सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

"फिरुनी पुन्हा नवे, नाते मला हवे...!"



'प्रेम' या शब्दाला प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वपुर्ण स्थान आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी कोणावर तरी नक्कीच प्रेम केले असेल. खास करुन ती व्यक्ती तुमची प्रियकर अथवा प्रेयसी असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला आपल्या तिच्यावर असणा-या प्रेमाची कबुली देण अपरिहार्य बनत. आता प्रेमाची कबुली नेमकी कधी द्यावी हे बहुतेक वेळा कळत नाही आणि मग गोँधाळल्यासारख व्हायला होत. पाश्चात्यांनी त्यासाठीच 'Valentine day' ची संकल्पना पुढे आणली. फक्त पाश्चात्यांनी संकल्पना आणली म्हणुन आपल्या महान संस्क्रुतीचे गोडवे गात Valentine day ला विरोध करुन नाक मुरडणारे अनेक तथाकथित संस्क्रुतीरक्षक भेटतील. त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन या दिवशी प्रत्येक प्रियकराने आपल्या प्रेयसीसमोर प्रेमाची कबुली दिली पाहिजे. ती आपल्या आयुष्यात किती महत्वाच्या स्थानी आहे याची जाणीव तिला करुन दिली पाहिजे. आजच्या दिवशी प्रेमाबद्दलचे माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल.

"साधारण 5-6 वर्षापुर्वी 'ती' माझ्या आयुष्यात आली. वयच असत ते प्रेमात पडण्याच...!
प्रेमाची हुरहुर लागण्याच...!!
या जगात आपल अस हक्काच कोणी तरी असाव ही भावना बळावण्याच...!!! 'प्रेम' आणि 'आकर्षण' या शब्दातला फरक कळत नसतानाही मी तिच्या प्रेमात पडलो. आम्ही पहिल्यापासुनच एकमेकांचे चांगले मित्र होतो, नंतर फोनवर बोलण होऊ लागल आणि माझ्या नकळत 'ती' माझ्या आयुष्याचा 'अविभाज्य' भाग बनली. सुरुवातीचे काही महिने फोनवर तासनतास गोडगोड बोलण्यात गेले. एकीकडे लेक्चरला एक-एक मिनिट तासावानी वाटायचा आणि दुसरीकडे फोन ठेवल्यावर दोन-तीन तासांच बोलणही काही मिनीटांचच वाटायच. नंतरच्या काळात एकमेकांबाबत 'पझेसिव्हनेस' वाढत जातो आणि मग खटके उडणारच...! भांडणानंतरचा अबोला, काही दिवसांचा दुरावा, मग Sorry म्हणुन केलेली तडजोड हे सगळ काही नात्याचाच एक भाग बनुन जात. एरव्ही स्वतःची चुक असली तरी इतर कोणाला Sorry म्हणताना माझा Ego नेहमीच आड यायचा. कोणासमोर झुकण मला कधीच मान्य नसायच. मात्र तिच्या बाबतीत अनेकदा माझी चुक नाही हे माहित असतानाही मी Sorry म्हणायचो, नेहमी पडती बाजु घ्यायचो. कुठेतरी मला माझ्या आवडत्या व्यक्तीसमोर झुकण्यात फार मोठा आनंद वाटायचा. त्या तडजोडीत नात टिकवल्याच वेगळच समाधान मिळायच. या सर्व अनुभवानंतर आम्हा दोघांनाही नात उलगडत गेल. आम्हाला एकमेकांच्या स्वभावाची नीट ओळख झाल्यानंतर भांडणांच प्रमाण कमी झाल. काही काळानंतर फोनवरच बोलणही अपुर वाटायच. भेटण्याची ओढ स्वस्थ बसु द्यायची नाही पण भेटताना कोणी पाहणार तर नाही ना, हा यक्षप्रश्न नेहमीच पडलेला असायचा. खर तर आजच्या काळात जिथे मुल-मुली एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन बिनधास्त फिरतात त्या काळात लोकांना घाबरण्याच काहीच कारण असु नये. आज माझ्या एमबीएच्या वर्गातही अनेक जोडपी एकत्रच बसतात. प्रेमाच्या बाबतीत माझे विचार थोडे कालबाह्यच आहेत आणि योगायोगाने तसेच विचार असणारी मुलगी माझ्या आयुष्यात आली. प्रेम ही 'प्रदर्शनीय' गोष्ट नसावी. काही गोष्टी आपल्यापुरत्या ठेवलेल्या चांगल्या असतात. त्यामुळे अगदी भेटल्यानंतरही 10 मिनीटांपेक्षा जास्त आम्ही थांबत नसायचो. फोनवर तासनतास बोलत असलो तरी प्रत्यक्ष भेटीत तोँडातुन शब्दच बाहेर पडत नसायचे. माझ्यासमोर उभ असताना तिची झुकलेली नजर आणि गालातल्या गालात हसण्याची अदा आजही तिच्यावर पुन्हा जीव ओवाळुन टाकण्यास प्रव्रुत्त करते. अगदी कोणाचीही हमखास नजर लागावी असच आमच 'नात' होत. तळहातावरच्या फोडाप्रमाणे, गुलाबाच्या पाकळीवानी आम्ही दोघांनाही ते जोपासल होत. नंतरच्या काळात परिस्थितीच अशी बिकट झाली की ते नात पुढे नेण आम्हा दोघांनाही कठीण बनल. भांडण करुन कायमच दुर होण्यापेक्षा आजही आम्ही एकमेकांमधील मैत्री कायम ठेवण्याची प्रगल्भता दाखवली. आपण एकत्र येऊ शकत नाही हे माहित असताना दुसरी कोणीतरी शोध आणि स्वतःच आयुष्य स्थिर करण्याचा सल्ला तिने मित्रत्वाच्या नात्याने अनेकदा दिला. आपण पुर्ण दुनियेला फसवु पण स्वतःच्या मनाला कसे फसवु शकणार...? आयुष्यात काही जागांमुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन येत नसते कारण आपल्या मनानेच त्या जागा विशिष्ट व्यक्तीलाच बहाल केलेल्या असतात. अगदी तिच्या आयुष्यातीलही माझी जागा दुसरा कोणीच घेऊ शकला नाही कारण आम्ही मनाने एकच होतो. त्यामुळेच पुढील काळात दोघांच्या वाटा वेगवेगळ्या असुनही एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटते. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतोच. तिच्यावर भरभरुन प्रेम करण माझ्या हातात होत आणि मी ते प्रामाणिकपणे केल. आयुष्यात अनेकदा अपयश बघितले आणि या मनाने अगदी खंबीरपणे ते पचवले. मात्र तिचा हातात दुस-या कोणाच्या हातात पाहण्याची ताकद माझ्या नजरेत नाही. अस म्हणतात, मन मोठ असल की सार काही सामावुन घेता येत पण माझ सर्वस्वच दुस-या कोणाच्या मालकीच झालेल मी सहन करु शकणार नाही. तिच्यासोबत घालवेला प्रत्येक क्षण कुठेतरी आठवणीच्या कप्प्यात बंदिस्त झालाय. भविष्याबाबत सजवलेल्या स्वप्नांना निरोप तरी कसा द्यायचा, हेच मला समजत नाहीय. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवताना माझ्या नशीबी संघर्ष आलाय. यावेळी साक्षात नियतीशी संघर्ष करुन मी माझ प्रेम मिळवुनच दाखवेन कारण कोणत्याही परिस्थितीत हार मानुन हातपाय गाळण माझ्या रक्तातच नाही. फक्त यावेळी नात बांधण्यासाठी पुन्हा एकदा तिची साथ मला नव्याने लागेल.

लेखाचा शेवट 'तुझ्यावीना' गाण्याच्या ओळीँनी करतो.-

"फिरुनी पुन्हा नवे, नाते मला हवे,
जीव तुटतो हा, का असा रे, सांग ना,
तुझ्यावीना... तुझ्यावीना..."

'Happy Valentine Day...!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा