रविवार, ५ जानेवारी, २०१४

500 कोटीची धुम...



धुम-3 चित्रपट 20 डिसेँबरला प्रदर्शित झाला पण नेमकी 21 डिसेँबरला माझी परीक्षा आडवी आल्याने परवा नववर्षाच्या शुभमुहुर्तावर 1 जानेवारीला 12 वाजता धुम-3 थिएटरमध्ये जाऊन बघितला. चित्रपट खास थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासाठी मी स्वतःला काही नियम बनवुन घेतले आहेत.
1) चित्रपट हिँदी असला आणि त्यात आमिर खान असला की तो मी बघणारच.
अगदी थ्री इडियट्स नंतर मी फक्त धोबीघाट हा आमिरचा लो बजेट चित्रपट सुद्धा थिएटरमध्ये जाऊनच बघितला होता.
2)  आमिर खान प्रोडक्शनचा सिनेमा असेल तर तो सुद्धा आवर्जुन बघतो.
3) अभिनेत्रीच म्हणाल तर विद्या बालनचे बहुतेक (सगळेच नव्हे) चित्रपट मी आवर्जुन बघायचो.
4) मराठी चित्रटात एक तर सतीश राजवाडे दिग्दर्शक असेल किँवा स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी असेल किँवा अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, म्रुणाल कुलकर्णी, पल्लवी सुभाष यापैकी कोणीही असेल तर चित्रपट पाहण्याचा मी नक्कीच पाहायचा प्रयत्न करतो.

सांगायचा मुद्दा एवढाच की या सगळ्यांचे चित्रपट पाहिल्यावर मनात असो वा नसो ते तुम्हाला विचार करायला प्रव्रुत्त करतात किँवा विनोदी, रोमँटिक असतील तर निखळ आनंद जरुर देतात.मात्र तिकीटाचे पैसे वाया गेल्याचे दुःख कधीच देत नाहीत. गेल्या वर्षी आमिर खानने धुम-3 चित्रपट स्वीकारला आणि एक चाहता म्हणुन माझी घोर निराशा झाली. तिन्ही खानची माझ्या मनात एक इमेज तयार झाली आहे.

त्यापैकी शाहरुख खान हा नटीच्या जीवावर चालणारा किँवा नटीच्या मागे नाच्यावानी नाच करत पुढे आलेला अभिनेता आहे. ज्या लोकांना नट्यांसोबतचे माकडचाळे आवडतात ते त्याला उचलुन घेतात. मी त्याचा चित्रपट ढुंकुनही पाहत नाही.
अपवाद- स्वदेस, चक दे.

ज्यांच्या डोक्यात मेँदु हा अवयव नसतो किँवा ज्यांना मेँदु काढुन चित्रपट बघायला आवडतात त्यांना सलमान खान आवडतो. निव्वळ हाणामारी, पाणचट विनोद या पलीकडे सलमानच्या चित्रपटात अजुन काही पाहायला मिळत नाही. बाँडीबिल्डीँगची आवड असणारा सलमानचा चाहता वर्ग त्याचे दबंग, वाँटेड, रेडी, दबंग 2, एक था टायगर सारखे कथाहिन चित्रपट यशस्वी करतो.

तिसरा खान म्हणजे आमिर खान...! सरफरोश, लगान, रंग दे बसंती, मंगल पांडे, तारे जमीन पर, थ्री इडियट्स सारखे सामाजिक संदेश असणारे चित्रपट देऊन त्याने आमिर खान हा इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा का आहे याची प्रचीती दिली.अशा आमिरने धुम-3 चित्रपटात काम करणे त्याच्या माझ्यासारख्या दर्दी चाहत्याला पचणारे नव्हते.

