गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

तत्वांशी तडजोड प्रभूंना शक्य नाही...


तत्वांशी तडजोड प्रभूंना शक्य नाही...!"

आजकल एक नवीनच आरोप माजी केँद्रीय मंत्री सुरेश प्रभूंवर होतोय की-

"सुरेश प्रभू मतदारसंघात कधीच फिरत नाहीत."

एखाद्या नेत्यावर आरोप करायला काही मुद्देच शिल्लक नसतात तेव्हा असले फालतु आरोप केले जातात. त्यात प्रभुंचा काहीच दोष नाही.
आरोप करणा-या अर्धवटांना खासदाराचे नक्की काम काय असते याची साधी कल्पना तरी आहे का...? मतदारसंघात गहन बनलेले प्रश्न दिल्लीतील संसदेत मांडुन त्या प्रश्नावर अवघ्या देशाचे लक्ष वेधुन घेण्याचे काम खासदाराला संसदीय कार्यप्रणालीत बहाल केले आहे. सुरेश प्रभुंनी एका खासदाराचे कर्तव्य चोखपणे बजावत आपल्या कारकीर्दीत मतदारसंघातले विविध 900 प्रश्न मांडले. एवढेच नाही तर देशासाठी गंभीर बनलेल्या अनेक विषयांवर आपल्या अमोघ वक्त्रुत्वाच्या जोरावर संसदेने जतन करुन ठेवावीत अशी भाषणे केली. बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते अशा संसदपटुंनी राजापुर मतदारसंघाची 'सभ्य आणि विद्वान लोकांचा मतदारसंघ' अशी जी परंपरा तयार केली होती ती कायम ठेवली. सुरेश प्रभुंना 'दंडवतेँचा वारसदार' उगाच नाही म्हणत...!
अगदी अलीकडेच 'गौण खनिजाचा प्रश्न' जेव्हा मतदारसंघात गंभीर बनला तेव्हा माजी खासदार सुरेश प्रभुंनीच दिल्लीतले आपले वजन वापरुन केँद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेऊन तो निकालात काढला. विद्यमान खासदार गौण खनिज प्रश्नी संसदेत का आवाज उठवु शकले नाहीत...? स्वतःच्या मतदारसंघात लोकांसमोर डरकाळ्या फोडणारे नेते संसदेत मात्र म्याव होऊन बसतात कारण संसदेत तोँड उघडण्यासाठी दिल्लीत शब्दाला वजन असावे लागते. सुरेश प्रभुंच्या शब्दाला दिल्लीत किँमत आहे म्हणुनच ते मतदारसंघातले प्रश्न संसदेत मांडु शकतात. विद्यमान खासदार पाच वर्षात केवळ 60 मिनीटे सुद्धा बोलले नाहीत. आता त्यांच्या शब्दाला दिल्लीत किँमत आहे का नाही ते तुम्हीच ठरवा. संसदेत बोलुन मतदारसंघाचे प्रश्न मांडता येत नसतील तर नक्की खासदार तरी कशासाठी बनलात याचे उत्तर द्या.

दिल्लीत संसदेत बोलता येत नसेल आणि जनतेचे प्रश्न मांडता येत नसतील तेव्हा त्या खासदाराला मतदारसंघात रिकामटेकपणा करत फिरल्यावाचुन आणखी काही काम राहत नाही. खासदाराने मतदारसंघात फिरायचे तर आमदार, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, ग्रा.पं.सदस्य यांचे काम काय याच उत्तर विद्यमान खासदार देतील काय..?जर खासदारानेच मतदारसंघात फिरायचे असेल तर यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची पदे नष्टच करुन टाकलेली बरी...! संविधान बनविणा-यांची आणि घटनादुरुस्ती करणा-यांची डोकी ठिकाणावर नव्हती अस विद्यमान खासदारांना म्हणायच आहे का...? अगोदर संविधानाचा नीट अभ्यास करा मग नाथ पै, दंडवते, प्रभू यांच्यासारखे संविधानाला पुज्य मानणारे विद्वान खासदार मतदारसंघात का फिरत नाहीत याचा प्रत्यय येईल.

नाथ पै,दंडवते कधी साकव, पुलांच्या फिती कापत मतदारसंघात फिरत नसत. दंडवतेँनी मतदारांना खडसावुन सांगितले होते की साकवाच्या फिती कापल्यामुळे तुम्ही मला मत देणार असाल तर मला एकही मत मिळता कामा नये. अशी काम करत फिरण खासदार म्हणुन माझ्या तत्वात बसत नाही. याला म्हणतात तत्वांचा पुजारी...! प्रभुंनी मतदारसंघात विनाकारण न फिरण्याची दंडवते, नाथ पै यांची परंपरा कायम राखली आहे.
एनडीए सरकारच्या काळात सुरेश प्रभु सर्वोत्क्रुष्ट काम करणा-या मंत्र्यांपैकी एक होते. त्यांना मिळालेल्या ऊर्जा आणि पर्यावरण खात्यात त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वाजपेयीँनी प्रभुंना महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्षपद दिले होते. या प्रकल्पामुळे देशाला दुष्काळ आणि पुरापासुन कायमची मुक्ती मिळणार आहे. आता नदीजोड प्रकल्पाचे काम करायचे सोडुन प्रभू मतदारसंघात फिरणार आहेत का...? अशा देशहिताच्या प्रकल्पाचा राजापुर मतदारसंघाचा खासदार अध्यक्ष होतो याचा खर तर कोकणवासियांना अभिमान वाटायला हवा पण इथेही खेकडाप्रव्रुत्तीच दिसुन येते. प्रभुंवर टिका करणा-यांनी अगोदर एका केँद्रीय मंत्र्याच्या जबाबदा-या काय असतात याचा विचार करा. कधीतरी मतदारसंघापुरता संकुचित विचार न करता देशहिताचा व्यापक विचार करा. अगदी मतदारसंघाचा विचार केला तरी सुरेश प्रभुंएवढा कोकणचा विकास आजपर्यँत कोणीही करु शकलेला नाही. प्रभुंनी केलेला कोकणचा विकास समजावुन घेण्यासाठी 19 जानेवारीला तरुण भारतच्या 'अक्षरयात्रा' पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा 'कोकण विकासाच्या दाहि दिशा' हा लेख वाचा.प्रभुंनी केलेला कोकणचा विकास लक्षात आल्यानंतरही 'सुरेश प्रभु मतदारसंघात फिरत नाहीत' असे आरोप ज्यांना करायचे असतील त्या खेडग्या लोकांना दंडवतेँच्या भाषेत उत्तर देताना एवढच सांगेन की-

तुम्हाला 'गाव तिथे दहीहंडी' किँवा 'गाव तिथे खासदार' म्हणत कामाशिवाय गावात भटकणारा, 'खासदार चषक' स्पर्धा भरवुन क्रिकेटचे फड रंगवणारा खासदार पाहिजे असेल तर क्रुपया तुम्ही सुरेश प्रभुंना तुमचे मत देऊ नका. प्रभु असली कामे करुन आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाहीत. प्रभु दंडवतेँचे वारसदार होते आणि यापुढेही राहतील. त्यासाठीच दंडवतेँची कार्यपद्धती अनुसरणे त्यांना अपरिहार्य आहे.

मतदारसंघातील एखाद्या गावात यायची खरच गरज असेल तर प्रभु नक्की त्या गावाला भेट देतील पण देशहितासाठी करावी लागणारी महत्वाची कामे बाजुला ठेवुन रिकामटेकडेपणा करत मतदारसंघात विनाकारण फिरणार नाहीत. मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांना दिल्लीत वाचा फोडुन न्याय मिळवुन घ्यायचा असेल तर आणि तरच प्रभुंना मत द्या.

1 टिप्पणी: