे खरे रंग दाखवलेस ते...! चित्रपटातुन देशभक्तीची नौटंकी पुरे झाली. तु सोँगाड्या आहेस आणि सोँगाड्याच राहशील. या नौटंकीच्या जोरावर तु सगळ्या लोकांना काही काळासाठी मुर्ख बनवु शकशील किँवा काही लोकांना कायमस्वरुपी मुर्ख बनवु शकशील पण सगळ्या लोकांना कायमस्वरुपी मुर्ख बनवु शकत नाहीस. यापुढे जनमानसात तुझी ओळख 'नाना लावतोय चुना' अशीच केली जाईल.

झुंज दोन वाघांची...!



"झुंज दोन वाघांची...!"

आठवतेय का 2005 साली झालेली मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक...? कागदोपत्री नारायण राणे विरुद्ध परशुराम उपरकर अशी लढत असली तरी प्रत्यक्षात नारायण राणे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे असाच त्या लढतीचा नुर होता. शिवसेनेत असताना 'कोकणचा वाघ' म्हणुन ख्याती असलेले नारायण राणे अन्याय झाला अशी आवई उठवत सेनेला 'जय महाराष्ट्र' करुन बाहेर पडले होते. झुंजार व्रुत्ती आणि शत्रुला शिँगावर घ्यायची तयारी यामुळे शिवसेना संपवुन टाकण्याच्या हेतुनेच राणे त्वेषाने तुटुन पडले. राणेँच्या एकट्याच्या टेकुवर कोकणातील शिवसेना उभी करण्याची चुक एव्हाना बाळासाहेबांच्या लक्षात आली होती. राणेँनी पाठिँबा काढुन घेतल्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मात्र या प्रतिकुल परिस्थितीत हार मानतील तर ते बाळासाहेब कसले...? 'हार' शब्द बाळासाहेबांच्या डिक्शनरीत नव्हता. शारिरिक वयोमानाच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवत असल्या तरी बाळासाहेबांच्या मनातील वाघ नेहमीसारखाच तरुण होता.सिँधुदुर्गच्या मातीत पाय ठेवल्यानंतर पत्रकाराने केलेल्या प्रश्नाच उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले-

"किसने की है बगावत...?"

बाळासाहेबांची शैली मिश्किल असली तर सिँधुदुर्गात आल्यावर पराभवाची चाहुल लागली होती. तरी सुद्धा प्रचारसभेत बाळासाहेब राणेँवर तुटुन पडले. आयुष्यात प्रथमतः स्टेजवर नतमस्तक होऊन त्यांनी सिँधुदुर्गातील लोकांना शिवसेनेला मत देण्याचे आवाहन केले पण अखेरीस त्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम देखील बाळासाहेब वाचवु शकले नाही. कोकणच्या वाघासमोर शिवसेनेचा वाघ अक्षरशः चारी मुंड्या चीत झाला. त्यावेळी एका वर्तमानपत्रात आलेले व्यंगचित्र अगदी सुचक असे होते. एकीकडे वयाने व्रुद्ध आणि थकलेला वाघ दाखवलेला. समोर तरणाबांड वाघ डरकाळ्या फोडत होता. त्या वाघाला पाहुन व्रुद्ध वाघ "अरे बापरे, हा तर कोकणचा वाघ" असे उद्गार काढुन पळत होता.

मित्रांनो, इतिहासाची पुनराव्रुत्ती होतच असते फक्त पात्र तितकी बदलतात. 2005 साली कोकणात राणेँचा दबदबा होता. त्यावेळी कोणी भविष्यवाणी केली असती की,
"भविष्यात शिवसेनेचा एखादा नेता राणेँना हिँमत असेल तर माझ्याविरुद्ध निवडणुक लढवुन दाखवा."
असे आव्हान देईल. तर अशा भविष्यकारालाच लोकांनी वेडात काढले असते. शेवटी हे राजकरण आहे. इकडे कोणी कायमस्वरुपी नेता राहत नसतो. काळ बदलतो, वेळ बदलते आणि शेरास सव्वाशेर भेटतो. इतके दिवस नारायण राणे इतर नेत्यांना स्वतःविरुद्ध निवडणुक लढवण्याचे आव्हान देत असत. आज वैभव नाईक साक्षात नारायण राणेँना माझ्याविरुद्ध निवडणुक लढवुन दाखवा म्हणुन आव्हान देतोय आणि तेही राणेँच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात...! मालवण मतदारसंघात...!!

2005 निवडणुकीनंतर मधल्या काळात पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेले. नारायण राणेँनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची अर्धी शक्ती स्वपक्षीयांशी लढे देण्यात खर्च होऊ लागली. त्याकाळात शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत वैभव नाईकने पक्ष पुन्हा एकदा नव्याने बांधुन काढला. परिणामी नव्या दमाची, सळसळत्या रक्ताची तरुण पोरे शिवसेनेत सामील झाली. जनसंपर्क इतका वाढवला की लोकांना आपल्यामध्ये मिसळणारा वैभव नाईक आपलासा वाटु लागला. दुसरीकडे अंतर्गत कुरघोडी करणा-यांना रोखताना राणेँची संघटनेवरील पकड सैल होत गेली. जुने काँग्रेस आणि राणे काँग्रेस या दोन्ही गटांचे कधीच मनोमिलन झाले नाही. त्यांच्यातील शीतयुद्धाने काँग्रेस नेहमीच धुमसत राहिली. त्यातच 2009 विधानसभा निवडणुकीत राणेँविरुद्ध वैभव नाईकलाच उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला ज्येष्ठ नेत्यासमोर पोरगा उभा राहिलाय म्हणुन अनेकांनी खिल्ली उडवली पण जसजशी निवडणुक जवळ आली तसतसा वैभवचा जोर वाढु लागला. निवडणुकीच्या दिवशी वैभववर पिस्तुल रोखायची वेळ विरोधकांवर आली. वैभव लौकिकार्थाने निवडणुक हरला असला तरी राणेँसारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध 50000 मते मिळवली यातच त्याचा विजय होता. लढवय्या वैभवने गेल्या 5 वर्षात मतदारसंघात असा जम बसवलाय की नारायण राणेँना येत्या विधानसभेसाठी कुडाळ-मालवण मतदारसंघ आपले पुत्र नितेश राणेँसाठी सोडला आहे. राज्यस्तरीय नेता असल्याने निवडणुकीच्या काळात राणेँना वैभव एवढा जनसंपर्क ठेवता येणार नाही. सी-वर्ल्ड विरोधामुळे वायंगणी-तोँडवलीसारखी गावे राणेँच्या पुर्ण विरोधात गेली आहेत. मच्छिमारांमध्ये राणेँविरोधात रोष आहे. अशा परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकविरुद्ध नारायण राणे उभे राहिले तर त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय.

नशीबाचे खेळ पण कसे असतात पहा ना...! नारायण राणे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे ही लढत सुद्धा दोन वाघांची लढत होती. फक्त या लढतीत राणे तरणेबांड वाघ होते आणि बाळासाहेब आपल्या तारुण्यात अनेक नेत्यांना पुरुन उरलेले असले मात्र त्या पोटनिवडणुकीवेळी वय वाढलेले आणि प्रक्रुतीने थकलेले वाघ होते.
आता वैभव नाईक विरुद्ध नारायण राणे ही लढत सुद्धा दोन वाघांमधील लढत आहे. मात्र यावेळी वैभव नाईक तरणाबांड वाघ या प्रकारात मोडतात आणि नारायण राणे एकेकाळी कोकणचे वाघ असले तरी आता त्यांच्यात पुर्वीचा दम राहिलेला नाही.

नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात फरक एवढाच आहे की राणेँच्या डरकाळीला प्रत्युत्तर देताना बाळासाहेब ठाकरे मैदान सोडुन पळाले नव्हते. पराभव निश्चित असताना त्या वयात देखील त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी टाकुन ठाकरी गर्जना केली होती. वाघ हरला तरी लढाईतुन पळ काढत नाही ही गोष्ट अधोरेखित केली होती. आता डरकाळी कणकवलीचा ढाण्या वाघ वैभव नाईकने दिली आहे. नारायण राणेँना पहिल्यांदाच कोणीतरी खुले आव्हान देतोय. नारायण राणे वैभवचे आव्हान स्वीकारुन कुडाळ-मालवण मतदारसंघात निवडणुक लढतात की रणांगण सोडुन पळ काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रभु सर्वत्र पुज्यते...!



"प्रभु सर्वत्र पुज्यते...!"

काल 27 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये भारताचे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी अधिवेशन घेण्यात आल. भाजप पक्षात विचारवंतांची कधीच कमी नव्हती पण जेव्हा एनडीएचे आर्थिक धोरण ठरवायची वेळ आली तेव्हा भाजपने कमिटी स्थापन करुन शिवसेनेच्या सुरेश प्रभुंनाच त्या कमिटीच अध्यक्षपद दिल. देशातील आणि जगातील नामवंत अर्थतज्ञांसोबत एनडीएच आर्थिक धोरण ठरवण्यात आल आणि त्यात सिँहाचा वाटा माझ्या मतदारसंघातुन चार वेळा निवडुन गेलेल्या सुरेश प्रभूंचा होता याचा एक कोकणी म्हणुन मला सार्थ अभिमान राहिल. बर्लिन आणि मुंबई विद्यापीठाची पीएचडी, लँटिन अमेरिकेची डाँक्टरेट, चार्टड अकाऊटंट, एल एल बी इतक्या पदव्या हातात असताना सुरेश प्रभुंना राजकरणात यथायोग्य सन्मान मिळण यात नवल काहीच नाही. मात्र दुर्देवाने शिवसेनेन लोकसभेची उमेदवारी नाकारुन सुरेश प्रभुंचा अपमान केला आहे. कोणतेही सामाजिक कार्य नसणा-या धुत आणि काकडेँना राज्यसभेतुन खासदार केले आणि प्रभुंना लोकसभेतुन उमेदवारी नाकारली याचे नेमके कारण काय असेल...? यामागे खरच काही तर्कशास्त्र आहे की नुसतच अर्थशास्त्र आहे...??
पक्षाची वैचारिक बाजु सांभाळण्यासाठी एका विचारवंताची गरज असते आणि बाळासाहेबांनी दिलेली ही जबाबदारी प्रभुंनी इतकी वर्षे प्रामाणिकपणे पार पाडली. नाहीतर सपा, बसपा प्रादेशिक पक्षांसारखा शिवसेनेलाही राष्ट्रीय पातळीवर विद्वान नेता लाभला नसता. कदाचित बाळासाहेबांच्या पश्चात एकापेक्षा एक विद्वान विभुतीँनी पक्षात अवतरल्याने प्रभुंचीही पक्षातील गरज संपली असावी.

ऊर्जा आणि पाणी या देशातील दोन महत्वपुर्ण विषयांवर प्रभुंएवढ्या अधिकारवाणीने बोलणारा अन्य नेता संपुर्ण देशात सापडणार नाही. म्हणुनच भाजपने देशाचे आर्थिक धोरण बनवण्याची महत्वपुर्ण जबाबदारी प्रभुंकडे दिली. याअगोदरही वाजपेयीँच्या काळात एनडीए सरकारने प्रभुंकडे ऊर्जा आणि पर्यावरण अशी प्रमुख मंत्रीपदे देऊन विश्वास दाखवला होता. देशातल्या सर्वोत्क्रुष्ट काम करणा-या मंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवुन प्रभुंनी तो सार्थ ठरवला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा मसुदा तयार करुन गावागावांना जोडणारे सुरेश प्रभुच होते. पर्यावरण मंत्री असताना प्रभुंनी प्रकल्पांसाठी जनसुनावणीचा कायदा लोकांना उपलब्ध करुन दिला. त्या कायद्यामुळेच निदान आपण एखाद्या विनाशकारी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करुन जनसुनावणीने लोकांचा विरोध सरकारला दाखवु शकतोय. जेव्हा कर्नाटक, गोवा आणि सिँधुदुर्गच्या पट्ट्यात मायनिँग सम्राटांनी धुडगुस घातला तेव्हा वनसंज्ञेची तरतुद करुन जंगले वाचवु पाहणारे प्रभुच होते. पर्यावरणाचा असाच विध्वंस सुरु ठेवला तर भारतातील हरितक्षेत्र कमी होऊन निसर्गाचा समतोल ढासळेल यासाठी देशातील वनव्याप्त भाग इको-सेँसिटीव्ह करण्याची सुचना प्रभुंनी केली. आपल्या नेत्याची भुमिका सामान्यांपर्यँत पोहोचवणे हे पक्षाच्या कार्यकर्त्याँचे काम असते. मात्र प्रभुंच्या भुमिका समजु शकण्याची कुवत असलेला कार्यकर्ता त्यांना दुर्देवाने कधी मिळालाच नाही. सिँधुदुर्गातील काँग्रेसमधील अशिक्षित नेत्यांनी इको सेँसिटीव्ह झोनचा बागुलबुवा केला आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याच सुरात सुर मिळवुन इको सेँसिटीव्ह झोनला विरोध केला. काँग्रेसच्या पावलांवर पाऊल ठेवत गाडगीळ-कस्तुरीरंगन अहवालाची होळी केली. सांगायची गोष्ट एवढीच की निलेश राणेँना पाडुन शिवसेनेचा उमेदवार निवडुन आणलात तरी मायनिँगने पर्यावरणाचा विध्वंस असाच सुरु राहणार.

वाजपेयीँनी प्रभुंवर नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्षपद देऊन महत्वपुर्ण जबाबदारी दिली होती. एनडीए सरकार आल्यास प्रभुंनी ती पार पाडावी. दुष्काळाची तीव्रता पाहता भविष्यात पाण्यासाठी तिसर महायुद्ध होईल आणि ते टाळण्याची कुवत फक्त नदीजोड प्रकल्पात आहे.

मधल्या काळात ऊर्जेचे नुतनीकरण स्त्रोत असलेल्या सौरऊर्जा क्षेत्रात प्रभुंनी अमुलाग्र संशोधन केल आहे. अणुऊर्जेचे विनाशकारी रुप जगाने पाहिले आहे, औष्णिक ऊर्जा अगोदरच बदनाम आहे, अशा परिस्थितीत देशाची वाढती वीजेची गरज भागवण्यासाठी प्रभुंनाच पुढाकार घ्यावा लागेल.

सुरेश प्रभुंसारखा अवलिया नेता आज संसदेत हवा होता पण पैशांच्या घाणेरड्या राजकरणाचा तो बळी ठरला. उमेदवारी मिळवण्यासाठी मतदारसंघात लाँबिँग करुन शक्तीप्रदर्शन करायची नवी पद्धत राजकरणात रुढ होतेय. मात्र आपली उमेदवारी हातातुन जात असतानाही शेवटपर्यँत प्रभुंनी लाँबिँगचा आधार घेतला नाही. तिकीट मिळाले नाही तर एका पक्षातुन दुस-या पक्षात उड्या घेणा-या बंडोबांना पेव फुटतो. शिवसेनेत होणारा अन्याय प्रभुंनी निमुटपणे सहन केला पण बाकीचे पक्ष एका पायावर तिकीट घ्यायला तयार असतानाही त्यांनी निवडणुक मात्र लढवली नाही. यासंदर्भात विचारणा केली असता प्रभु म्हणाले की "चार्टड अकाऊंटट म्हणुन व्यवसाय चांगला सुरु असताना फक्त बाळासाहेबांनी विचारणा केली म्हणुन समाजसेवा करण्यासाठी मी शिवसेनेतर्फे राजकरणात आलो. ज्या दिवशी राजकरणात आलो त्या दिवशी खासदार झालो आणि ज्या दिवशी खासदार झालो त्या दिवशी मंत्रीही झालो. उमेदवारीसाठी एका पक्षातुन दुस-या पक्षात उड्या मारायला राजकरण माझा धंदा नव्हे. यापुढेही शक्य तितक्या मार्गाँनी देशाची सेवा करुन भारताला महासत्ता बनवणे एवढे एकच माझे लक्ष्य राहिल."

आता अन्य पक्षातुन एखादा सभ्य आणि विद्वान उमेदवार उभा राहतो का याची मी वाट बघणार. अन्यथा प्रभुंना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ मी निवडणुकीत नकाराधिकाराचा वापर करणार. काँग्रेस नको असेल तर आम्ही देऊ तोच उमेदवार झक मारत स्वीकारा ही हुकुमशाही कोकणची समंजस जनता कधीच खपवुन घेणार नाही. तसही शिवसेनेतुन लोकशाही संपवल्याची घोषणा त्यांच्या पक्षप्रमुखांनी केलीच आहे आणि आता प्रभुंवर प्रेम करणारी जनताच मतदानातुनच शिवसेनेला उत्तर देईल.

'राज'करण परिपक्वतेचे...!



'राज'करण परिपक्वतेचे...!

आजच्या घडीला राज्याच्या राजकरणात शरद पवारांनंतर राजकीय चाली खेळण्यात जर कोणाला विशारद प्राप्त असेल तर ते नाव राज ठाकरेँचे आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाल. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेँची प्रत्येक राजकीय चाल फसत चालली होती पण आज मात्र त्यांनी एका दगडात चार-पाच पक्षी मारुन स्वतःचे राजकरण पुन्हा एकदा स्थिर केले. आता कसे ते पाहु.

राज ठाकरेँनी महायुतीत सामील होण्याचा प्रस्ताव अनेकदा धुडकारला कारण त्यांना स्वतःची वेगळी अशी स्पेस सोडायची नव्हती. शिवसेनेला विरोध करत मनसेचा जन्म झाला होता. त्यामुळेच महायुतीत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावुन बसणे राजना कधीच शक्य नव्हते. राज यांचा एक डोळा विधानसभा निवडणुकांवरही होता. मात्र महाराष्ट्रात असलेल्या मोदीँच्या लाटेमुळे महायुतीत सामील न होण्याचा निर्णय राजवरच शेकला. मध्यंतरी आपला मराठीचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी राजनी मोदीँवर गुजराती लोकांच्या अनुषंगाने टिका केली पण राज यांची ती खेळीसुद्धा अंगलट आली. राज ठाकरे काँग्रेस-एनसीपीचे एजंट असुन महायुतीचे नुकसान करण्यासाठी घाणेरडे राजकरण करतात, हा समज जनसामान्यांमध्ये पसरु लागला. त्यामुळेच मनसेचा जनाधार कमी होऊ लागला. त्यात करुन आम आदमी पार्टी राज्यात तिसरा पर्याय म्हणुन उभी ठाकल्याने मनसेची स्पेस व्यापु लागली. मध्यंतरी टोलचे फसलेले आंदोलन, त्याला लोकांचा मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या सर्वाँचाच परिपाक होता. सर्व्हेमध्येही मनसेला धड 1-2 जागाही मिळत नव्हत्या. आता अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करुन त्यांचा सगळीकडे पराभव झाला तर त्याचा विधानसभेत निश्चितच वाईट परिणाम होणार होता. 'झाकली मुठ सव्वा लाखाची' म्हणत लोकसभेला उमेदवार उभे न करता थेट विधानसभा लढवणे हाच एक पर्याय राज समोर होता. निवडणुका लढवल्या नाहीत तर कार्यकर्ते फार काळ पक्षात टिकणार नाहीत याची राजना जाणीव होती. अशा रितीने राज ठाकरे सर्व बाजुंनी चक्रव्युहात अडकले होते.

त्या परिस्थितीतही त्यांनी नितीन गडकरीँसोबत असलेली जवळीक आणखी वाढवण्यासाठी सर्वप्रथम ते नाशिकला एका कार्यक्रमात गडकरीँसोबत एकत्र आले. नंतर पुन्हा गडकरीँना खाजगीत भेटले. महायुतीत सामील होण्याची दारे राज ठाकरेँनी स्वतःच बंद करुन घेतल्याने तिकडे पुन्हा प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे भाजपसोबतच्या या भेटीगाठी शिवसेना नेत्यांना वाकुल्या दाखवत त्यांना चिथावण्यासाठीच होत्या. सारासार विचार करण्याची कोणतीही कुवत नसलेल्या शिवसेना नेत्यांनी भाजप-राजच्या भेटीबाबत आकांडतांडव सुरु केले आणि आपोआप राजच्या जाळ्यात अडकले. राजला चक्रव्युहातुन बाहेर पडण्याचा मार्ग शिवसेनेनेच मोकळा करुन दिला. राजला जे पाहिजे होते ते मिळाले होते आणि त्याचाच प्रत्यय आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आला.

आज मनसेने लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर करुन एकच संदेश दिला की,
"भाजपने आपली मदत मागितली म्हणुन भाजपच्या उमेदवारांविरुद्ध मी माझे उमेदवार उभे करणार नाही. नरेँद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान व्हावेत ही माझी इच्छा आहे. मनसेचे निवडुन आलेले उमेदवार मोदीँनाच पाठिँबा देतील. याउलट देवु केलेली मदत उन्मतपणे धुडकारणा-या शिवसेनेविरुद्ध मनसे निवडणुक लढवुन आपली ताकद दाखवुन देईल."
या सर्व प्रकारात राज ठाकरेँनी मराठी लोकांची सहानुभुती पुन्हा एकदा मिळवली आहे. मोदीँना पाठिँबा जाहिर केल्याने काँग्रेस एजंट हा शिक्का आपोआप फुसला गेलाय. आता मोदीच्या लाटेचा फायदा थेट राज ठाकरेँनाही मिळणार आहे. निवडणुकीला मत देताना लोक एवढाच विचार करणार की उमेदवार शिवसेना किँवा मनसे कोणाचाही निवडुन आला तरी पाठिँबा मोदीँनाच देणार आहे. त्यामुळे मनसे उमेदवाराची मते नक्कीच वाढणार. शिवाय राज ठाकरे मोठ्या मनाने शिवसेनेला मदत करु पाहत होते पण अहंकारी शिवसेना नेत्यांनी ती मदत स्वीकारली नाही. त्यामुळे मराठी लोकांमध्ये शिवसेनेप्रती नक्कीच संताप असेल. थोडक्यात आपल्या आततायीपणाने निवडणुकांच्या तोँडावर शिवसेनेने कचाट्यात सापडलेल्या मनसेला फुकटची सहानुभुती मिळवुन दिली आहे.

सांगायची गोष्ट एवढीच की राजकरण कधीही संयमाने करावे लागते. इकडे कोणीच कोणाचा कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो. गडकरी-राज भेटीवर बोँब मारायची शिवसेनेला काहीच गरज नव्हती. इकडे राजने समर्थनासाठी कोणत्या अटी पुढे केल्या नव्हत्या किँवा महायुतीत येण्यास उत्सुकताही दाखवली नव्हती. या भेटीनंतर संयम दाखवत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसती तर राजच्याच अडचणी वाढल्या असत्या. राजला एकट्या शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे करण्याची चाल खेळताच आली नसती. राज आणि मोदीँचे चांगले संबंध ही गोष्ट उघड होती. फक्त तोँडदेखली टिका ते मोदीँवर करत होते. त्यामुळे भाजपविरुद्ध राज ठाकरे एरव्ही उमेदवार उभे करणारच नव्हते. त्यामुळे एकट्या शिवसेनेविरुद्ध मनसेचे उमेदवार उभे करणे राजना धोरणात्मकरित्या अवघड होणार होते. राजच्या भाजपशी असलेल्या याच जवळकीचा शिवसेनेने फायदा करुन घेणे गरजेचे होते पण शेवटी बोँबाबोँब करुन यांनी आपल्याच पायावर धोँडा मारुन घेतला. उद्धवजीँच्या आसपास जे थिँक टँक म्हणुन फिरतात त्यांची टाळकी तपासण्याची वेळ आली आहे.

राजकरण करणा-याने प्रत्येक पायरीवर धुर्त आणि धोरणी असणे अत्यावश्यक असते. घडणा-या प्रत्येक घटनेचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करुन घेता येईल हे ज्याला कळते तोच राजकरणात टिकतो. डार्विनचा Survial to the fittest सिद्धांत राजकरणालाही लागु पडतो.
ज्याच्याकडे धुर्तपणा नाही, राजकीय चाली ओळखण्याची कुवत नाही तो पक्ष किँवा नेता काळाच्या ओघात संपत जातो. बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करुन उभारलेली शिवसेना हिँदुत्वाच्या रक्षणाखातर टिकलीच पाहिजे. फक्त शिवसेना कुठे चुकते आहे हे दाखवण्यासाठी हा लेख लिहिला. शिवसेना नेते आपले राजकरण भविष्यात सुधारतील अशी अपेक्षा करुया.

"एकच साहेब, बाळासाहेब...!"

कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा...

रत्नागिरी-सिँधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांसमोर जाहिर पाठिँब्यासाठी मी घातलेल्या अटी-

"कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा..."

1) बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते, सुरेश प्रभू यांसारख्या सभ्य आणि सुसंस्क्रुत नेत्यांची परंपरा लाभलेल्या रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात गुंडगिरी करुन दहशत माजवणार नाही, राडेबाजीला प्रोत्साहन देणार नाही. देशात सभ्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे वर्तन मी करणार नाही.

2) आजही जिल्ह्यातील लोकांना उपचारांसाठी गोवा, बेळगाव, कोल्हापुरवर अवलंबुन राहावे लागते. जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालय उभारुन यावर कायमचा तोडगा काढेन.

3) विद्यार्थ्याँना शिक्षणासाठी नाइलाजाने मुंबई, पुणे, कोल्हापुरसारख्या शहरात जावे लागते. हे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केँद्र उभारेन आणि स्पर्धा परीक्षांसाठी लागणा-या सर्व पुस्तकांची भव्य ग्रंथालय उभारुन सोय करुन देईन.

4) उष्णता निर्माण करुन आंबा उत्पादकांचे नुकसान करणारे औष्णिक प्रकल्प मतदारसंघात येऊ देणार नाही. वीजेची गरज भागवण्यासाठी देवगडच्या पवनचक्की प्रकल्पाला मदत करुन त्याच धर्तीवर मतदारसंघात अन्य ठिकाणी तत्सम नुतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करेन.

5) माझ्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्याच्या राजकरणात आणुन घराणेशाही करण्याचा प्रयत्न करणार नाही.

6) सुरेश प्रभुंप्रमाणेच गौणखनिजधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी खासदारकीही पणाला लावेन.

7) मात्र कोकणच्या पर्यावरणाचा विध्वंस करणा-या कळणे मायनिँगसारख्या विनाशकारी प्रकल्पांना कडाडुन विरोध करेन. झोळंबे, असनिये, डोँगरपाल, सातार्डा, इत्यादी गावात प्रस्तावित असलेले मोठे मायनिँग प्रकल्प तातडीने रद्द करुन घेईन. त्याबरोबर भविष्यात अन्य गावात असे मोठे मायनिँग प्रकल्प अजिबात येऊ देणार नाही.

8) मी मतदारसंघात आणलेल्या एखाद्या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असेल तर कोणत्याही प्रकारे दमदाटी न करता, जनभावनेचा आदर करुन मी तो प्रकल्प रद्द करेन.

9) सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ अशा प्रकल्पांना आवश्यकतेपेक्षा जास्त जमिनी घेऊन स्थानिकांना अक्षरशः लुबाडण्यात आले आहे. खासदार झाल्यावर प्रकल्पांसाठी आवश्यक तेवढीच जमिन घेऊन इतर जागा पुन्हा स्थानिकांकडे सुपुर्त करेन.

10) वेळाघरसारख्या ठिकाणी कित्येक वर्षापुर्वी भुसंपादन करुन अद्याप कोणताही प्रकल्प उभारलेला नाही. अशा पडीक जमिनी स्थानिकांना परत करेन.

11) धरणांसाठी यापुर्वी संपादित केलेल्या जमिनीत जोपर्यँत धरणे बांधुन पुर्ण होत नाहीत, तोपर्यँत नवीन धरणांसाठी जमिनी संपादित करणार नाही.

12) मतदारसंघामध्ये आणलेल्या नवीन उद्योगांमध्ये जनहिताव्यतिरिक्त माझा वैयक्तिक अथवा व्यावसायिक कोणताही स्वार्थ नसेल.

13) स्थानिक उद्योजकांशी स्पर्धा करुन किँवा त्यांच्या उद्योगांच्या ठिकाणी जाळपोळ करुन, सामान्य उद्योजकाला नेस्तनाबुत करत, माझे किँवा माझ्या समर्थकांचे उद्योग स्थापन करण्याचे मनसुबे मी कधीही बाळगणार नाही.

14) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधी पक्षातुन निवडुन आलेल्या उमेदवारांना, पैशाचे आमिष अथवा धाक दाखवुन माझ्या पक्षात आणत, राजकरणातील नैतिकता वेशीवर टांगण्याचे पाप मी कधीही करणार नाही

15) सिँधुदुर्ग जिल्हा 1997 साली देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित करुनही पर्यटनाच्या बाबतीत अद्यापही मागासलेलाच आहे. पर्यटन ही रोजगारांची जननी आहे. गोवा राज्याच्या धर्तीवर सिँधुदुर्गचा पर्यटन विकास करुन पर्यटनाभिमुख रोजगार निर्माण करण्यास मी प्राधान्य देईन.

16) महायुतीची सत्ता आल्यास तातडीने जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करणे हे माझे परमकर्तव्य राहिल. यात अपयशी ठरलो तर खासदारकीचा त्याग करेन.

17) मळगावलाच कोकण रेल्वेचे टर्मिनस उभारेन. कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवतेँविषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे नामकरण 'प्रा.मधु दंडवते रेल्वे टर्मिनस' असे करण्यात येईल.

18) वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी माझी राहिल.

19) मतदारसंघाच्या शाश्वत, सर्वाँगिण आणि समतोल विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिन.

20) सिँधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याची वीजेची गरज फक्त 500 M.W. असताना प्रत्यक्षात 5500 M.W. वीजनिर्मिती या दोन्ही जिल्ह्यातुन केली जाते. त्यामुळे खासदार झाल्यावर सिँधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हे लोडशेडिँगमुक्त करेन.

21) गेल्या वर्षी दुष्काळाची झळ कोकणलाही बसली. आदरणीय सुरेश प्रभू देशभरात नदीजोड प्रकल्प राबवुन दुष्काळाच्या समस्येवर उपाय काढत आहेत. माझ्या मतदारसंघात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणांची संख्या वाढवली तर पुराची भीती राहिल. त्यामुळे धरणे वाढवण्याच्या फंदात न पडता पोपटराव पवारांचे मार्गदर्शन घेत ओहोळ आणि नद्यांवर बंधारे बांधुन भुजलपातळी वाढवत पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यावर माझा अधिक भर राहिल.

22) सर्वात महत्वाचे म्हणजे वर नमुद केलेल्या अटीँपैकी कोणत्याही एका अटीची पुर्तता करण्यात काही कारणाने जर मी अपयशी ठरलो तर माझ्यावर जाहिर टिका करण्याचा पुर्ण अधिकार मतदारसंघातील पत्रकारांना आणि सजग नागरिकांना आहे. एवढेच नव्हे तर माझ्या अपयशाची पुर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी तात्काळ खासदारकीचा राजीनामा देईन आणि पुन्हा कधीही एक उमेदवार म्हणुन तुमच्याकडे मत मागायला येणार नाही.

(आयुष्यात तडजोडी करण मला माहित नाही. यापैकी एखादी अट जरी राऊतांना मान्य नसेल तर मी त्यांच्या विरोधातच प्रचार करेन. फक्त आमच्या वादात काँग्रेसचा फायदा होऊ नये म्हणुन विनायक राऊतांना सशर्त पाठिँबा देण्याचा निर्णय घेतला.)

अखेर पैशांसमोर धारातीर्थी पडली, प्रभुंच्या तत्वांची पुण्याई...!

सुरेश प्रभूंना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याची बातमी २८ फेब्रुवारीला निश्चित झाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकांमध्ये असंतोष खदखदु लागला. याआधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सामान्य लोकांनी प्रभूंना उमेदवारी दिली जावी, यासाठी आग्रह धरला होता. मात्र राजकीय दबावापुढे नमते घेत लोकांच्या भावना पक्षश्रेष्ठीँपर्यँत पोहोचवण्यात शिवसेनेचे पदाधिकारी पूर्णतः अयशस्वी ठरले. त्यामुळे त्या सर्व लोकांच्या भावनांना लेखाच्या माध्यमातून शब्दबद्ध करणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो कारण इकडे प्रश्न फक्त प्रभूंच्या उमेदवारीचा नव्हता. प्रश्न होता तो कोकणच्या विद्वान मतदारसंघाच्या प्रतिष्ठेचा...!
सुरेश प्रभू मतदारसंघात कधीही फिरकत नाहीत असा आरोप सर्वप्रथम विरोधी पक्ष काँग्रेसकडून केला गेला. नंतर प्रभूंची उमेदवारी काटायचीच आहे हे निश्चित झाल्यावर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही कॉंग्रेसच्या सुरात सुर मिसळत तेच कारण पुढे करू लागले. विरोधक आणि स्वकीय दोघांनीही प्रभुंवर जनसंपर्क ठेवत नसल्याचे आरोप केले तरी प्रभू नेहमीच चर्चेत राहिले कारण प्रभूंवर निस्सीम प्रेम करणारी कोकणची जनता आजही त्यांच्यासोबत होती. खासदाराचे काम मतदारसंघात येऱ्या-झाऱ्या करत फिरण्याचे नसून संसदेत मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न उपस्थित करायचे आहे. फक्त मतदारसंघाच्याच नव्हे तर देशहिताच्या प्रश्नांवर आपल्या विद्वत्तेच्या जोरावर चर्चा करून उपाय काढण्याचे आहे, ही समज कोकणच्या समंजस जनतेला नाथ पै, मधु दंडवते यांच्या काळापासून मिळाली होती. या सगळ्या गोष्टी सुरेश प्रभूशिवाय अन्य कोणताही उमेदवार करू शकणार नाही याची खात्री असल्यानेच लोकांनी 'प्रभूच खासदार हवे' ही भूमिका लावून धरली. मतदारसंघात फिरायचे काम खासदाराचे नसून त्यासाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात ही लोकशाहीची मुलभूत रचना संपूर्ण देशात 'विद्वान लोकांचा मतदारसंघ' म्हणून नावाजल्या गेलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सुजाण नागरिकांना होती. अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही सुरेश प्रभूविरुद्ध टिका करायला काहीच हाती लागत नसल्याने 'प्रभू मतदारसंघात फिरत नाहीत', हा प्रचाराचा एकमेव मुद्दा होता. तरी सुद्धा ३ लाख लोकांनी प्रभूंना मत देऊन 'आम्हाला असाच खासदार' हवा या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले. थोडक्यात सांगायचे तर 'खासदार काय असतो आणि त्याचे नक्की काम काय' ही गोष्ट दुर्दैवाने कोकणातील कोणत्याही राजकीय पक्षाला समजलेली नसेल पण मी अभिमानाने सांगू इच्छितो की कोकणच्या आदर्श मतदाराला ती नक्कीच समजली. म्हणूनच प्रभूंना शिवसेनेने उमेदवारी डावलली तेव्हा या विद्वान मतदारसंघातील अनेक सुसंस्कृत लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सुरेश प्रभू आपल्या नम्र स्वभावाला अनुसरून शांत राहिले, एवढ्या सुसंस्कृत लोकांचा पाठींबा एक गठ्ठा मते म्हणून सोबत असताना त्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षातून निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र प्रभूंना मानणारा वर्ग आजही 'सुरेश प्रभू कुठे आहेत?' हा एकच प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात फिरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारतोय. एव्हाना प्रभूंच्या समर्थनाशिवाय निवडणूक जिंकणे शक्य नाही याचा साक्षात्कार शिवसेना नेत्यांना झालेला दिसतोय. त्यामुळेच प्रभूंशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न साधता 'प्रभू प्रचाराला येणार' अशी वक्तव्ये केली जातायेत. शिवसेनेने कितीही बेभान होत प्रभूंचे तिकीट कापले असले तरी आजही प्रभूंच्या तत्वांची पुण्याईच शिवसेनेला या निवडणुकीत तारू शकते. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही- सुरेश प्रभू ही नक्की काय चीज होती…? राजकारणात सक्रिय नसूनही कोकणातील लोक प्रभुंवर एवढा जीव कशासाठी ओवाळून टाकतात….?? या प्रश्नांच्या उत्तरातच काही प्रमुख गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
सुरेश प्रभुंचे व्यक्तिमत्व हे जनमानसात अफाट बुद्धिमत्ता, उच्चशिक्षण, कटिबद्धता, एखाद्या विषयाची खोलवर असलेली जाण अशा अनेक गोष्टीँसाठी प्रसिद्ध होते. सुरेश प्रभू C.A. परीक्षा देशात अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी 'वातावरणातील बदल' या विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची आणि 'अर्थशास्त्र' विषयात मुंबई विद्यापीठाची Phd मिळवली. याशिवाय B.Com, L.L.B. यांसारख्या पदव्या देखील प्राप्त केल्या. त्यांना लँटिन अमेरिका येथेही डाँक्टरेट पदवी प्राप्त आहे. युनायटेड नेशन्स (UN) सारख्या संघटनेचा सल्लागार म्हणुन त्यांनी भुमिका बजावली. 'राजापुर मतदारसंघ' अवघ्या देशात 'सभ्य आणि विद्वान लोकांचा मतदारसंघ' म्हणुन प्रसिद्ध आहे. सुरेश प्रभू या मतदारसंघाला साजेसे असेच खासदार होते. बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांसारख्या संसदपटुंचा वारसा त्यांनी अतिशय योग्य रितीने जपला होता. गेल्या निवडणुकीत सुरेश प्रभुंचा मतांच्या आकडेवारीत जरी लौकिकार्थाने पराभव झाला असला तरी त्या पराभवातही त्यांचा 'नैतिक विजय' दडलेला होता. मतांच्या घाणेरड्या राजकरणात जे घडते ते नेहमीच खरे नसते. सुरेश प्रभू हे पक्ष, धर्म, जात यांच्या पलीकडे गेलेले उमेदवार होते, हे त्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. पक्ष म्हणुन मतदारसंघात शिवसेनेची पुरती वाताहात झालेली असताना प्रभूंना 3 लाख मतांनी पाडण्याच्या बाता विरोधक करत होते. मात्र प्रत्यक्षात सुरेश प्रभूंचा अवघ्या 46 हजार मतांनीच पराभव झाला. प्रभुंनी प्रचारसभा घेतल्या नव्हत्या किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी दारु, मटणाचे तुकडे, पैसा अशी प्रलोभनेही लोकांना दाखवली नव्हती. तरी सुद्धा 3 लाख 7 हजार मते प्रभुंना मिळाली होती. प्रभूंना मिळालेल्या लोकांच्या अनपेक्षित प्रतिसादाने नारायण राणेसुद्धा अचंबित झाले. कुठुन आली असतील ही मते...? रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघातील तत्ववादी लोकांनी तत्वांच्या पुजाऱ्याला केलेले ते मतदान होते...!
आपल्या अफाट कर्तुत्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर एका वेगळ्या उंचीवर पोहोचल्यानंतरही प्रभूंमध्ये असलेला नम्रपणा, सदा हसतमुख चेहरा, साधा-सरळ स्वभाव त्यांना प्रचाराविना मते मिळवुन देण्यास कारणीभुत ठरला. ती मते नव्हतीच मुळी...! प्रभुंच्या असामान्य व्यक्तिमत्वाला कोकणच्या समंजस मतदाराने दिलेला तो आशीर्वादच होता. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याँची आपुलकीने चौकशी करणारे प्रभू; एकीकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्वांनांसोबत डायनिँग रुममध्ये 'लंच' आणि 'डिनर' घेताना, दुसरीकडे मध्यमवर्गीय कुटुंबातही पंगतीत बसुन जेवणारे प्रभू; निवडणुक निकालानंतर विरोधी उमेदवार दंडवतेँचा चरणस्पर्श करणारे प्रभू, राजकरणात अन्यत्र कुठेच पाहायला मिळत नाहीत.
परमेश्वर संकल्पनेवर मतमतांतरे असतील पण मी परमेश्वर पाहिलाय आणि तो सुरेश प्रभूंच्या व्यक्तिमत्वात पाहिलाय. त्यांचा जन्म 'प्रभू' आडनाव असलेल्या कुटुंबात होणे, हा निश्चितच योगायोग नसावा. आज देशासमोरील वीज आणि पाण्याची समस्या उग्र रुप धारण करत आहे. वीजेअभावी खेड्यातील जनता अंधकारमय जीवन जगतेय तर दुष्काळात पाण्याविना माणसे आणि जनावरे तडफडुन मरतायेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी साक्षात परमेश्वरानेच प्रभुंची नियुक्ती केली असावी. सौरऊर्जा क्षेत्रात प्रभुंनी केलेल्या अमुलाग्र संशोधनामुळे आज वीजनिर्मितीसाठी नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत आणि प्रभुंच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होणा-या नदीजोड प्रकल्पामुळे देशातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी मिळणार आहे. मात्र अशा देवमाणसाला लोकसभेची उमेदवारी नाकारुन त्याचे राजकरण संपवण्याचा घ्रुणास्पद प्रयत्न केला गेला. आज रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघालाच नव्हे तर संपूर्ण देशाला सुरेश प्रभुंसारख्या दुरद्रुष्टी असलेल्या नेत्याची गरज होती. संसदेचे पवित्र मंदिर गुंडप्रव्रुत्तीच्या नेत्यांनी भरले आहे. लोकसभेत मिरचीची पुड डोळ्यात मारणारे नेते जावेत यापेक्षा वेगळे दुर्देव ते कोणते...? संसदेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सभ्य खासदार नजरेला पडत नाहीत आणि एखादा खासदार सभ्य असलाच तर त्याच्याकडे विद्वत्ता नसते. सभ्यता आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही गुण ठासुन भरलेला सुरेश प्रभुंसारखा 'दुर्मिळ नेता' माझ्या मतदारसंघात होता, ही किती अभिमानाची गोष्ट...! मात्र आज त्या नेत्यालाच लोकसभेची उमेदवारी नाकारली जावी...? सुरेश प्रभूंच्या उमेदवारीसाठी बहुतेक लोकांनी आपापल्या परिने केविलवाणे प्रयत्न केले. लोकशाहीत मतदार राजा असतो, असे म्हणतात. मग याच मतदाराला एखाद्या पक्षासमोर एवढ हतबल व्हायची वेळ का यावी...? लोकशाहीत आपले बहुमुल्य मत देणाऱ्या मतदाराला आपल्या आवडीचा उमेदवार पक्षाला सुचवण्याचे स्वातंत्र्य अद्याप का मिळालेले नाही...?? या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न ऐरणीवर येतो की, पक्षासमोर मतदार खरच इतका क्षुल्लक ठरतो का...???
सुरेश प्रभुंसारखा खासदार कोकणच्या राजकरणात असायलाच हवा, अशी बहुतांश लोकांची इच्छा होती. मात्र जेव्हा प्रभुंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घ्यायची वेळ आली तेव्हा यातील अनेक जणांनी पक्षाचा अंतर्गत प्रश्न समजुन अलिप्त राहणेच पसंत केले. ज्यांनी कोणी पुढाकार घेतला ते कधीच एकत्र आले नाहीत. या देशात आपापल्या हितासाठी दुर्जनशक्ती नेहमीच एकत्र येतात आणि सज्जनशक्ती अलिप्तच राहतात. सज्जनांच्या या अलिप्ततेमुळेच समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आपल्या आधीची पिढी देखील कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या दंडवतेँसारख्या कर्मयोग्याचा प्रथमतः पराभव होत असताना नामोनिराळीच राहिली आणि त्याचे भीषण परिणाम आज आपल्या पिढीला भोगावे लागतायेत.जेव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दंडवतेँसारख्या निस्प्रुह नेत्याला पराभुत करणाऱ्या मागच्या पिढीला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल. महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण करणाऱ्या दुःशासनाची इतिहासकारांनी निंदा केली. त्याचबरोबर ते वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी निमुटपणे पाहणाऱ्या पितामह भीष्मांनांही अपराधी ठरवले. इतिहासाची पुनरावव्रुत्ती होतच असते, फक्त पात्रे तितकी बदललेली असतात. फरक इतकाच की 1991 साली प्रा. मधु दंडवते होते आणि आज 2014 साली त्यांच्या जागी सुरेश प्रभू आहेत. प्रभूंना उमेदवारी नाकारुन कोकणातील सभ्यतेचे राजकरण संपवु पाहणाऱ्या शिवसेनेला भविष्यातील पिढ्या नक्कीच दोषी ठरवतील. त्याच वेळी प्रभुंचे राजकरण संपवले जात असताना स्वस्थ बसणाऱ्या आपल्या पिढीलाही इतिहास कधीच माफ करणार नाही.
अफाट वक्तुत्व आणि परिपुर्ण अभ्यासाच्या जोरावर संसदेत भाषण करुन जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करण्यासाठी कोकणला प्रभूंची नितांत गरज होती पण शिवसेनेने प्रभुंनाच राजकरणातुन संपवण्याचा करंटेपणा केला. पर्यावरण राखुन कोकणचा सर्वाँगीण, समतोल आणि शाश्वत विकास करण्यासाठी पर्यावरणप्रेमी सुरेश प्रभुच कोकणचे खासदार हवे होते पण आता मायनिँग करुन निसर्ग ओरबाडु पाहणाऱ्याना आपण रान मोकळे करुन दिले. एकंदरीत सुरेश प्रभू या नेत्यालाच नव्हे तर पर्यायाने त्यांच्यासोबत कोकणच्या राजकरणातील नैतिकताच आपण संपवुन टाकली. 'कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली' या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आज आपण प्रत्यक्षात उतरवल्या. राजकरणात चांगल्या लोकांचा वावर वाढला पाहिजे यावर आपल्यातील अनेकजण व्याख्याने देताना दिसतात. मग आज याच लोकांसमोर प्रभुंसारख्या चांगल्या नेत्याच राजकरण संपवल जात असताना ही मंडळी गप्प का...? सुरेश प्रभुंना उमेदवारी मिळवुन देण्यासाठी ज्या सज्जन लोकांनी प्रयत्न केले त्यांनी हताश व्हायची काहीच गरज नाही. उमेदवारी कोणाला द्यावी हा जरी सर्वस्वी एखाद्या पक्षाचाच प्रश्न असला तरी कोणत्या उमेदवाराला मत द्यावे हे मतदारांच्या हातात आहे. येत्या निवडणुकीत संविधानाने नकाराधिकाराचा अधिकार आपणा सर्वाँना बहाल केला आहे. सुरेश प्रभूंसारखा सज्जन उमेदवार जर यादीत नसेल तर नकाराधिकाराचा वापर आपण सर्वजण करु शकतो. उमेदवाराची निवड करताना आपण कोणाला डावलत आहोत याचे किमान भान नसलेल्या आपमतलबी पक्षांना लोकशाहीत मतदारच श्रेष्ठ असतो हे दाखवुन देण्याची नकाराधिकार (NOTA) ही सुवर्णसंधी असेल.
लेखाचा शेवट करताना महान तत्ववेत्ता कार्लाइलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देतो. कार्लाइल म्हणाला होता की-
"खुज्या माणसांच्या सावल्या जेव्हा वाढु लागतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली असे समजावे."
कोकणच्या राजकरणात खुज्या नेत्यांच्या सावल्या अगोदरच इतक्या वाढलेल्या आहेत की कोकणचा अस्त मला नजीक भासु लागलाय. सुरेश प्रभुंसारख्या सभ्य नेत्याच्या राजकीय अस्तानंतर त्या सावल्या आणखीनच जोमाने वाढतील. मात्र कोकणास्त होऊ देण आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही.

कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली...

भविष्यात सुरेश प्रभू राज्यसभेतुन खासदार होऊन मंत्री होतात कि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होतात, हे येणारा काळच ठरवेल पण या महान नेत्याची कोकणच्या सक्रिय राजकरणातुन कायमची निव्रुत्ती झाली एवढ मात्र नक्की...! पैशाने उन्मत झालेले सत्तापिपासु गोचिड प्रभुंना पुन्हा कोकणच्या राजकरणात येऊ देतील अस वाटत नाही. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू हे कोकणचे मानबिँदु होते आणि यापुढेही राहतील. जेव्हा कधी कोकणच्या राजकरणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ही तीन नावे सर्वात वर सुवर्णाक्षरांनी कोरलेली दिसतील मात्र दुर्देवाने आज त्यांच्या महान सुवर्णपर्वाचा अस्त झाला.
असे म्हणतात, युधिष्ठिराने जेव्हा सर्वप्रथम 'नरोवा कुंजरोवा' अर्धसत्यकथन केले, तेव्हा त्याच्या रथाची चाके प्रथमतः जमिनीला टेकली. आज आमच्या कोकणच्या विद्वान मतदारसंघाचीही तीच अवस्था झालीय. भविष्यात आम्ही ताठ मानेने विद्वान मतदारसंघाचा वारसा सांगु शकणार नाही. अर्धशिक्षित आणि गुंडप्रव्रुत्तीच्या नेत्यांची नावे तोँडात घेताना आमची सर्वाँचीच मान शरमेने झुकेल. मनात कुठेतरी प्रभुंची आठवणही येईल, चुकचुकल्यासारखे वाटेल, पश्चाताप होईल पण त्यावेळी सुरेश प्रभू कोकणच्या राजकरणात नसतील. फारफार तर काँग्रेसचे गुंड बाजुला होऊन शिवसेनेचे गुंड राज्य करतील पण यापुढे आपले नेते मात्र गुंडप्रव्रुत्तीचेच असतील. बिहारच्या राजकरणालाच हसताना 'कोकणचा बिहार' कधी बनला, कोणाच्याच लक्षात आल नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान दोन्ही अर्धशिक्षित गावंढळ उमेदवारांकडुन एकमेकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या जातील, तेव्हा कुठे लोकांना तोँडातुन एकही अपशब्द न उच्चारता मुद्द्यांवर भाषण करणारे सुरेश प्रभु आणि मधु दंडवते आठवतील. एखाद्या पिढीची जशी लायकी असते तसेच नेते त्यांच्या नशीबी येतात. आमच्या आधीच्या पिढ्यांनी निवडणुकीच्या बाजारात तत्वांची किँमत केली नाही, त्यामुळे त्यांच्या नशीबी नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू आलेत. आपल्या नशीबी दोन अर्धशिक्षित उमेदवारांपैकी एकाची निवड करणे तेवढे शिल्लक राहिले आहे.
नाथ पै साहेब, दंडवते साहेब बघताय ना तुमच्या मतदारसंघाकडे...! आम्ही तुमची इतक्या वर्षांची परंपरा कायमची संपुष्टात आणली आहे. बर झाल हे दिवस पाहण्याअगोदर तुम्ही या जगाचा निरोप घेतलात. तुमच्याने हे बघवले नसते. आजही स्वर्गात तुमच्या पवित्र आत्म्याला नक्कीच वेदना होत असतील पण काय करणार हेच कोकण राजकरणातील विदारक आणि भयाण वास्तव आहे. राजकरणातील नैतिकता वेशीला टाकुन आम्ही कोकणास्ताच्या उंबरठ्यावर येऊन थांबलोय.
सभ्य, सुसंस्क्रुत आणि विद्वान म्हणुन देशात नाही तर जगभरात नावाजलेल्या सुरेश प्रभुंसारख्या अवलिया नेत्याच्या राजकीय कारकीर्दीचा समारोप तशाच थाटात व्हायला हवा. सुरेश प्रभूंच्या निरोपासाठी खास ठेवणीतले शब्द वापरुन हा लेख मी लिहीला. लेख लिहिताना जड अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी सुरेश प्रभुंना एवढच सांगावस वाटतय. यापुढेही कोकणात किती नेते येतील आणि किती नेते जातील पण एक खासदार' म्हणुन नेहमीच तुमची प्रतिमा आमच्या ह्रुदयात कोरलेली राहिल. जेव्हा कधी खासदारच्या कर्तव्याची आम्हाला जाणीव होईल तेव्हा ओठी आपसुक शब्द येतील-
"प्रभू जी, तुम ही नाथ हमारे"

प्रभू सर, तुम्ही इतकी वर्षे उत्क्रुष्ट संसदपटु बनुन माझ्या मतदारसंघाची दिल्लीत आन-बान-शान कायम राखली. सर्वप्रथम तुमच्या या वैभवशाली कारकिर्दीला सलाम...!
उमेदवारी हिसकावुन घेतली जात असताना तोँडातुन चकार शब्द न काढता सगळ दुःख निमुटपणे एकाकी सहन करणा-या तुमच्या संवेदनशील मनाला सलाम...!
उमेदवारी डावलल्यानंतर अनेक पक्षांच्या आँफर समोर असताना, निवडणुक लढवेन तर बाळासाहेबांच्या शिवसेनेतुन अन्यथा राजकरण संपवेन, असे म्हणुन बंडखोर नेत्यांना नितीमत्तेचा धडा शिकविणा-या तुमच्या बाळासाहेबांवरील निष्ठेला सलाम...!
एकंदरीतच अनेक गुणांनी बहरलेल्या आणि तत्वांशी तडजोड न करणा-या तुमच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाला, जगात नावाजलेल्या कर्तुत्वाला माझा सलाम... सलाम... आणि फक्त सलाम...!!!

...तर मच्छीमारांसाठी दिवसही वै-याचाच असेल…!

             लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी कोकणातही रंगु लागलीय. खर तर मच्छिमारी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक व्यवसाय आहे. अनेक लोकांची रोजीरोटी मच्छिमारी व्यवसायावर अवलंबुन आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान मच्छिमारांचे प्रश्न अजेंड्यावर घ्यायला हवेत पण मतदारसंघातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र नेमकी याच्या उलट दिसतेय. सत्ताधारी काँग्रेस पक्ष स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना सावत्र वागणुक देताना दिसतोय. सिंधुदुर्गातील स्थानिक मच्छिमार गेली अनेक वर्षे पारंपारिक रापण पद्धतीने मच्छिमारी करुन आपले जीवन सुखाने व्यतित करत होते पण काँग्रेस पक्षाला हे बघवले नाही. 2011 साली काँग्रेसमधील एका नेत्याच्या क्रुपाशीर्वादाने सिंधुदुर्गात पर्सनीट पद्धतीने मच्छिमारी करणा-या  बड्या धेडांनी किनारपट्टीवर धुडगुस घातला. गेली 25 वर्षे निवडणुकांमध्ये आपले बहुमुल्य मत देऊन सिंधुदुर्गातील याच स्थानिक मच्छिमारांनी या नेत्याला 'कोकणचा वाघ' बनवत मंत्रीपद मिळवुन दिले होते. कु-हाडीचा दांडा गोतास काळ ठरावा त्याप्रमाणे मंत्रीपद मिळाल्यानंतर या नेत्याने धनदांडग्या पर्सनीट मच्छिमारांकडुन मिळणा-या आर्थिक लाभापायी स्थानिक पारंपारिक मच्छिमारांवर अत्याचार सुरु केले. गरीब मच्छिमारांनी दिलेल्या मतांच्या उपकाराची जाण नसलेल्या या नेत्याने फक्त पर्सनीट मच्छिमारांकडुन मिळणा-या पैशांखातर पारंपारिक मच्छिमारी संपवुन टाकण्याचे कारस्थान रचले. आपल्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने पारंपारिक मच्छिमारांनी कोर्टात केस दाखल केली. मात्र सत्तेचा माज आलेल्या या नेत्याने कधीही त्या केसचा पाठपुरावा केला नाही. किनारपट्टीवर गंभीर होत चाललेल्या पर्सनीट विरुद्ध पारंपारिक मच्छिमारांच्या प्रश्नी डाँ.सोमवंशी अहवाल तयार केला गेला परंतु काँग्रेस सरकारने तो अहवाल जनतेसाठी खुला न करता दडपुन टाकण्याचे धोरण अवलंबले. पर्सनीट मच्छिमारीमुळे माशांचे बीजच नाहीसे होऊन मरीन इकाँलाँजीला धोका निर्माण झाला आहे. मच्छिमारांवर इतके अत्याचार करुनही काँग्रेसवाले शांत बसलेले नाहीत. त्यांनी जणु काही सिंधुदुर्गातील मच्छिमारी व्यवसाय संपवुन टाकण्याचा ठेकाच घेतलाय. मच्छिमारांच्या द्रुष्टीने त्यांचे पुढचे विनाशकारी पाऊल आहे ते म्हणजे जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प सुरु करण्याचे...! जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मच्छिमारांची एकी झाली तर आपल्याला पळता भुई थोडी होईल याची पुर्वकल्पना असल्याने सिंधुदुर्गातील मच्छिमारांना जैतापुर अणुप्रकल्पापासुन कोणताच धोका नाही हा गैरसमज काँग्रेसकडुन जाणीवपुर्वक पसरवण्यात आलाय. त्यामुळेच एरव्ही प्रत्येक प्रश्नी सजग होऊन आंदोलनासाठी उभे राहणारे सिंधुदुर्गातील मच्छिमार बांधव जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात कोणतेही आंदोलन करताना दिसले नाहीत. यालाच म्हणतात, काँग्रेसचे तोडा फोडा आणि राज्य करा धोरण...!
           रत्नागिरीसह सिंधुदुर्गातीलच नव्हे तर गोवा राज्यातील मच्छिमारी व्यवसाय पुर्णपणे संपवण्याची क्षमता असलेल्या जैतापुर अणुप्रकल्पप्रश्नी बेफिकीर राहुन चालणार नाही. माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही ना...? तुम्ही तारापुर अणुप्रकल्पानजीक असलेल्या मच्छीमार बांधवांना कधीतरी नक्की भेट द्या. मग माझ्या बोलण्यावर तुम्ही फक्त विश्वासच ठेवणार नाही तर तारापुरमधील मच्छिमार बांधवांची काँग्रेस सरकारने केलेली दुरावस्था पाहुन एक मच्छिमार म्हणून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. जैतापुर अणुप्रकल्पात निर्माण होणारी उष्णता थंड करण्यासाठी समुद्रातुन दररोज 5200 कोटी लीटर पाणी आत घेतले जाईल आणि सहा अणुभट्ट्यांमध्ये फिरवुन निर्माण झालेल्या अतिरिक्त उष्णतेसह पुन्हा ते जैतापुरच्या समुद्रात सोडले जाईल. आता एवढ्या प्रचंड प्रमाणात उष्णता समुद्रात सोडल्यानंतर जैतापुरपासुन सिंधुदुर्गापर्यँत सर्वत्र समुद्राच्या पाण्याचे तापमान किमान 7 अंश सेल्सिअसने वाढणार आहे, असे जैतापुर अणुप्रकल्पाच्या अहवालात नमुद केले आहे. आजकाल ग्लोबल वार्मिँगमुळे तापमानात 1 अंश सेल्सियसने जरी वाढ झाली तरी मासे मरतात. मग जैतापुर अणुप्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याचे तापमान तब्बल 7 पटीने वाढल्यानंतर ह्या वाढलेल्या तापमानात माशांची अंडी टिकतील का...? पिल्ले जगतील का...? माशांची अंडी, पिल्ले जगली नाहीत तर माशांची पैदास कशी होणार...? रत्नागिरी सिंधुदुर्गच्या समुद्रात माशांची पैदासच झाली नाही तर तुमचा उदरनिर्वाह कसा काय चालणार...? शिवाय या पाण्याबरोबर प्रकल्पातील विषारी रसायने समुद्रात सोडली जातील. त्या घातक रसायनांचा परिणाम होऊन अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होतील. जैतापुर अणुप्रकल्पाने समुद्राच्या वाढलेल्या तापमानात बाजारात मागणी असणा-या माशांच्या जातीच्या जाती समुळ नष्ट होऊन स्थानिक मच्छिमार देशोधडीला लागणार आहेत . जैतापुर अणुप्रकल्पाच्या भीषण दुरगामी परिणामांचे गांभीर्य समजण्याची किमान बौद्धिक कुवत नसलेले  काँग्रेसचे नेते आपल्या हेकेखोर आणि आततायी व्रुत्तीने सगळ्या मच्छिमार समाजाला विनाशाच्या खाईत लोटत आहे. इतक सगळ धडधडीत वास्तव, मच्छिमारांचा अंधारमय भविष्यकाळ समोर दिसत असताना मच्छिमारांनी काँग्रेस सरकारवर का म्हणुन विश्वास ठेवावा...? शेवटी हा केवळ  मच्छिमारांचा प्रश्न नाही तर त्यांच्यावर अवलंबुन असणारे हजारो इतर व्यावसायिक (वाहतुकदार, सुतार, मेकँनिक, कामगार, इत्यादी) यांचाही प्रश्न आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे कोकणचे वैशिष्ठ्य असलेले माशांसारखे पौष्टिक खाद्य जैतापुरच्या विनाशकारी अणुप्रकल्पामुळे कायमस्वरुपी नष्ट होत आहे. पुढच्या पिढीला मासे नाहीसे केले तर ती पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
           एकीकडे जैतापुरचा अणुप्रकल्प सुरु करत मच्छिमारीचा व्यवसाय संपुष्टात आणुन स्थानिक मच्छिमारांना उद्ध्वस्त करायची स्वप्ने पाहत असलेला काँग्रेसचा नेता दुसरीकडे धनदांडग्यांच्या मोठमोठ्या ट्राँलरना अनुदानित तत्वावर डिझेल पुरवताना दिसतोय. मात्र गरिबीत हलाखीचे जीवन व्यतित करणाऱ्या स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करायला यांच्या काँग्रेस सरकारला शक्य होत नाहीये. गेली दहा-बारा वर्षे स्थानिक पारंपारिक मच्छिमार अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करा म्हणुन कंठशोष करतायेत परंतु गरिबाची आर्त हाक सत्तेच्या गुर्मीत बहि-या बनलेल्या काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना ऐकु येत नाहीये.
           आता बस्स झाल...! मच्छिमारांनी आणखी किती अन्याय सहन करायचा...? आम्हाला पर्सनीट प्रश्नी सुप्रीम कोर्टातील केसचा पाठपुरावा करणारा नेता हवाय...! जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करुन रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील मच्छिमारी व्यवसाय वाचवणारा नेता हवाय...!! स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करणारा नेता हवाय...!!! एकंदरीतच आम्हाला स्थानिक मच्छिमारांचे प्रश्न आपले समजुन त्यासाठी संसदेच्या सभाग्रुहात लढा देणारा नेता हवाय. सत्ता आणि पदाच्या अहंकाराने माज आलेला काँग्रेसचा नेता नेमका याच्या उलट वागतोय. या लोकसभा निवडणुकीत समस्त मच्छिमार बांधव काँग्रेसविरोधी मतदान करुन काँग्रेसच्या उर्मट नेत्यांचा माज नक्कीच उतरवतील. लोकशाहीत मतदार राजा असतो या विधानावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील. काँग्रेसने इतकी वर्षी लुबाडल्यानंतरही निवडणुक प्रचारकाळातील त्यांच्या भुलथापांना बळी पडुन मच्छिमार बांधव काँग्रेसलाच मत देणार असतील तर मग देवच तुमचे भले करो. शेवटी इतकच सांगेन की येत्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्मधर्मसंयोगाने काँग्रेस पुन्हा निवडुन आली तर मच्छिमारांसाठी फक्त रात्रच नव्हे तर दिवससुद्धा वै-याचाच असेल.

मायनिंगच्या विळख्यात गुदमरणारा दोडामार्ग…!

         लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाला मंजुरी देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ गावे इको सेँसिटीव्ह घोषित करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. इको सेँसिटीव्ह झोनला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू कारणीभुत आहेत, असा खोटा आरोप करुन काँग्रेसच्या नेत्यांकडुन जिल्ह्यातील जनतेला निवडणुकांच्या तोँडावर संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्याने त्या आरोपाला या लेखातुन जाहिर उत्तर देण मी माझ परमकर्तव्य समजतो.
        मित्रांनो, इको सेँसिटीव्ह झोन आणि गाडगीळ-कस्तुरीरंगन अहवाल या दोन भिन्न गोष्टी आहेत. हे सत्य आहे की, सुरेश प्रभुंनी जिल्ह्यातील पर्यावरणद्रुष्ट्या संवेदनशील असलेल्या काही भागात इको-सेँसिटीव्ह झोन लागु करण्याची शिफारस केली होती पण प्रभूंची शिफारस आणि गाडगीळ-कस्तुरीरंगन अहवालाचा काडीमात्र संबंध नाही. गेली दहा वर्षे केँद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारनेच गाडगीळ कमिटी नेमली. त्यानंतर माधवराव गाडगीळांनी तयार केलेल्या अहवालावर टिकेची झोड उठवत गाडगीळ समितीचा अहवाल फेटाळुन लावत पुन्हा कस्तुरीरंगन समिती नेमली. आज त्यामुळेच सावंतवाडी शहर, बांदा शहर, कणकवली बाजारपेठ यासारख्या संवेदनशील पर्यावरणाशी कोणताही संबंध नसणा-या जिल्ह्यातील अनेक भागांना कस्तुरीरंगन अहवालाच्या जाचक अटींचा सामना करावा लागतोय. आता अनेकांच्या मनात प्रश्न येत असेल की जर इको सेँसिटीव्ह झोन इतकाच जाचक असेल तर सुरेश प्रभूंसारखे अभ्यासु खासदार त्याचे समर्थन का करत होते...? प्रभूंची भुमिका समजुन घेण्यासाठी जिल्ह्यातील काही वर्षाँपुर्वीची पार्श्वभुमी समजुन घ्यावी लागेल. त्यावेळी गिर्ये आणि धाकोरे याठिकाणी औष्णिक प्रकल्प प्रस्तावित होते. औष्णिक प्रकल्पांनी जिल्ह्यातील उष्णता वाढुन आंबा-काजु बागायतदार देशोधडीस लागणार होते. सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी विनाशकारी मेजर मायनिंग प्रकल्प प्रस्तावित केले गेले होते.कळणेतील विनाशकारी मायनिँग प्रकल्पविरोधात आंदोलन करणा-या ग्रामस्थांना पोलिसांच्या मदतीने अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याविरोधात खुनाचे खोटे गुन्हे दाखल केले गेले. सुरेश प्रभू हे कोकणच्या शाश्वत, सर्वाँगीण आणि समतोल विकासासाठी कटिबद्ध असलेले खासदार होते. त्यासाठीच त्यांनी जिल्ह्याच्या पर्यटनाभिमुख विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 1997 साली सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला 'पर्यटन जिल्हा' घोषित करुन घेतला. आता जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटन जिल्ह्यात मोठमोठे मायनिंग प्रकल्प आणुन येथील पर्यावरणाचाच विध्वंस केला गेला तर कोकणचे वैशिष्ठ्यच संपुन जाईल. मायनिंग माफियांना रान मोकळे करुन दिले तर सिंधुदुर्गचा विध्वंस होऊ शकतो, हे प्रभुंसारख्या दुरद्रष्टी असलेल्या नेत्याने केव्हाच हेरले होते. त्यामुळेच पर्यावरण विध्वंसाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना सुरेश प्रभूंनी मोठमोठे मायनिंग प्रकल्प आणि औष्णिक प्रकल्प प्रस्तावित असलेली सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील गावे इको सेँसिटीव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली. त्यानंतरच्या काळात गोवा राज्यात खाणमाफियांनी घातलेला धुडगुस पाहुन काँग्रेस सरकारनेही गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समिती नेमली ज्याच्याशी सुरेश प्रभुंनी केलेल्या इको सेँसिटीव्हच्या शिफारशींचा काहीही संबंध नव्हता.
          एखाद्या भागासाठी इको सेँसिटीव्ह झोनचे निकष जाचक आहेत की वरदान आहेत, हे त्या त्या भागाची जैवविविधता पडताळुनच ठरवता येते. सिंधुदुर्गात आंबोली ते मांगेलीपर्यँतच्या पट्ट्यात सर्वाधिक जैवविविधता आढळते आणि यात मानवी हस्तक्षेप करुन निसर्गाचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भीषण परिणाम आपणा सर्वाँनाच भोगावे लागतील. याच पट्ट्यात वाघांचा वावर जास्त आहे. आंबोली ते मांगेली पट्ट्यात अलीकडच्या काळात मायनिंग करुन वाघांची निवासस्थाने नष्ट केल्याने तेच वाघ मानवी वस्तीत घुसुन जनावरे,माणसांवर हल्ले करु लागले आहेत. अगदी गाडगीळ कमिटीनेही दोडामार्ग तालुका इको सेँसिटीव्ह घोषित करण्याची शिफारस केली होती. मात्र कस्तुरीरंगन समितीने तयार केलेला  अहवाल हा 'आग सोमेश्वरी अन् बंब रामेश्वरी' अशातला प्रकार आहे. जो दोडामार्ग तालुका इको सेँसिटीव्ह घोषित करणे काळाची गरज होती, तोच तालुका कोणताही सर्व्हे न करता कस्तुरीरंगन यांनी इको सेँसिटीव्ह झोन मधुन वगळला आहे.त्याच वेळी सावंतवाडी शहर, बांदा, कणकवली बाजारपेठ अशा विकसनशील भागात इको सेँसिटीव्हचे जाचक निर्बँध लादले आहेत. कस्तुरीरंगन यांनी 'हम करे सो कायदा' पद्धतीने कोणताही सांगोपांग विचार न करता सरसकट 192 गावे इको सेँसिटीव्ह घोषित करुन टाकली आहेत. प्रभुंनी सुचवलेला इको सेँसिटीव्ह झोन सावंतवाडी-दोडामार्गच्या ज्या भागात मायनिँग प्रकल्प प्रस्तावित आहेत त्या गावांसाठी वरदानच होता. मात्र काँग्रेस सरकारने नेमलेल्या कस्तुरीरंगन समितीने विनाकारण ज्या 192 गावांचा इको सेँसिटीव्ह झोनमध्ये समावेश केला त्यासाठी तो शाप आहे. कस्तुरीरंगन समिती जेव्हा सिँधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आली तेव्हा पालकमंत्री नारायण राणेच कस्तुरीरंगन यांच्या सोबत होते. त्यामुळेच ज्या शिवडाव गावात राणेँचे क्रशर आहेत तो गाव, त्याचप्रमाणे ज्या दोडामार्ग तालुक्यात राणेँना कळणेसारखे विनाशकारी मायनिँग प्रकल्प करुन विध्वंस करायचा आहेत तो अख्खाच्या अख्खा दोडामार्ग तालुका राणेँनी आपले राजकीय वजन वापरुन कस्तुरीरंगन अहवालातुन वगळुन घेतला. त्यानंतर राजकीय नौटंकी करुन लोकांची सहानुभुती मिळवण्यासाठी 'कस्तुरीरंगन अहवाल मंजुर केला गेला तर प्रसंगी मंत्रीपदाचा राजीनामा देईन' अशी भंपक विधाने केली. प्रत्यक्षात कस्तुरीरंगन अहवाल जेव्हा केँद्र सरकारने स्वीकारला तेव्हा सत्ता आणि मंत्रीपदासाठी हपापलेल्या राणेँनी मंत्रीपद सोडण्यास नकार देऊन दिलेला शब्द पाळला नाही. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणा-या जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात केला. राणेँच्या राजकीय नौटंकीची ही पहिलीच वेळ नव्हे.याअगोदरही गेल्या वर्षी मतदारसंघात जेव्हा गौणखनिजधारकांचा प्रश्न गंभीर बनला तेव्हा खासदार या नात्याने संसदेत जनतेचा आवाज उठवुन केँद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या मंत्र्यांशी चर्चा करुन गौणखनिज प्रश्न मार्गी लावणे, ही निलेश राणेँची नैतिक जबाबदारी होती. एरव्ही मतदारसंघात मोठमोठ्या बाता मारत फिरणा-या खासदाराचे तिकडे दिल्लीतील संसदेत आवाज थंड होतात. आपले खासदार महाशय पाच वर्षाच्या कारकिर्दीत संसदेत अवघे 52 सेकंद बोलले. संसदेत बोलण्यासाठी शब्दांना वजन आणि विषयाचा सखोल अभ्यास लागतो. गौण खनिज प्रश्नाची जाण नसल्याने त्यावर संसदेत बोलण्याऐवजी इकडे गौणखनिज धारकांकडुन पैसे घेऊन महामोर्चे काढण्याची नौटंकी त्यांनी केली. लोकशाहीत मोर्चा काढुन सत्ताधा-यांना प्रश्नांची जाणीव करुन देणे हे विरोधी पक्षाचे काम असते, सत्ताधा-यांचे नव्हे. निलेश राणे सत्ताधारी पक्षाचे खासदार असुन त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण नसावी याचे आश्चर्य वाटते. शिवसेनेने विरोधी पक्षाची भुमिका चोखपणे पार पाडत गौणखनिज बंदी विरोधात मोर्चा काढला.काँग्रेसने वर्षभर चिघळत ठेवलेला गौणखनिज बंदीचा प्रश्न शेवटी शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभुंनीच दिल्ली दरबारातील आपले राजकीय वजन वापरुन केँद्रीय पर्यावरण मंत्रालायला पत्र लिहुन तडीस नेला.
           दोडामार्ग तालुक्याच्या निर्मितीपासुन त्याला कॉंग्रेसने मागासच ठेवला मात्र त्यातील खनिजसंपन्न गावे इकोसेँसिटीव्ह करण्याची वेळ आली तेव्हा नेतेमंडळींना दोडामार्गच्या विकासाची आठवण झाली. हा विकास नक्की जनतेचा आहे की काँग्रेसच्या नेतेमंडळीँचा, याबाबत जरा स्पष्टीकरण मिळेल का...? महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान आणि डहाणुचा इको सेँसिटीव्ह झोन मध्ये समावेश होतो.  विकासाच म्हणाल तर महाबळेश्वरला 2010-11 या एका वर्षात 11 लाख पर्यटकांनी भेट दिली आणि 100 कोटी रुपयांची स्ट्राँबेरी विकली गेली. सिंधुदुर्गला देशातील एकमेव 'पर्यटन जिल्हा' घोषित करुन आज 17 वर्षे लोटली, मग अजुनही महाबळेश्वरच्या धर्तीवर इको-टुरिझमच्या द्रुष्टीने कोणतेही प्रयत्न का करण्यात आले नाहीत...? इको सेँसिटीव्ह झोनमध्ये सागरी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग, क्रुषी उत्पादनावर आधारित उद्योग, पर्यटन उद्योग, फर्निचर उद्योग, काजु कारखाना असे 16 प्रकारचे उद्योग करता येतात. फक्त मायनिंगसारखे 'नसते उद्योग' करता येत नाहीत.
          एखाद्या गावात  300-400 फुट खोल खाणी खणुन मायनिंग प्रकल्प केला गेला तर आजुबाजुच्या गावांमधील पाण्याचा प्रवाह खाणीच्या दिशेने वाहु लागतो आणि सगळे पाणी खाणीमध्ये जमा होते. परिणामी, फक्त 30-40 फुट खोल असलेल्या विहिरी कोरड्या पडु लागतात. सध्या मायनिंग प्रकल्पांमुळेच सिंधुदुर्गातील लोकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येची भीषणता अनुभवायची असेल तर शेजारील गोवा राज्याचे निरीक्षण करा. मायनिंगमुळे डोंगर बोडके झाल्यानंतर पुढच्या पिढ्यांना निसर्ग म्हणुन आपण नक्की काय दाखवणार आहोत...? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून पहायला हवा.लेखाच्या शेवटी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की, येत्या लोकसभा निवडणुकीत आपले बहुमुल्य मत देताना मायनिंग माफियांना प्रोत्साहन देत विनाशकारी मायनिंग प्रकल्प जिल्ह्यात आणून कोकणचे कोकणपण नष्ट करू पाहणा-यांना मतदारसंघातील सुज्ञ आणि समंजस जनता नक्कीच अद्दल घडवेल.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

"रस्त्यावरच पोस्टर काढाल,
लोकांच्या मनातुन वैभवला कसा बाहेर काढणार...?"




सिँधुदुर्गात नक्की पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीत काँग्रेस समर्थक वावरतायेत तेच कळायला मार्ग नाही. कट्ट्यात वैभव नाईकांचा बँनर हटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. याअगोदरही कणकवलीत शिवाजी चौकात भाजपचा 'नमो नमन करुया' बँनर फाडला होता, कुडाळ प्रवेशद्वारावर लावलेला मनसेचा बँनर फाडण्याचा प्रयत्नही काही अज्ञातांनी केला. आता हे 'अज्ञात कार्यकर्ते' नेमके कोणाचे आहेत, हे वेगळ सांगायची गरज नाही. पक्षीय तेढ निर्माण करणा-या समाजकंटकांना अटक करुन शिक्षा करणे खुप दुरच राहिले, आता पोलिसयंत्रणा स्वतःच विरोधी पक्षांचे बँनर उतरवु पाहतायेत. पोलीसच सत्ताधा-यांना झुकते माप देणार असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडुन करायची...?

'पायाखालची वाळु सरकली की पक्षाचा तोल ढासळतो.' सध्या सिँधुदुर्गातील काँग्रेसची तशीच काहीशी बिकट अवस्था झाली आहे. त्यांना एवढच सांगु इच्छितो की,

'कोँबड झाकल म्हणुन सूर्य उगवायचा राहत नाही.'

त्यामुळे पोलिसांच्या मदतीने वैभव नाईकांचे बँनर हटवलात म्हणुन वैभव नाईकांना विधानसभा जिँकण्यापासुन तुम्ही रोखु शकणार नाही. गेली 10 वर्षे काँग्रेस सरकारने जी कुकर्म केली आहेत त्यांचा हिशेब चुकता करण्यासाठी लोक निवडणुकांची आतुरतेने वाट बघतायेत. येत्या निवडणुकांमध्ये सिँधुदुर्गची सुज्ञ जनता काँग्रेसला आडव पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यात विरोधकांचे बँनर हटवण्याच्या भ्याड कारवाया केल्यात तर उरलीसुरली मतेही गमावुन बसाल.

जे पोस्टर तुम्ही हटवु पाहत होता ती इतक्या दिवसात वैभवने सामान्य लोकांसाठी रस्त्यावर संघर्ष देऊन केलेली आंदोलने होती. म्हणुनच पोस्टरमधील आंदोलनाच्या छायचित्रांनी बिथरल्यानंतर ते पोस्टर हटवण्याचा घ्रुणास्पद प्रयत्न तुम्ही पोलिसांच्या मदतीने केला. अरे मुर्खाँनो, पोस्टर हटवाल पण वैभवने केलेल्या आंदोलनांच काय...? त्या आंदोलनांमुळेच वैभवने लोकांच्या मनात घर केले आहे. सिँधुदुर्गातील जनतेला वैभव नाईक आपलासा वाटु लागलाय आणि येत्या निवडणुकांमध्ये या आपुलकीचे रुपांतरच मतांमध्ये होणार आहे. आता लोकांच्या मनातुन वैभवला कसे हटवणार..??

काँग्रेसचा पराभव निश्चित झाला आहे त्यामुळे असली भ्याड क्रुत्ये करण्यापेक्षा मोठ्या मनाने पराभवाचा स्वीकार करा. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो.


वैभव नाईक, तुम्हाला 'लढ' म्हणा अस सांगायची गरज मला वाटत नाही कारण मला खात्री आहे की लढण्याचा गुण तुमच्या रक्तातच आहे. आज तुम्हाला 'सिँधुदुर्गचा ढाण्या वाघ' ही उपाधी जनतेनेच बहाल केली आहे. कणकवलीत तुमच्या एका डरकाळीने कधीकाळी कोकणात वाघ बनुन फिरणारे आता उंदीर बनुन बिळात जाऊन लपतात.

फारच थोड्या कालावधीत तुमच्या स्वभावाचा आणखी एक गुण माझ्या लक्षात येतोय की आंदोलन करताना तुमच्या स्वभावात जाणवणारी आक्रमकता इतर वेळी चुकुन सुद्धा दिसुन येत नाही. आंदोलन करताना शत्रुच्या अंगावर धावणारा वैभव इतर वेळी मात्र शांत, मनमिळाऊ आणि मुख्य म्हणजे सामान्यातल्या सामान्याशी आदराने बोलतो. राजकीय व्यक्तीँमध्ये हमखास आढळणारा अहंकार तुमच्या सावलीत सुद्धा दिसत नाही. कदाचित याच गुणामुळे तुम्ही लोकांना आपलेसे वाटत राहता. राजकरणात पुढे कितीही मोठी पदे मिळालीत तरी सामान्याशी जोडलेली ही नाळ अशीच सोबत ठेवा.
तुमच पुर्ण आयुष्यच समरांगण झालय आणि या लढाईत मी तुमच्या 'मागे' नाही तर खांद्याला खांदा देऊन तुमच्या 'सोबत' आहे. ही लढाई एवढ्यात संपणार नाही. बाळासाहेबांच्या जीवावर मोठे होऊन पुढे गद्दारी करणा-या खानदानाचा संपुर्ण राजकरणातुन बिमोड करत नाही तोपर्यँत ही लढाई चालुच राहिल. भविष्यात "जिल्हाप्रमुख वैभव नाईक" हे वाचण निदान मला तरी आवडणार नाही. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय जेव्हा या फोटोच्या खाली अभिमानाने लिहिलेले असेल-

"माननीय आमदार वैभवजी नाईक..."

इरादा आहे पक्का,
यंदाच देऊ धक्का...!!!

लेखांची माळ तुटली, भावना गुंतलेल्याच आहेत...!

कालच कणकवलीमध्ये तरुण भारतचा 'गुरवे नमः' सदराच्या निरोपाचा सोहळा पार पडला. काँलेजवाल्यांच्या कटकटीने कणकवली गाठु शकलो नाही. सोहळ्याला उपस्थित राहु शकलो नाही याच नक्कीच वाईट वाटतेय पण त्याहीपेक्षा अविनाश धर्माधिकारी सरांसारख्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्त्याचे विचार ऐकु शकलो नाही याच दुःख होतय.

आजच्या तरुण भारतमधील मेळाव्याला जमलेल्या श्रोत्यांचा फोटो पाहिला आणि मनातल्या मनात विजय शेट्टीँना सलाम ठोकला. एक पत्रकार म्हणुन विजय शेट्टी किती सरस आहेत हे वेगळं सांगायला नको पण कालच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील सर्वोत्क्रुष्ट आयोजकांमध्ये विजय शेट्टीँच नाव सामील झालय. 'गुरवे नमः' समारोप सोहळ्याच्या अगोदर पंधरा दिवस कार्यक्रमाच मार्केटिँग कस करायच असत याची शेट्टीँनी केलेली रचनाबद्ध आखणी भारावुन टाकणारी होती. आम्हाला एमबीए मार्केटिँगमध्ये शिकवले जाणारे कन्सेप्ट शेट्टीँनी पत्रकार पेशात राहुन प्रत्यक्षात आणुन दाखवले. खरच एका एमबीएच्या विद्यार्थ्याला लाजवेल असच विजय शेट्टीँच नियोजन होत. खास करुन रविवारच्या 'तरुण भारत'मध्ये विजय शेट्टीँनी लिहिलेला समारोपाचा लेख थेट भावनांना हात घालणारा होता. 'अश्रुंची झाली फुले' म्हणता म्हणता अलगद डोळ्यात अश्रु आणणारा होता. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात लोकांना प्रत्यक्ष सहभागी करुन घ्यायची किमया तरुण भारतने केली. 'गुरवे नमः' सदरात 382 लेख प्रसिद्ध झाले. म्हणजेच सिँधुदुर्गच्या कानाकोप-यात शिक्षणाचे पवित्र कार्य पार पाडत असलेल्या 382 गुरुंची संपुर्ण जिल्ह्याला ओळख झाली आणि त्या सर्वाँनाच एखाद्या पुरस्कारापलीकडचा पुरस्कार प्राप्त करुन दिला. महत्वाचे म्हणजे सामान्यातील सामान्य लोकांनी वर्तमानपत्रात व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. आपल्या लेखणीतुन गुरुप्रती असलेल्या भावना कागदावर उतरवल्या. या 382 पुष्पांपैकी 3 पुष्पे मी माझ्या गुरुंना अर्पण केली होती आणि शेवटच्या श्वासापर्यँत मला त्याचा अभिमानच राहिल. विजय शेट्टी या अवलिया पत्रकाराला, आयोजकाला मनापासुन धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

पक्षासमोर मतदार खरच इतके क्षुल्लक असतात का...?

गेल्या आठवड्यातच मतदारसंघाची पाहणी करुन आलो. अगदी ओळखपाळख नसलेल्या लोकांचे भेट घेण्याकरता फोन येत होते. प्रत्यक्ष भेटल्यानंतर एकच प्रश्न वारंवार विचारला जायचा-

"सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळवुन देण्यासाठी आमची काय मदत होऊ शकते...?"

काय उत्तर देऊ मी या लोकांना...? मी कोणी शिवसेनेचा पदाधिकारी नाही किँवा एखाद्या नेत्याला तिकीट मिळवुन देण्यासाठी पक्षांतर्गत काय प्रक्रिया असते याचीही मला माहिती नाही. बिचारे सामान्य लोक शिवसेनेच्या शाखाशाखांवर तिथल्या शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख किँवा जिल्हाप्रमुखांची भेट घेत होते. विनायक राऊतांची उमेदवारी फिक्स झाली हे माहित असुनही सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळावी म्हणुन लोकांनी स्वतःहुन केलेला हा केविलवाणा आणि अयशस्वी प्रयत्न होता. लोकशाहीत मतदार हा राजा असतो असे कुठेतरी ऐकल होत. मग याच मतदाराला एखाद्या पक्षासमोर एवढ हतबल व्हायची का वेळ यावी...? लोकशाहीत आपले बहुमुल्य मत देणा-या मतदाराला आपल्या आवडीचा उमेदवार पक्षाला सुचवण्याचे स्वातंत्र्य अद्याप का मिळाले नाही...?? या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न ऐरणीवर येतो की, पक्षांसमोर मतदार खरच इतका क्षुल्लक ठरतो का...???

रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निलेश राणेँविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. सभ्य आणि विद्वान उमेदवारांची परंपरा असलेल्या या मतदारसंघात लोकांना पुन्हा एकदा सुरेश प्रभूच खासदार म्हणुन हवे आहेत. एकीकडे सत्तापरिवर्तनासाठी लोकांच्या भावना तीव्र असताना शिवसेना मात्र उमेदवार निवडीबाबत आडमुठेपणाचे धोरण स्वीकारताना दिसतेय. राणे नको असतील तर शिवसेना लादेल त्या उमेदवारालाच लोकांनी निमुटपणे मत द्यावे. लोकांच्या भावनांशी आम्हाला काही देणघेण नाही. त्यामुळेच लोकांना जरी सुरेश प्रभु उमेदवार म्हणुन हवे असले तरी आम्ही विनायक राऊतांनाच उमेदवारी देणार. सत्ताबदल पाहिजे असेल तर मत द्या. बाकी तुमच्या भावना गेल्या खड्ड्यात...!

काय म्हणाव पक्षाच्या या हेकेखोरपणाला...? यापुढे लोकांना ग्रुहित धरुनच पक्ष चालणार असतील तर अशा पक्षांना लोकांनीच का म्हणुन अद्दल घडवु नये...??

निवडणुक ही मुद्द्यांवर लढवली जाते.मला शिवसेना नेत्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन उतरणार आहात...? राणेविरोध हा निवडणुकीचा मुद्दा असु शकत नाही. फक्त निलेश राणे खासदार म्हणुन अपयशी ठरले त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या, हा प्रचाराचा मुद्दा असु शकत नाही. निलेश राणेँना अयोग्य ठरवण्यासाठी अगोदर शिवसेनेचा उमेदवार कसा योग्य आहे हे स्पष्ट कराव लागेल.

विनायक राऊत म्हणतात की त्यांनी 12.5 कोटीँचा निधी मतदारसंघासाठी आणला. या वक्तव्याबरोबरच विनायक राऊतांनी अजुन एक गोष्ट स्पष्ट करावी की जर निलेश राणेँनी मतदारसंघासाठी आणलेला निधी 12.5 कोटीँपेक्षा जास्त असला तर लोकांनी निलेश राणेँना मत द्यायच का...? मतदारसंघात निधी आणण्याच्या बाबतीत राणे परिवाराचा हात कोणीच धरु शकणार नाही, ही गोष्ट विरोधकांनाही मान्य करावीच लागेल. मात्र जो जास्तीत जास्त निधी आणेल तो चांगला नेता अस म्हणण शुद्ध मुर्खपणा आहे. नेत्याने जो निधी मतदारसंघात आणला त्याचा प्रत्यक्षात लोकांसाठी किती उपयोग झाला हे लोकांच्या द्रुष्टीने महत्वाचे आहे. राणेँनी मतदारसंघासाठी निधी आणला आणि त्यांच्या बगलबच्चांनी तो मधल्या मधे हडपला तर अशा निधीचा लोकांसाठी उपयोग काय...? आज सिँधुदुर्गातील लोकांना वैद्यकीय सुविधांसाठी शेजारील गोवा राज्याच्या भिकेवर जगायची वेळ येत आहे. इतक्या वर्षात आणलेल्या निधीतुन राणे लोकांसाठी एक सुसज्ज रुग्णालय उभारु शकले नाही तर तो निधी काय कामाचा...?

लोकसभा निवडणुकीच्या प्रसंगी बोलताना तुलना कोणी किती निधी आणला यापेक्षा कोणी किती विकास केला या मुद्द्यावर व्हायला हवी. माजी खासदार सुरेश प्रभूंनी 19 जानेवारीला अक्षरयात्रा पुरवणीत 'कोकण विकासाच्या दाहि दिशा' हा लेख लिहुन ख-या अर्थाने मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा पुढे आणला. या लेखात सुरेश प्रभूंनी विविध योजना राबवुन मतदारसंघाचा सर्वाँगीण, समतोल आणि शाश्वत विकास कसा केला याची मुद्देसुत मांडणी केली. याशिवाय भविष्यात कोकणचे पर्यावरण राखुन विकास कसा करता येऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शनही केले. सुरेश प्रभुंच्या या लेखानंतरच मतदारसंघाच्या विकासासाठी प्रभुंसारखी दुरद्रुष्टी असणारा नेता खासदार असायला हवा याची लोकांना जाणीव झाली आहे आणि म्हणुनच हे लोक प्रभुंना पाठिँबा देत आहेत. सुरेश प्रभू उमेदवार म्हणुन का महत्वाचे आहेत हे शिवसेनेने अगोदर समजुन घेतले पाहिजे. राणेँना त्यांच्या पातळीवर येऊन किँवा क्रिकेटच्या भाषेत राणेँच्या पिचवर राणेँना हरवणे कोणालाच शक्य नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर राडे करण्यासाठी लागणारे गुंड विनायक राऊतांपेक्षा राणेँकडे जास्त आहेत. जनसंपर्काच म्हणाल तर एका दिवसात राऊत जेवढ्या गावात संपर्क करु शकतात त्याच्या तिप्पट गावात तिघे राणे पितापुत्र एका दिवसात जनसंपर्क करु शकतात. सध्या सगळीकडेच क्रिकेट स्पर्धांना पेव फुटलाय. आता एखाद्या क्रिकेट स्पर्धेला राऊतांनी 1 लाखाचे बक्षीस दिले तर 2 लाख बक्षीसाची रक्कम असलेल्या अशा दहा स्पर्धा भरवायची राणेँची ऐपत आहे. एखाद्या मंदिराला राऊतांनी 10 लाख देणगी दिली तर त्याच मंदिराला 1 कोटी देण्याची राणेँची तयारी आहे. थोडक्यात काय तर राणेँकडे जेवढे गुंड, पैसा आणि जनसंपर्क करण्याची क्षमता आहे तेवढी सगळ्या विरोधी पक्षांकडे एकत्रितपणेही नाही. त्यामुळे जनसंपर्क ठेवण्याची किँवा राडे करण्याची आणि पैसे खर्च करण्याची क्षमता असलेला उमेदवार राणेँना हरवु शकेलच असे नाही.
राणेँना पराभुत करायच असेल तर त्यांची कमकुवत बाजु विरोधकांना शोधुन काढावी लागेल. सभ्यपणा आणि विद्वत्ता या दोनच अशा गोष्टी आहे ज्यांच कितीही सोँग राणेँनी घेतल तरी लोकांना त्यावर विश्वास बसुच शकत नाही. त्यामुळेच राणेँना पराभुत करण्यासाठी सभ्य आणि विद्वान अशा प्रभुंची उमेदवार म्हणुन निवड करणे अपरिहार्य आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर केँद्रात एनडीए सरकार येणार हे एव्हाना स्पष्ट झालाय. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात सर्वोत्क्रुष्ट केँद्रीय मंत्री म्हणुन नावाजल्या गेलेल्या प्रभुंना यावर्षी नक्कीच मंत्रीपद मिळेल. त्यामुळे प्रभुंचा प्रचार करताना तुम्ही भावी केँद्रीय मंत्र्याला मत देत आहात असा सकारात्मक प्रचार पक्षातर्फे केला जाऊ शकतो. राजापुर मतदारसंघाने देशाला नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारखे सभ्य आणि विद्वान खासदार दिले. सध्या देशाच्या संसदेतील खासदारांमध्ये सभ्यपणा दिसेनासा झालाय. टिम अण्णांच्या म्हणण्यानुसार 150 पेक्षा जास्त खासदारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुंड प्रव्रुत्तीच्या खासदारांमुळे संसदेच्या पवित्र मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सभ्य खासदारांमध्ये बुद्धिमत्तेचा अभाव प्रकर्षाने जाणवतोय. अशा वेळी सभ्यपणा आणि विद्वत्ता हे दोन्ही गुण ठासुन भरलेला खासदार नजरेला पडणे 'दुर्मिळ योग' बनलाय. कोकणातील लोकांच्या पुर्वजांनी खरच काहीतरी पुण्य केल असणार. त्यांच्या क्रुपेनेच सुरेश प्रभुंच्या रुपात या पठडीतला दुर्मिळ खासदार आपल्या मतदारसंघात अजुनही आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुसंस्क्रुत खासदारांना संसदेपर्यँत पोहोचुच द्यायचे नाही असा विडा शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीँनी उचललेला दिसतोय. सुरेश प्रभुंना शिवसेनेने सर्वप्रथम राज्यसभेवर पाठवले नाही आणि आता प्रभुंचे लोकसभेचे तिकीट कापुन एका सज्जन माणसाला राजकरणातुन कायमचा संपवण्याचा घ्रुणास्पद प्रकार शिवसेनेने केला आहे. अजुनही सामान्य लोक मुग गिळुन गप्प आहेत.शिवसेनेसारख्या पक्षाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता सामान्य लोकांनाच एकी दाखवावी लागेल. नाहीतर भविष्यात पुर्ण संसदच गुंडानी भरलेली दिसेल. या देशाचे दुर्देव इतकेच आहे की इकडे दुर्जनशक्ती स्वतःचे हित साधण्यासाठी एकत्र येतात पण सज्जनशक्तीँचे एकत्रिकरण कधीच होत नाही. सज्जनशक्ती नेहमीच अलिप्त राहतात. ज्या दिवशी सज्जनशक्ती एकवटतील तेव्हाच शिवसेनेसारखे पक्ष सुतासारखे सरळ होऊन सुरेश प्रभुंसारख्या सभ्य नेत्याला उमेदवारी देतील.

निवडणुकीतील सर्व बाजु प्रभुंसाठी अनुकुल असताना केवळ पक्षश्रेष्ठीँची मर्जी राखण्यासाठी राऊतांना उमेदवारी दिली तर जनतेने हताश होण्याची काही गरज नाही. निवडणुकीत प्रभुंना अपक्ष म्हणुन उभे करुन त्यांचा प्रचार ही स्वतःची नैतिक जबाबदारी समजुन पार पाडावी. त्यानंतर अपक्ष सुरेश प्रभुंनी मिळवलेला विजय हा लोकशाहीत मतदार राजा असतो या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारा असेल.

"...आणि 'दगड' लोकसभेचा उमेदवार झाला."


सेनेचे कट्टर समर्थक नेहमी मला उपहासाने सांगायचे की,
"पक्षाने 'दगड' जरी उभा केला तरी आम्ही त्याला निवडुन आणु."

आज तरुण भारतमधील बातमी वाचुन मी अवाकच झालो. कार्यकर्त्याँच्या शब्दांचा मान राखत पक्षश्रेष्ठीँनी लोकसभेसाठी चक्क दगडालाच उमेदवारी बहाल केली आहे.
आजपर्यँत दगडाला शेँदुर फासत देव करण्याच्या आख्यायिका ऐकल्या होत्या पण इकडे तर दगडालाच उमेदवार म्हणुन निवडणुकीत उतरवले. काय करणार...! कलियुगातील पक्षांकडुन यापेक्षा वेगळ्या उमेदवाराची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.

आम्ही दगडाला निवडुन आणु हे पक्षाप्रती भावनिक होऊन म्हणणे समजण्यासारखे आहे पण व्यावहारिक जीवनात दगड क्वचितच निवडुन येतात. अन्यथा एव्हाना संबंध महाराष्ट्रात भगवा फासलेले दगड नेतेपदी मिरवताना दिसले असते.

आता याच दगडाच बघा ना...! यापुर्वी विधानसभा निवडणुकीत मुंबईमधील मतदारसंघात या दगडाला लोकांनी एकदा नव्हे तर सलग दोनदा पायदळी तुडवले आहे. म्हणुनच मागच्या दाराने विधानपरिषदेत जायची वेळ आली. आता मुंबईसारख्या शहरात दगडाला उमेदवार मानणारे सेना कार्यकर्ते कमी आहेत का...?मग तरीसुद्धा या दगडाचा मुंबईत पराभव का झाला...? कारण निवडणुकांमध्ये कोणत्याही दगडाला मत द्यायला फक्त त्या त्या पक्षाचे भावुक कार्यकर्ते नसतात तर आमच्यासारखे सामान्य लोक देखील असतात. विचार करुन मत देणारे लोक पक्षाने उभ्या केलेल्या दगडांना त्यांची योग्य ती लायकी दाखवतात आणि एका चांगल्या उमेदवारालाच आपले बहुमुल्य मत देऊन निवडुनही देतात. जनतेने विधानसभेला दोनदा नाकारल्यानंतर माझ्यासारखा कोणी असता तर राजकरण सोडुन संन्यास घेऊन हिमालयात गेला असता. मात्र काही निर्लज्ज लोकांमध्ये कोडगेपणा ठासुन भरलेला असतो. विधानसभेत दोनदा पराभव झाल्यानंतर मुंबईतला मतदारसंघ सोडुन फरार झाले आणि इकडे कोकणात थेट लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी आले. हे म्हणजे बारावीत शास्त्र शाखेत नापास झालेल्या पोराने इंजिनिअरीँगची डिग्री मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे. अरे पोरा, अगोदर बारावी तर पास हो. मग इंजिनीअरीँगच बघु...! पण कोण काय करणार...? हे राजकरण आहे इकडे फक्त पैसा बोलतो. पक्षश्रेष्ठीँच्या समोर पैशांच्या पेट्या टाकल्या की त्यांचे कान बहिरे होऊन, सामान्य लोक कोणाला उमेदवारी द्यायला सांगतायेत ते ऐकुच येत नाही. त्याचबरोबर पैशांच्या बंडलांसमोर पक्षश्रेष्ठीँची द्रुष्टीदेखील अंध होऊन जाते. त्यांना स्पर्धेत असलेला 'सभ्य आणि विद्वान' उमेदवार दिसतच नाही. अरे, पैशाने विकले जाऊन दगडांना उमेदवारी द्याल पण निवडणुकीत मत देणा-या मतदारांना कसे विकत घ्याल...? अशा दगडांना उमेदवारी दिल्यामुळेच साहेबांनी रक्ताच पाणी करुन उभारलेल्या सोन्यासारख्या पक्षाचा आज 'दगड' व्हायची वेळ आली आहे. पैशांच्या धुंदीत मश्गुल होऊन भान हरपलेल्या मदांधांना हे कोणी समजवावे...? साहेबांनी रत्नपारख्याच्या नजरेने एक-एक हिरा जमवुन पक्ष बांधला आणि आज थिल्लर पैशांपायी साहेबांच्या त्या हि-यांनाच बाजुला करुन दगडांना पुढे आणुन तुम्ही नक्की काय साध्य करू पाहत आहात...? हरामखोरांनो, साहेबांनी ऊन्हातान्हात फिरुन, उभ आयुष्य खर्च करुन, उभारलेल्या पक्षाचा त्यांच्या पश्चात विध्वंस करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही...??

शिक्षणाचाच विषय आला म्हणुन एक गोष्ट सांगतो, राजापुर मतदारसंघाने आजपर्यँत नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू अशा विद्वान उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे C.A, L.L.B, Phd, B.Com अशा एकापेक्षा एक पदव्या मिळवलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बुद्धिमत्तेने नावाजलेल्या उमेदवाराला नाकारुन ज्या दगडाला पुढे आणत आहात त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे...? की बुद्धिमत्तेच्या निकषावरही उमेदवाराच्या डोक्यात 'दगड'च भरलेले आहेत...?? कोकणच्या लोकांनी आजपर्यँत बुद्धिमान उमेदवारालाच आपले बहुमुल्य मत देऊन मतदारसंघाचा वारसा जपलेला आहे. त्यामुळे मतदानापुर्वी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाहिर करावीच लागेल.

अजुनही काही लोक प्रभुंना पक्ष राज्यसभेवर पाठवणार अशी खोटारडी आश्वासने देत आहेत. त्या अर्धवटांना एवढच सांगेन की राज्यसभेची जागा याअगोदरच उद्योगपती धुत आणि संजय काकडे यांना बहाल केलेली आहे. यातील संजय काकडेँनी इयत्ता सातवी पास एवढे उच्चशिक्षण घेतले आहे. आता राज्यसभेत एवढे उच्चशिक्षित उमेदवार पाठवणारा पक्ष लोकसभेला कोणत्या दर्जाचे उमेदवार देईल हे वेगळे सांगायला नको.

काही कार्यकर्ते सांगतात त्यानुसार धुत यांनी यापुर्वी खासदारकीच्या काळात फार मोठा जनसंपर्क ठेवला असेल किँवा काकडेँनी संघटना उभारली असेल. त्यामुळेच प्रभुंना डावलुन या दोन महाशयांना राज्यसभेची सीट बहाल केली असावी. नाही का...?

असो, मांजर डोळे बंद करुन दुध पिते कारण त्याला वाटते आपण दुध पितोय हे जगाला कळणार नाही. प्रत्यक्षात दुनियेला सगळ माहित असत. "ये पब्लिक है, सब जानती है." धुत किँवा काकडे यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी किती पेट्या देऊन पक्षसेवा केली हे शेँबड्या पोरालाही माहित आहे. त्याच पक्षाने लोकसभा उमेदवारी दगडांना कशी बहाल केली हे वेगळ सांगायची गरज वाटत नाही.

शेवटी इतकच सांगेन की, घोड्यांच्या शर्यतीत रंग फासलेल्या गाढवाला उतरवता येईलही पण शर्यतीला सुरुवात होताच जेव्हा तो गाढव आडवातिडवा धावु लागतो तेव्हा लोकांना लगेच कळत-

"अरेच्चा हा घोडा नाही...! हा तर गाढव आहे."

कोकणच दुर्देव इतकच की नाथ पै, मधु दंडवते यांच्या उमेदवारीने पवित्र झालेल्या या मतदारसंघात प्रथमच घोड्यांची नव्हे तर गाढवांची शर्यत होत आहे. फक्त आम्ही या 'गाढवांच्या शर्यतीत घोड्याला उतरवु पाहत होतो पण उमेदवारी देणा-या गाढवांना शेवटी 'दुसरा गाढव'च शर्यतीसाठी योग्य वाटला. दुर्देवाने आता कोणता गाढव शर्यतीत जिँकतोय, हे आम्हाला पाहायचय.

आपल्या मतदारसंघातील गाढवांच्या शर्यतीचे साक्षीदार होण्याअगोदर मधु दंडवतेँनी डोळे मिटले आणि मोठ्या संकटातुन सुटले. अन्यथा आज त्यांच संवेदनशील मन नक्कीच दुखावल असत.

"फिरुनी पुन्हा नवे, नाते मला हवे...!"



'प्रेम' या शब्दाला प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वपुर्ण स्थान आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी कोणावर तरी नक्कीच प्रेम केले असेल. खास करुन ती व्यक्ती तुमची प्रियकर अथवा प्रेयसी असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला आपल्या तिच्यावर असणा-या प्रेमाची कबुली देण अपरिहार्य बनत. आता प्रेमाची कबुली नेमकी कधी द्यावी हे बहुतेक वेळा कळत नाही आणि मग गोँधाळल्यासारख व्हायला होत. पाश्चात्यांनी त्यासाठीच 'Valentine day' ची संकल्पना पुढे आणली. फक्त पाश्चात्यांनी संकल्पना आणली म्हणुन आपल्या महान संस्क्रुतीचे गोडवे गात Valentine day ला विरोध करुन नाक मुरडणारे अनेक तथाकथित संस्क्रुतीरक्षक भेटतील. त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन या दिवशी प्रत्येक प्रियकराने आपल्या प्रेयसीसमोर प्रेमाची कबुली दिली पाहिजे. ती आपल्या आयुष्यात किती महत्वाच्या स्थानी आहे याची जाणीव तिला करुन दिली पाहिजे. आजच्या दिवशी प्रेमाबद्दलचे माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल.

"साधारण 5-6 वर्षापुर्वी 'ती' माझ्या आयुष्यात आली. वयच असत ते प्रेमात पडण्याच...!
प्रेमाची हुरहुर लागण्याच...!!
या जगात आपल अस हक्काच कोणी तरी असाव ही भावना बळावण्याच...!!! 'प्रेम' आणि 'आकर्षण' या शब्दातला फरक कळत नसतानाही मी तिच्या प्रेमात पडलो. आम्ही पहिल्यापासुनच एकमेकांचे चांगले मित्र होतो, नंतर फोनवर बोलण होऊ लागल आणि माझ्या नकळत 'ती' माझ्या आयुष्याचा 'अविभाज्य' भाग बनली. सुरुवातीचे काही महिने फोनवर तासनतास गोडगोड बोलण्यात गेले. एकीकडे लेक्चरला एक-एक मिनिट तासावानी वाटायचा आणि दुसरीकडे फोन ठेवल्यावर दोन-तीन तासांच बोलणही काही मिनीटांचच वाटायच. नंतरच्या काळात एकमेकांबाबत 'पझेसिव्हनेस' वाढत जातो आणि मग खटके उडणारच...! भांडणानंतरचा अबोला, काही दिवसांचा दुरावा, मग Sorry म्हणुन केलेली तडजोड हे सगळ काही नात्याचाच एक भाग बनुन जात. एरव्ही स्वतःची चुक असली तरी इतर कोणाला Sorry म्हणताना माझा Ego नेहमीच आड यायचा. कोणासमोर झुकण मला कधीच मान्य नसायच. मात्र तिच्या बाबतीत अनेकदा माझी चुक नाही हे माहित असतानाही मी Sorry म्हणायचो, नेहमी पडती बाजु घ्यायचो. कुठेतरी मला माझ्या आवडत्या व्यक्तीसमोर झुकण्यात फार मोठा आनंद वाटायचा. त्या तडजोडीत नात टिकवल्याच वेगळच समाधान मिळायच. या सर्व अनुभवानंतर आम्हा दोघांनाही नात उलगडत गेल. आम्हाला एकमेकांच्या स्वभावाची नीट ओळख झाल्यानंतर भांडणांच प्रमाण कमी झाल. काही काळानंतर फोनवरच बोलणही अपुर वाटायच. भेटण्याची ओढ स्वस्थ बसु द्यायची नाही पण भेटताना कोणी पाहणार तर नाही ना, हा यक्षप्रश्न नेहमीच पडलेला असायचा. खर तर आजच्या काळात जिथे मुल-मुली एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन बिनधास्त फिरतात त्या काळात लोकांना घाबरण्याच काहीच कारण असु नये. आज माझ्या एमबीएच्या वर्गातही अनेक जोडपी एकत्रच बसतात. प्रेमाच्या बाबतीत माझे विचार थोडे कालबाह्यच आहेत आणि योगायोगाने तसेच विचार असणारी मुलगी माझ्या आयुष्यात आली. प्रेम ही 'प्रदर्शनीय' गोष्ट नसावी. काही गोष्टी आपल्यापुरत्या ठेवलेल्या चांगल्या असतात. त्यामुळे अगदी भेटल्यानंतरही 10 मिनीटांपेक्षा जास्त आम्ही थांबत नसायचो. फोनवर तासनतास बोलत असलो तरी प्रत्यक्ष भेटीत तोँडातुन शब्दच बाहेर पडत नसायचे. माझ्यासमोर उभ असताना तिची झुकलेली नजर आणि गालातल्या गालात हसण्याची अदा आजही तिच्यावर पुन्हा जीव ओवाळुन टाकण्यास प्रव्रुत्त करते. अगदी कोणाचीही हमखास नजर लागावी असच आमच 'नात' होत. तळहातावरच्या फोडाप्रमाणे, गुलाबाच्या पाकळीवानी आम्ही दोघांनाही ते जोपासल होत. नंतरच्या काळात परिस्थितीच अशी बिकट झाली की ते नात पुढे नेण आम्हा दोघांनाही कठीण बनल. भांडण करुन कायमच दुर होण्यापेक्षा आजही आम्ही एकमेकांमधील मैत्री कायम ठेवण्याची प्रगल्भता दाखवली. आपण एकत्र येऊ शकत नाही हे माहित असताना दुसरी कोणीतरी शोध आणि स्वतःच आयुष्य स्थिर करण्याचा सल्ला तिने मित्रत्वाच्या नात्याने अनेकदा दिला. आपण पुर्ण दुनियेला फसवु पण स्वतःच्या मनाला कसे फसवु शकणार...? आयुष्यात काही जागांमुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन येत नसते कारण आपल्या मनानेच त्या जागा विशिष्ट व्यक्तीलाच बहाल केलेल्या असतात. अगदी तिच्या आयुष्यातीलही माझी जागा दुसरा कोणीच घेऊ शकला नाही कारण आम्ही मनाने एकच होतो. त्यामुळेच पुढील काळात दोघांच्या वाटा वेगवेगळ्या असुनही एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटते. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतोच. तिच्यावर भरभरुन प्रेम करण माझ्या हातात होत आणि मी ते प्रामाणिकपणे केल. आयुष्यात अनेकदा अपयश बघितले आणि या मनाने अगदी खंबीरपणे ते पचवले. मात्र तिचा हातात दुस-या कोणाच्या हातात पाहण्याची ताकद माझ्या नजरेत नाही. अस म्हणतात, मन मोठ असल की सार काही सामावुन घेता येत पण माझ सर्वस्वच दुस-या कोणाच्या मालकीच झालेल मी सहन करु शकणार नाही. तिच्यासोबत घालवेला प्रत्येक क्षण कुठेतरी आठवणीच्या कप्प्यात बंदिस्त झालाय. भविष्याबाबत सजवलेल्या स्वप्नांना निरोप तरी कसा द्यायचा, हेच मला समजत नाहीय. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवताना माझ्या नशीबी संघर्ष आलाय. यावेळी साक्षात नियतीशी संघर्ष करुन मी माझ प्रेम मिळवुनच दाखवेन कारण कोणत्याही परिस्थितीत हार मानुन हातपाय गाळण माझ्या रक्तातच नाही. फक्त यावेळी नात बांधण्यासाठी पुन्हा एकदा तिची साथ मला नव्याने लागेल.

लेखाचा शेवट 'तुझ्यावीना' गाण्याच्या ओळीँनी करतो.-

"फिरुनी पुन्हा नवे, नाते मला हवे,
जीव तुटतो हा, का असा रे, सांग ना,
तुझ्यावीना... तुझ्यावीना..."

'Happy Valentine Day...!'

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

तुला नाही मला, घाल कुत्र्याला...!

विनायक राऊतांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली तर काय परिणाम होतील याची मी आधीच कल्पना दिली होती. आता शिवसेनेकडुन राऊतांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यावर दिपक केसरकरांनी अपक्ष म्हणुन लोकसभेला आपली उमेदवारी जाहिर केली आहे. केसरकरांनी अगोदरच इशारा दिला होता की शिवसेनेने सभ्य आणि विद्वान अशा सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली नाही तर निलेश राणेँविरुद्ध तेच अपक्ष म्हणुन उभे राहतील. केसरकरांनी आपले शब्द खरे करुन दाखवले.

मनसेच्या परशुराम उपरकरांनीही शिवसेनेने सुरेश प्रभुंना वगळुन विनायक राऊतांना उमेदवारी दिल्यास मनसेकडुन लोकसभेला उमेदवार उभा करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिलीच होती आणि विनायक राऊतांच्या घोषणेनंतर मनसे लोकसभा उमेदवार नक्कीच उभा करेल.

विनायक राऊतांऐवजी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी द्या असा कंठशोष ज्यावेळी मी करत होतो तेव्हा काही राऊत समर्थकांनी मला अस्तनीतला निखारा म्हणुन हिणवले, काहीँनी व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असल्याचे सल्ले दिले, काही तर थेट निलेश राणेँचा एजंट ठरवुन मोकळे झाले. राजकरण जास्तच समजणा-या एका आमदार महाशयांनी तुला राजकरणाची समज नाही, फक्त विनायक राऊतच ग्राऊंड लेवलवर नारायण राणेँना फाईट देवु शकतात, अशी विधाने केली. मला शहाणपणा शिकवण्याअगोदर विनायक राऊत लोकसभेला जिँकुन तरी येवु शकतात का, याचा अंदाज घेणे एका आमदाराला सुद्धा जरुरीचे वाटले नाही. अगदी आमदारापासुन कार्यकर्त्यापर्यँत प्रत्येक जण शिवसेनेने दगड जरी उभा केला तरी तो नक्कीच जिँकुन येणार या अंधविश्वासात वाहवत चालले होते. काँग्रेसची आणि राणेँची ताकद नक्कीच कमी झाली आहे म्हणुन राजकरणात मुरलेला राणेँसारखा नेता सहजासहजी हरत नसतो, याची किमान जाणीव विरोधकांना असणे जरुरीचे होते. त्यांना तीच जाणीव करुन देण्याचा मी प्रयत्न केला तर ते मलाच गुन्हेगार ठरवुन मोकळे झाले.

सुरेश प्रभु माझे काही नातेवाईक नव्हते किँवा विनायक राऊत खानदानी दुश्मनही नव्हते. नारायण राणेँना हरवणे कोणा एका पक्षाला शक्य नाही ही गोष्ट त्यांच्या कोणत्याही विरोधकाला मान्यच करावी लागेल. राणेँना हरवायचे असेल तर शिवसेना-भाजप-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस या चारही विरोधकांना एकत्र आणुन मोट बांधणे कोकणच्या राजकरणाची गरज होती.ही किमया करण्यासाठी राजकरणातील अजातशत्रु व्यक्तिमत्वाला निलेश राणेँविरोधात उमेदवारी देणे सर्वाँच्याच हिताचे होते. अशी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसुन शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभु हेच आहेत.

अगदी शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपसुद्धा सुरेश प्रभुंच्या उमेदवारीसाठी आग्रही होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश प्रभुंचा प्रचार करण्याची तयारी दाखवली होती. इतक्या सगळ्या गोष्टी सुरेश प्रभुंना अनुकुल असताना केवळ शिवसेना सचिवपदी आहेत म्हणुन विनायक राऊतांना उमेदवारी द्यायचा घाट घालणे हे आकलनापलीकडचे होते.

सुरेश प्रभु हे गेली 20 वर्षे कोकणच्या राजकरणात आहेत. त्यांचे नाव कोकणच्या घराघरात पोहोचले आहे. त्याउलट गेली दिड वर्षे मतदारसंघात फिरणा-या विनायक राऊतांना तितकस कोणी ओळखत नाही. मते मिळवण्यासाठी उमेदवार शेवटच्या मतदारापर्यँत पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळेच आणखी पाच वर्षाँनी विनायक राऊत हे नाव तळागाळात पोहोचल्यावर त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर ते समजण्यासारखे होते. मात्र सुरेश प्रभुंसारखा सर्वश्रुत आणि प्रसिद्ध उमेदवार शिवसेनेकडे असताना विनायक राऊतांना उमेदवार म्हणुन पुढे करणे पुर्णपणे चुकीचे आहे.गेले वर्षभर कोकणात राणेपर्वाच्या अस्ताची स्वप्न लोक बघत होते मात्र विरोधक सवयीप्रमाणे आपल्या पायावर स्वतःच कु-हाड मारुन घेत ती स्वप्न भंगवतील अशीच चिन्हे दिसु लागली आहेत. निलेश राणेँना मत देणारे नेहमीच त्यांना पाठिँबा देतील मात्र त्याच वेळी राणेँच्या विरोधात पडणारी मते राऊत, केसरकर आणि मनसे यांच्यात दुभागली जातील. लोकसभेची लढत चौरंगी झाली तर निलेश राणेच विजयी होतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. शिवसेनेने फक्त विनायक राऊतांऐवजी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी दिली असती तर प्रभुंना ज्येष्ठ बंधुचा सन्मान देणा-या दिपक केसरकर आणि परशुराम उपरकरांनी लोकसभेला उमेदवारी न स्वीकारता प्रभुंचा प्रचार करण्यात धन्यता मानली असती. विरोधकांची एकी अबाधित राहुन निलेश राणेँचा पराभव निश्चितच झाला असता आणि कोकणवासियांचे स्वप्न देखील पुर्ण झाले असते. विरोधकांनी आपला मुख्य शत्रु कोण आहे याची एकदा चाचपणी केली पाहिजे. आपापसात लढुन मुख्य शत्रुला विजय मिळत असेल तर ती गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे.अजुनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेकडुन उमेदवारीची अधिक्रुत घोषणा अजुन झालेली नाही. राऊत आणि केसरकर दोघेही लोकसभेला उभे राहिले तर दोघांचाही पराभव आणि निलेश राणेँचा विजय निश्चित आहे. त्यापेक्षा विनायक राऊतांनी पक्षहितासाठी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी द्यावी. त्यामुळे दिपक केसरकर आपोआप माघार घेतील किँवा केसरकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले तरी सुरेश प्रभुंची वोटबँकला ते हात लावु शकणार नाहीत. प्रभुंच्या अनुपस्थितीत शिक्षक, वकील, पदवीधर, सरकारी नोकर अशा सुशिक्षित वर्गाची मते राणे, राऊत किँवा अन्य कुणाला न मिळता आपल्यालाच मिळतील याची केसरकरांना खात्री आहे. त्याच विश्वासावर ते राऊतांना आव्हान देत आहेत. त्यामुळे राऊतांऐवजी प्रभुंना उमेदवारी दिली तर प्रभुंची पारंपारिक वोटबँक प्रभुंकडेच राहिल आणि केसरकरांनी माघार घेतली नाही तरी ते शिवसेनेच फार मोठ नुकसान करु शकणार नाही.

आता निवडणुकीला फारच थोडे दिवस उरले आहेत.सुरेश प्रभुंना सामान्य लोकांचा असलेला पाठिँबा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेँपर्यँत पोहोचवण्यासाठी मी त्यांना e-mail किँवा पोस्टाने पत्र पाठवायचे ठरवले आहे.

नदीजोड प्रकल्प - काळाची गरज...! (सुरेश प्रभू )

           लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू कागले आहेत. या निवडणुकीत सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकास हाच महत्वाचा मुद्दा राहणार आहे. मानवी नागर संस्कृतींचा विकास नाईल, सिंधू अशा नद्यांच्या आश्रयानेच झालेला आहे हे सर्वज्ञात आहे. मानव समाजाचे अस्तित्व आणि आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यावरणीय उन्नतीसाठी पाणी हा मुलभूत असा घटक आहे. त्यातून भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशात दरडोई पाण्याची उपलब्धता घटत असताना जलव्यवस्थापनाला असलेले महत्व वादातीत आहे. या प्रश्नाचे महत्व देशाचे माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयींनी जाणले होते आणि आता नरेंद्र मोदींनीही सत्तेत आल्यास देशाला समतोल आणि शाश्वत जलव्यवस्थापन देऊ शकणारा महत्वाकांक्षी असा नदीजोड प्रकल्प राबविण्याची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठबळाने आकार घेत असलेल्या नदीजोड प्रकल्पाचे सोनिया गांधींसह सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केले होते. मी अध्यक्ष असलेल्या कार्यगटाने सादर केलेल्या सर्वंकष अहवालाच्या आधारे मा. सर्वोच्च न्यायालयाने युपीए सरकारच्या कार्यकाळात गुंडाळून ठेवलेला नदीजोड प्रकल्प त्वरित राबवला जावा असा आदेश फेब्रुवारी २०१२ रोजी दिलेला आहे.


            दोन वर्षापुर्वी आसाम राज्यात एकदा नव्हे तर दोनदा महापुर आला. महापुरात अनेक लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. दुसरीकडे, गतवर्षी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात भीषण दुष्काळ पडला. काहींनी या दुष्काळाची तुलना १९७२ च्या दुष्काळाशी केली. दुष्काळग्रस्त भागात भर उन्हात पाण्याविना तहानेने तडफडनाऱ्या जनतेला टँकर मधुन पाणीवाटप करावे लागले. पश्चिम महाराष्ट्रात तहानभुकेने व्याकुळ जनावरांसाठी चारा-छावण्यांची व्यवस्था करावी लागली. दुष्काळ व महापुराने ग्रासलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रशासनाकडे ५० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या चर्चा रंगल्या आणि पाऊस पडल्यावर विरुनही गेल्या. एकंदरीतच काय तर दुष्काळावर तात्पुरते उपाय करुन आपण सर्वांनी भविष्यातील दुष्काळांचा प्रश्न तसाच लोंबकळत ठेवला. जखम साधी असेल तर ती मलमपट्टीने बरी होते पण एखाद्या जुनाट रोगावर तात्पुरती मलमपट्टी उपयोगाची नसते. असा रोग हा मुळापासुन बरा करावा लागतो. महापुर आणि दुष्काळ हे आपल्या देशाला गेली कित्येक वर्षे भेडसावणारे 'महारोग' आहेत. दुष्काळ-महापुरापासुन कायमची मुक्ती मिळवायची असेल तर 'नदीजोड प्रकल्प' हाच त्यावरील रामबाण उपाय आहे. तरीसुद्धा नदीजोड प्रकल्पासाठी निरुत्साह दाखवणारे सध्याचे सरकार या देशाची शोकांतिका आहे. हिच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात देशात पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम १० वर्षे राबवण्याचे काम हाती घ्यावे लागेल. केँद्र सरकार दरवर्षीच्या अर्थसंकल्पात करोडो रुपयांचा निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी राखुन ठेवते. दरवर्षी करोडो रुपयांचा निधी दुष्काळ आणि पुरग्रस्त भागात खिरापत म्हणुन वाटण्यापेक्षा नदीजोड प्रकल्पासारखी शाश्वत उपाययोजना राबवणे अत्यंत व्यवहार्य ठरेल.

            पाण्याला प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. १९४७ साली देशाच्या फाळणीनंतर पाण्याने संपन्न असलेला फार मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. त्याची भरपाई करण्यासाठी भारताने पुढील काळात नद्यांवर अनेक प्रकल्प उभारले. मात्र भारताच्या भौगोलिक परिस्थितीमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणात भिन्नता आढळुन येते. एकीकडे पश्चिम वाळवंटात राजस्थानमध्ये १०० मिमि इतकाच पाऊस पडतो तर दुसरीकडे ईशान्य भारतात चेरापुंजीमध्ये ११००० मिमि पाऊस पडतो. त्यामुळेच देशाच्या एकुण भुभागापैकी एक तृतीयांश (१/३) क्षेत्रात दुष्काळ पडतो आणि एक अष्टमांश (१/८) भागात नद्यांना पुर येतो. भारताच्या मान्सुन हवामानात १५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस १५ दिवस किंवा १०० तासांपेक्षा कमी वेळात पडुन जातो. त्यामुळे वाळवंटी प्रदेशात ५ पावसाळी दिवस पाहायला मिळतात आणि हेच प्रमाण ईशान्येकडे १५० दिवस एवढे असते. मान्सुन कालावधीतच भारतातील नद्यांचा जवळपास ८० ते ९० टक्के वार्षिक प्रवाह दिसुन येतो. कृषी आणि आर्थिक क्षेत्राची गरज भागवण्यासाठी, तसेच पुराचे अतिरिक्त पाणी वळवून साठविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलाशयांची आवश्यकता आहे. दुर्देवाने दक्षिण भारतातील द्विकल्पीय भागात जलाशयांचे साठे मर्यादित असुन स्वच्छ पाण्याचे स्त्रोत प्रचंड प्रमाणात प्रदुषित केले जात आहेत.

            नदीजोड प्रकल्पाबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. देशात पाण्यासाठी होणारे राज्याराज्यातील संघर्ष टाळुन 'विविधतेतील एकतेचा' संदेश देण्यासाठी आणि अनेक समस्यांवर समतोल व शाश्वत उपाय म्हणुन एनडीए सरकारच्या काळात नदीजोड प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. माझ्या अध्यक्षतेखाली एनडीए सरकारची 'नदीजोड प्रकल्प कृती समिती' स्थापन केली गेली. केंद्र आणि राज्य पातळीवर जलव्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय स्थापित करणे हे या प्रकल्पातील प्रमुख उद्दिष्ट होते. यासाठी अत्यंत कमी कार्यकाळात संपुर्ण देशामधील शेतकरी, शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, श्री. राजेंद्र सिंह यांच्या सारखे जलनीतीतज्ञ, सर्व राजकीय पक्ष, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अशा संबंधित भागीदारांसोबत आम्ही तब्बल ५००० बैठका, चर्चासत्रे पार पाडली.

      देशातील नद्यांची जोडणी या कल्पनेचा विकास करताना मी देशातील ६.५ लाख गावे केंद्रबिंदू मानली होती. देशातील सर्व राज्यांच्या एकात्मिक व सर्वंकष जलव्यवस्थापनासाठी रिमोट सेन्सिंग व जीआयएस प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दूरदर्शी धोरणे व कालबद्ध मोहीम आखणे हा या प्रयत्नाचा मूळ गाभा होता. नदीजोड प्रकल्पाद्वारे मान्सुनमध्ये आलेल्या पुराचे जादा पाणी जलाशयामध्ये साठविण्यात येईल. पुढील ऋतुत एखाद्या प्रदेशाच्या गरजेनुसार ते पाणी त्या प्रदेशाला पुरविले जाईल.


      नदीजोड प्रकल्पामुळे २०५० सालापर्यँत देशातील १६ कोटी हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परिणामी देशातील अन्नधान्याचे उत्पादन दुप्पटीने वाढू शकेल. मानवाच्या प्रत्येक कृतीमुळे पर्यावरणात काही ना काही बदल घडतच असतात. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाचा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करत असताना, त्या प्रकल्पाने जमीन, पाणी अशा देशातील उपलब्ध साधनांचा पुरेपुर वापर करता येईल का, याचाही सर्वाँगाने विचार करावा लागतो. त्यासाठीच २००३ साली नदीजोड प्रकल्पाचा तांत्रिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय अशा सर्व बाजुंनी सर्वँकष विचार करण्यासाठी मी १७ कमिट्या नेमल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नद्यांच्या संदर्भात या प्रकल्पाचा विचार करता जागतिक स्तरावर पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भारताची शेजारी राष्ट्रे नेपाळ, बांगलादेश, भुतानची पाण्याची गरज भागवण्याची क्षमता देखील नदीजोड प्रकल्पात आहे. फक्त योग्य नियोजन करुन योग्य ठिकाणी जलाशय बांधणे गरजेचे आहे. गेली कित्येक दशके यासंदर्भात शेजारी राष्ट्रांशी बोलणी सुरु आहे. पुढील काळात बोलणीचे प्रयत्न असेच सुरु ठेवण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती समितीने नदीजोड प्रकल्प दोन विभागात राबवण्याची सुचना केली होती.

* दक्षिणेकडील द्विपप्रदेश आणि हिमालय पर्वतरांगातील उत्तरेकडील प्रदेश या दोन टप्प्यात हा प्रकल्प विभागावा.

* द्विपप्रदेशासाठी दक्षिण वॉटर ग्रीड तयार करुन मुख्य १६ नद्या जोडण्यात याव्यात. महानदी आणि गोदावरी नद्यातील अतिरिक्त पाणी हे पेन्नार, कृष्णा, वैगेई आणि कावेरी या नद्या व त्यांच्या उपनद्यांमध्ये सोडावे.

* केरळमधील पश्चिमवाहिनी नद्या आणि कर्नाटकातील पुर्ववाहिनी नद्या जोडाव्यात.

* तापीच्या दक्षिणेला आणि मुंबईच्या उत्तरेतील नद्या-उपनद्या जोडाव्यात.

* यमुना नदीच्या दक्षिणेकडील उपनद्या जोडाव्यात.

* हिमालय पर्वतरांगांमध्ये गंगा आणि ब्रम्हपुत्रा या दोन प्रमुख नद्यांसह त्यांच्या उपनद्यांवर धरणे बांधावीत. या धरणांद्वारे सिंचन, ऊर्जानिर्मिती आणि पुरनियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करावे.

* कोसी-घागरा, कोसी-मेश, घागरा-यमुना, गंडकी-गंगा, यमुना-राजस्थान, राजस्थान-साबरमती, शारदा-यमुना, फुराक्का-सुंदरबन, ब्रम्हपुत्रा-गंगा, सुवर्णरेखा-महानदी, गंगा-दामोदर-सुवर्णरेखा असे नदीजोड विकसित करावेत.



* गेल्या काही वर्षात वातावरणातील अनाकलनीय बदलांमुळे मान्सुनवर परिणाम होऊन पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. वाढलेल्या लोकसंख्येसाठी पाण्याची गरज लागेल आणि आपल्याकडे जगातील फक्त ४ टक्के स्वच्छ पाणी शिल्लक आहे. पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाशिवाय पर्याय नाही.

* रस्त्यावरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणात घट व्हावी, रेल्वेवाहतुकीवरील भार कमी व्हावा म्हणुन आपल्याला देशांतर्गत जलवाहतुकीवर भर द्यावा लागेल. यामुळे प्रवासाचा खर्च सुद्धा कमी होईल. नदीजोड प्रकल्पामुळे ५००० कि.मी. लांबीचे नद्या जोडणारे रुंद कालवे हे देशभरात स्वस्त जलवाहतुकीचे साधन ठरणार आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी ३००० कोटी रुपये इतक्या डिझेलची बचत होईल.

* देशाची वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जेसारख्या विनाशकारी ठरलेल्या पर्यायांचा पाठपुरावा सरकार करत आहे. नदीजोड प्रकल्प राबविला तर ३४००० मेगावॅट इतक्या प्रचंड प्रमाणात जलविद्युत मिळु शकेल.

* देशात बेरोजगारीचे वाढणारे प्रमाण कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो. नदीजोड प्रकल्पामुळे १० लाख लोकांना किमान १० वर्षे रोजगार निर्मिती म्हणजे कमीत कमी २५० दशलक्ष मनुष्य दिवस रोजगार दरवर्षी, याप्रमाणे १० वर्षात २५०० दशलक्ष मनुष्य दिवस रोजगार निर्मिती शक्य आहे.

* २००२ मध्ये गंगा ब्रम्हापुत्रा खोऱ्यामधील पुरामुळे २५००० कोटींचे नुकसान झाले होते. प्रतिवर्षी होणारे कोट्यावधी रुपयांचे नुकसान आपण नदीजोड प्रकल्प कार्यान्वित करुन टाळु शकतो.

      नदीजोड प्रकल्पासाठी सुमारे पाच लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. साऱ्या देशाचे भविष्य उजळण्याची क्षमता असलेला नदीजोड प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमाद्वारे राबविण्याचे आदेश भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०१२ रोजी केँद्र सरकारला दिले आहेत. माझ्या अध्यक्षतेखाली सादर झालेला अहवाल, समर्थक, विरोधक तसेच अनेक तज्ञांचे अभिप्राय अशा सर्व साधक बाधक बाबींचा २००२ ते २०१२ अशा दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळात सखोल परामर्श घेऊन सदर आदेश दिला गेला आहे. या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी, मंत्री, या क्षेत्रातील तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असलेल्या एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केँद्र सरकारला दिला आहे. या समितीने प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम पाहणे अपेक्षित आहे. आजवर हा प्रकल्प रेँगाळल्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

      नदीजोड प्रकल्प पुर्ण करण्यासाठी १० ते १५ वर्षे काम करावे लागेल. त्यासाठी यापुर्वी गृहित धरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम लागेलही पण प्रतिवर्षी दुष्काळ-पुरांवर तात्पुरता उपाय म्हणुन दिल्या जाणाऱ्या कोट्यावधी रुपयांवर नक्कीच कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. आपल्या देशात असे मोठे प्रकल्प राबवताना पर्यावरण संरक्षण व विस्थापितांचे पुनर्वसन, आणि लाभांचे समन्यायी वाटप याबाबत पारदर्शकता आणि गांभीर्य असलेले दिसत नाही. म्हणून नदीजोड प्रकल्पसारखा महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी प्रकल्प राबविताना या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात तिसरे महायुद्ध झाले तर ते नक्कीच पाण्यासाठी असेल. नदीजोड सारखा प्रकल्प राबविताना आपण भावी पिढ्यांच्या अस्तित्वासाठी आणि देशाच्या सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकासासाठी अपरिहार्य अशा पाण्याची तरतुद करतोय हा उदात्त हेतु समोर असायला हवा. देशात कोणचेही सरकार येवो, आपल्या भावी पिढ्यांना आपण उत्तरदायी आहोत, कमीत कमी इतके तरी राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवायला हवे.

लेखाचा शेवट संस्कृतमधील एका सुंदर श्लोकाने करु-

" ॐ सह नाववतु ! सह नौ भुनक्तु ! सह वीर्यं करवा वहै !
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ! !
ॐ शांति शांति शांति

अर्थात -

तो परमपिता परमेश्वर आपले रक्षण करो !
आपण एकत्रित ऐश्वर्य आणि विविध सुखोसमृद्धी लाभो !
आपण शक्तिमान बनु, एकत्र बलाची उपासना करु, सात्विक सामर्थ्य मिळवु !
आपले अध्ययन तेजस्वी असो, यातुन परस्पर देवत्वाची भावना प्रकटो, एकमेकांविषयी आदर आणि सहानुभूतीची ज्योत जागो !
आपल्यात परस्पर द्वेषाची भावना कधीही न येवो !
ॐ शांति शांति शांति


- सुरेश प्रभू
( माजी केंद्रीय मंत्री )

गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

दंडवतेना 'दंडवत'



२१ जानेवारीला प्रा.मधु दंडवते यांची जयंती होती. खर तर एखाद्या नेत्याची किंवा महापुरुषाची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करताना त्याच्या विचारांचा प्रभाव पुढच्या पिढ्यांवर पडावा, हा उदात्त हेतू असतो. मात्र काळाच्या ओघात त्या हेतूलाच तिलांजली देण्यात येत आहे. शिवजयंतीला डॉल्बीच्या तालावर विक्षिप्त नाच करून मिरवणुका काढणारी मंडळी याचीच तर साक्ष देतात. प्रा. मधु दंडवते या कर्मयोग्याचे कार्यच इतके महान होते की ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 'दंडवते कोण होते?' या प्रश्नातच काही उत्तरे प्रकर्षाने जाणवतात-
नैतिकता हरवत चाललेल्या काळात विचारांच आदर्शवत राजकरण करणारे दंडवते होते...!
'साधी राहणी, उच्च विचारसणी' अंगीकारणारे दंडवते होते...!!
आणि कोकण रेल्वेच अशक्यप्राय स्वप्न पाहताना विरोधकांची होणारी बोचरी टिका हिमालयाप्रमाणे शांत आणि स्तब्ध राहुन सहन करणारे 'आधुनिक युगातील महात्मा' दंडवतेच होते...!!!
एके काळी दंडवते, नाथ पै या नावातच अवघे कोकण सामावलेले असायचे. शब्द आणि वक्तुत्व यांचा मिलाफ असलेली या द्वयींची संसदेतील भाषणे अभ्यासाकरीता आजही जतन करुन ठेवलेली आहेत. देशभरात राजापुर मतदारसंघाची ख्याती 'विद्वान लोकांचा मतदारसंघ' अशी पसरली होती. आजही पुण्यासारख्या शहरात कोण्या अनोळखी आजी-आजोबांना भेटल्यावर- "कोकण...? म्हणजे दंडवतेँच्या मतदारसंघातील आहात तर...??" असे गौरवोद्गार आपोआप ऐकु येतात.
स्मारकांना तात्विक विरोध असणा-या दंडवतेँचे कार्य आणि विचार एवढ्या उच्च दर्जाचे होते की ते स्मरणात ठेवण्यासाठी स्मारकांची गरज कधी भासली नाही आणि यापुढेही भासणार नाही. फक्त 'कोकण रेल्वेचा शिल्पकार' असलेल्या दंडवतेँचे तैलचित्र क्रुतज्ञता म्हणुन कोकण रेल्वेच्या आवारात लावणे गरजेचे होते. मात्र कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी क्रुतघ्नतेचा कळस करुन दंडवतेँचे तैलचित्र देखील काढुन टाकले. तशी क्रुतघ्नता जीवंतपणी नेहमीच दंडवतेँच्या नशीबी आली होती. अशक्यप्राय कोकण रेल्वे पुर्णत्वास नेल्यानंतर लगेचच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने क्रुतघ्नपणे दंडवतेँना पराभुत करुन परतफेड केली. कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी दंडवतेँना देशाचा पंतप्रधान बनण्याची नामी संधी चालुन आली होती. राज्यसभेतुन निवडुन जात पंतप्रधानपद स्वीकारण्याचे सल्ले मिळाल्यावर तत्वांचा पुजारी विनम्रतापुर्वक पंतप्रधानपद नाकारताना म्हणाला-
"मागच्या दरवाजाने (राज्यसभेतुन निवडुन जात) पंतप्रधानपद स्वीकारण मला मान्य नाही. माझ्या लोकांनी मला नाकारल. तिथेच माझ राजकरण संपल."
केवढा हा त्याग...? कधी बघितली आहे का राजकरणात अशी त्यागमुर्ती...?? जीवंतपणी जपलेला हा त्याग मरणानंतरही कायम ठेवत दंडवतेँनी आपले शरीर दान केले. आकस्मिक पराभवामुळे दंडवतेँसारखा कर्मयोगी मनातुन दुखावत अस्वस्थ झाला होता. "मंदिराच्या पुर्णत्वानंतर शिल्पकाराची गरज भासत नाही" हे दंडवतेँचे उद्गार याचीच तर साक्ष देतात. 'का झाला असेल दंडवतेँचा पराभव...? का झाले असतील कोकणचे विचारी लोक इतके बेईमान...?' असे कित्येक प्रश्न मनात आल्यावाचुन राहत नाहीत. कोकणात नव्वदच्या दशकात नव्याने उदयाला आलेली चंगळवादी राजकीय संस्क्रुती उत्तरादाखल मिळते. इतके दिवस तात्विक मुद्द्यांवर खेळल्या जाणा-या निवडणुका आता राजकीय वादाचे उग्र रुप धारण करु लागल्या होत्या. कोकणची हिरवी भुमी प्रथमच रक्ताने लाल झाली होती. निवडणुक निकालानंतर एकमेकांना अलिँगन देत अभिनंदन करणारे उमेदवार आता दिसेनासे झालेत. नेता, त्याचे चेले आणि कार्यकर्ते अशी निर्माण झालेली राजकीय साखळीच कोकणच्या वैचारिक -हासास कारणीभुत ठरली. दंडवते आपल्या कार्यकर्त्यांची वैयक्तिक कामे कधीच करत नसत. माझ्या शिफारशीमुळे माझ्या कार्यकर्त्याच काम होऊन नियमात वागणा-या अन्य कुणाच नुकसान होणार असेल तर ते अन्यायकारक आहे. कोकण रेल्वेची कंत्राटे शिफारशी करत दंडवतेँनी आपल्या कार्यकर्त्याँना मिळवुन दिली असती तर कोकण रेल्वे साकारणारे ई.श्रीधरन सर्व शक्तिनीशी काम कधीच करु शकले नसते.आदर्श नेता आणि कार्यक्षम अधिकारी याचा अनोखा संगम म्हणजे कोकण रेल्वे...!
भारतीय रेल्वेचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा त्याचे दंडवते रेल्वेमंत्री बनण्यापूर्वीचा कालखंड आणि दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतरचा कालखंड असे दोन भाग निश्चितच पडतील. १९७७ मध्ये दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यापूर्वी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बैठक व्यवस्थेत जमीन-आसमानाचा फरक होता. सेकंड क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कठीण लाकडापासून बनलेल्या बाकावर बसून आणि झोपून प्रवास करावा लागत असे. सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या दंडवतेना लोकांचे हे हाल सहन होणे शक्यच नव्हते. त्यासाठीच भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय नानांनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरिब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतार देताना समाजवाद कोळून प्यायलेले दंडवते म्हणाले-
"मला फर्स्ट क्लासचे महत्व कमी करायचे नाही, मला सेकंड क्लासचा प्रवास सुखकर करायचा आहे."
असा विचार करण्यासाठी एका समाजवाद्याचे मन असावे लागते. आजकाल समाजवाद फक्त निवडणुकामध्ये मतांचे राजकारण करण्यासाठी शिल्लक उरलाय. कदाचित ते 'समाजवादी मन' नाना आपल्या देहसोबत घेऊन गेले असावेत.
देशाच्या अर्थमंत्रीपदी असलेले दंडवते मंत्रीपदावरुन पायउतार झाल्यावर गाडी विकत घेण्यासाठी कर्जाकरिता बँकेची पायरी चढले कारण दंडवतेँनी राजकरणातुन स्वतःसाठी कधीच पैसा कमावला नाही. आपल्या कार्यकर्त्याँनाही त्यांनी कधी पैसा उभारु दिला नाही. अशा दंडवतेँना पाडण्यासाठी गरीब जनतेला निवडणुकांच्या आदल्या दिवशी मटणाचे तुकडे, दारुच्या बाटल्या आणि पैशांची खैरात करण्यात आली. पैशांच्या सामर्थ्यापुढे दंडवतेँच्या तत्वांची पुण्याई अक्षरशः धारातीर्थी पडली. 'कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली' या सुरेश भटांच्या ओळी तंतोतंत ख-या ठरल्या. शेवटी एखाद्या पिढीतील लोकांची जशी लायकी असते तसेच नेते त्यांच्या नशीबी येतात. आमच्या पिढीने पैशांच्या म्रुगजळात मश्गुल होत दंडवतेँसारखा आदर्श नेता कोकणच्या राजकरणातुन संपवुन टाकत सत्तापिपासु गोचिडांना जन्म दिला. आपण काय करत आहोत हे समजण्याची किमान कुवत नसलेले आपमतलबी नेते पर्यावरणाचा विध्वंस करुन, कोकणला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. राजकीय दहशतवादाने कोकणची तुलना बिहारशी होऊ लागली आहे.
गाड्यांचा ताफा घेऊन न फिरता बसथांब्यावर बसची वाट पाहत रांगेत थांबलेले, जनतेचा सेवक म्हणुन आपला कार्य-अहवाल दरवर्षी लोकांसमोर ठेवणारे आणि कार्यकर्त्याँची कामे करण्यापेक्षा सर्वसमावेशक लोककल्याणावर भर देणारे दंडवते काळाच्या ओघात इतिहासजमा झाले आहेत. आताच्या नेतेमंडळीँना पाहुन दंडवतेँसारखा निस्प्रुह नेता कधी काळी राजकीय क्षितीजावर अढळ अशा ध्रुवता-याप्रमाणे चमकत होता, या गोष्टीवर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. काळाची गरज म्हणुन राजकरणात 'दंडवतेँचे सुवर्णपुर्व' पुन्हा आणावेच लागेल. दंडवतेँचे विचार एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आपल्या सोबत राहुन पुढचा मार्ग दाखवतील. फक्त गरज आहे ती या विचारांना कालबाह्य न मानता, वर्तमानातील गडद अंधारातुन उज्वल भविष्याकडे नेणारे मानणा-या समविचारी लोकांच्या एकजुटीची...!