दुसरीकडे चित्रपट चांगला की वाईट हे त्याच्या कमाईवर ठरवण्याचा नवीनच प्रकार सुरु झालेला.
थ्री इडियट्सने तीन वर्षापुर्वी 206 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर डाँलरच्या तुलनेत रुपयाची किँमत कितीतरी घसरली होती, मल्टिप्लेक्सची संख्या वाढली होती, तरीही आमिरचा विक्रम मोडणे सलमान किँवा शाहरुखला शक्य झाले नव्हते. शेवटी रडत-मरत शाहरुख खानच्या टुकार अशा चेन्नई एक्सप्रेसने 226 कोटी कमावुन आमिरचा विक्रम तोडला.  त्यानंतर क्रिश-3 248 कोटी कमावुन पहिल्या क्रमांकावर गेला. आता वेळ सरपटत चालणा-या सरड्यांना त्यांची धाव कुंपणापर्यँत असते हे दाखवण्याची होती.

हिँदी चित्रपटस्रुष्टीत आमिर खानला मात देणारा अभिनेता जन्माला यायचा आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त कमाई करुन दाखवणे हे आव्हान आमिरसमोर होते. आमिर धुम-3 चे शाहरुखप्रमाणे बेभान होऊन छोट्या पडद्यावर प्रमोशन करेल अशी अपेक्षा होती. माझे चित्रपट लोक स्वतःहुन थिएटरमध्ये जाऊन बघतात, त्यासाठी प्रमोशनची गरज नाही हे सांगुन आमिरने आपला आत्मविश्वास दाखवला. धुम-3 रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 36 कोटीची रेकाँर्डतोड कमाई करुन आमिर खानच्या प्रेक्षकांमध्ये असलेल्या विश्वासाहार्तेवर शिक्कामोर्तब केले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला होता की फिल्मच्या कमाईत शुक्रवार, शनिवार, रविवार या पहिल्या तीन दिवशी मिळणारी कमाई ही हिरोच्या क्रेडिबीलीटीवर ठरते. मात्र नंतर त्या चित्रपटाचे कथानक चांगले असेल तरच तो सुपर-डुपर हिट होतो. कदाचित धुमचे कथानक सर्वोत्क्रुष्ट दर्जाचे नाही याची आमिरसारख्या फिल्मच्या जाणकाराला अगोदरच कल्पना असावी. कमजोर कथानक असुनही गेले 2 आठवडे धुम-3 बाँक्स आँफिसवर जो धुमाकुळ घालत आहे यावरुनच आमिरच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

धुम-3 प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खानवर फक्त टिका करायची या उद्देशानेच काही प्रतिक्रिया फेसबुकवर झळकल्या.
1) आमिरने फिजिक्सच्या नियमांची वाट लावली आहे.
2) दोरखंडावरुन कोणी बाईक चालवत का...?
3) बिल्डीँगवरुन कोणी धावु शकत का...?

क्रिश कोसळणारी बिल्डीँग हाताने धरु शकतो मग आमिर खान का करु शकत नाही...?
नव्हे क्रिश म्हणे 'सुपरहिरो' होता.म्हणजे या तथाकथित टिकाकारांच्या मते सुपरहिरो लेबल लावल्याशिवाय फिजीक्सचे नियम तुडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

मग मला वाटत सलमान खान पोलिस बनुन जवळजवळ सगळ्याच चित्रपटात हा अतिरंजीतपणा करतो आणि लोक त्याला शिट्ट्या मारुन भरघोस कमाई देखील मिळवुन देतात. त्यावेळी या टिकाकारांचा आक्षेप नसतो.
आता म्हणतील सलमान 'पोलिस' होता आणि आमिर 'चोर' आहे.

'धुम' आणि 'धुम-2' चा सिक्वेल असलेल्या 'धुम-3' कडुन नक्की या टिकाकारांची काय अपेक्षा होती...?
आमिर खान बँक लुटुन बँगेत पैसे घेऊन सायकलवर बसुन पळण्याचा प्रयत्न करेल. नंतर पोलिस बैलगाडीतुन त्याचा पिच्छा करतील.
हा प्रसंग तुम्हाला नक्कीच रिअँलिस्टिक वाटला असता आणि तोच थिएटर मध्ये जाऊन बघण्यासाठी तुम्ही 300 रुपये देऊन तिकीट खरेदी करणार होता का...?

'धुम-3' म्हणजे तद्दन गल्लाभरु आणि सलमानच्या चित्रपटाप्रमाणे डोक बाजुला ठेवुन पाहण्याचा चित्रपट होता, हे माहिती असताना असे चिकीत्सक लोक मुळात चित्रपटग्रुहात गेलेच कशासाठी...? कदाचित लवकरात लवकर चित्रपट पाहुन आमिरवर कशी टिका करता येईल यातच त्यांना स्वारस्य असावे.काहीँनी नवीनच युक्तीवाद केला. त्यांच्या मते यापेक्षा कितीतरी चांगले अँक्शनपट हाँलिवुडमध्ये असतात. धुम-3 मध्ये एवढ काय आहे...?
अरे, हाँलिवुडबद्दल एवढा अभिमान असेल मग तुम्ही हाँलिवुडपटच पाहा ना...! आमिर काय तुमच्या घरी श्रीफळ घेऊन निमंत्रण द्यायला आला नव्हता.

धुम-3 एँक्शनपट म्हणुन गाजला असे म्हणण्यापेक्षा ती अँक्शन करणारा आमिर खान होता म्हणुन गाजला. उदाहरणच द्यायचे झाले तर सनी लियोन, मल्लिका शेरावत, नेहा धुपिया अशा थर्ड क्लास अभिनेत्रीँना घेवुन प्रणयद्रुश्यांनी भरलेला एखादा चित्रपट असेल तरीही तो फ्लाँप होतो. त्याच वेळी ऐश्वर्या राय, करिना कपुर, विद्या बालन, दिपीका पादुकोन अशा नामवंत नट्यांनी एखादा किसीँग सीन दिला तरी लोक तिकीट काढुन चित्रपट बघतात कारण लोकांच्या द्रुष्टीने प्रणयद्रुश्ये महत्वाची नसतात तर ती देणारी अभिनेत्री महत्वाची असते. अगदी त्याचप्रमाणे अँक्शनपट अनेक अभिनेते करतात पण धुम-3 आमिरने केला म्हणुन तो खास होता.

सध्याच्या काळात टाँपवर असलेल्या कँटरिना कैफसारख्या अभिनेत्रीला धुम-3 मध्ये पुर्णपणे झाकोळुन टाकत आमिर खान स्वतःचे चित्रपट स्वतःच्या जीवावर चालवुन दाखवतो,हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आमिरच्या चित्रपटात नट्या फक्त नावालाच असतात. माझ्या मते धुम-3 सारख्या गल्लाभरु चित्रपटात कँटरिना कैफला घेतलच असेल तर तिला टु-पीस वर उतरवणे आणि बेडसीन्सचा समावेश करणे ही चित्रपटाची खरी गरज होती. कँटरीना अशा सीन्सना इन्कार देत असेल तर तिला हाकलुन देत दुस-या नटीचा समावेश करायला पाहिजे होता. शेवटी कँटरीना कैफ म्हणजे घरंदाज ऐश्वर्या राय किँवा माधुरी दिक्षित नव्हे. बुम चित्रपटात हिचे प्रताप सगळ्यांनीच पाहिले आहेत. धुम-3 चित्रपटा अगोदर कँटरीनाच्या पेहरावाबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या पण प्रत्यक्षात अनेकांचाच भ्रमनिरास झाला. कँटरीना कैफच्या नाँर्मल लुकमुळे धुम-3 चित्रपटाच उत्पन्न ब-याच प्रमाणात घटल.

प्रत्यक्ष चित्रपटाबद्दल बोलायच झाल तर मध्यांतरापर्यँत अभिषेक बच्चनच्या रिक्षामधुन एंट्रीचा एक सीन वगळता चित्रपट अप्रतिम वाटतो. आमिर खानने साहिर उत्क्रुष्टरित्या साकारला आहे. मध्यांतरानंतर आमिर खानचा डबलरोल उलगडण्याच्या नादात फ्लँशबँकचा भाडीमार करुन मध्यांतरापुर्वी पाहिलेली तीच तीच द्रुश्ये पुन्हा बघताना चित्रपट कंटाळवाणा वाटु लागतो. त्यात भर पडते ती वेशभुषा बदलुन पाणचट विनोदांचा भाडीमार करणा-या अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा या जोडगोळीची...! उदय चोप्राला अभिनेता का म्हणाव याच उत्तर त्याला तरी देता येईल का...? त्यात करुन 'तु ही जुनुन' हे बकवास गाण त्याच दरम्यान येत. अशा रितीने सलग 40 ते 45 मिनीटे अतिशय कंटाळवाणी वाटु लागतात आणि धुम-3 च्या नावे बोँब मारायला टिकाकारांना आयते कोलीत मिळते. त्या वाईट काळातही आमिर खानने तोतरेपणा, साधेपणा, निरागस चेहरा ठेवुन सर्वाँसमोर आणलेला समर प्रेक्षकांना आवडु लागतो. एखाद्या हळु गाडी चालवणा-याने अचानक गाडीचा गिअर बदलावा त्याप्रमाणे चित्रपट शेवटी कात टाकतो. साहिर आणि समरमधील वाद रंगवताना आमिर खानने अभिनयाची अत्त्युच्च पातळी दाखवली आहे. साहिरपेक्षा बुद्धिमान असुनही समरची नशीबाने केलेली वाताहात मन हेलावुन टाकते. वडीलांना आत्महत्या करण्यास प्रव्रुत्त करायला लावणारी बँक पुर्णपणे बरबाद केल्यानंतर पुर्ण चित्रपटभर बेभानपणे वावरणारा साहिर अचानक समरप्रती हळवा होतो. समरला त्याचे प्रेम म्हणजेच आलिया मिळुन दोघांनाही उर्वरित आयुष्य सुखात जगायला मिळावे त्याकरिता स्वतःवर सगळ्या आरोपांचा ठपका घेत आत्महत्या करायचे ठरवतो. आयुष्यभर 'दोन शरीर, एक जीव' म्हणुन जगत आलेल्या समर-साहिरपैकी जेव्हा साहिर आत्महत्या करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या भावाविषयी नितांत प्रेम असणारा समरही साहिरसोबत आपले जीवन संपवुन टाकतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही.

धुम-3 मध्ये आमिरने केलेल्या अभिनयाला खरच तोड नव्हती तरी सुद्धा आमिरच्या कँटेगरीतला हा चित्रपट नक्कीच नव्हता हे त्याचा कट्टर चाहता असुनही मला मान्य करावेच लागेल.
एकंदरीतच शाहरुख-सलमानच्या गल्लाभरु चित्रपटांपेक्षा धुम-3 कितीतरी पटीने चांगला होता कारण त्याला एक वेगळा भावनिक अँगल होता.

कमाईच्या बाबतीत परवापर्यँत भारतामध्ये 334 कोटी रुपये आणि परदेशात 147 कोटी रुपये कमावुन धुम-3 चित्रपट 500 कोटीच्या जादुई आकड्याजवळ येऊन पोहोचलाय. "सौ सुनार की और एक लोहार की" याचा दाखला पेश करत आमिरने इतर नटांना कमाईच्या बाबतीत कुठल्या कुठे भिरकावुन दिले आहे.

लेखाचा शेवट करताना आमिर खानसाठी एवढेच म्हणेन-
"बंदे है हम उसके,
हम पे किसका जोर,
उम्मीदो के सुरज,
निकले चारो और,
इरादे है फौलादी,
हिम्मती हर कदम,
अपने हाथो किस्मत लिखने,
आज चले है हम."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा