सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

"...आणि 'दगड' लोकसभेचा उमेदवार झाला."


सेनेचे कट्टर समर्थक नेहमी मला उपहासाने सांगायचे की,
"पक्षाने 'दगड' जरी उभा केला तरी आम्ही त्याला निवडुन आणु."

आज तरुण भारतमधील बातमी वाचुन मी अवाकच झालो. कार्यकर्त्याँच्या शब्दांचा मान राखत पक्षश्रेष्ठीँनी लोकसभेसाठी चक्क दगडालाच उमेदवारी बहाल केली आहे.
आजपर्यँत दगडाला शेँदुर फासत देव करण्याच्या आख्यायिका ऐकल्या होत्या पण इकडे तर दगडालाच उमेदवार म्हणुन निवडणुकीत उतरवले. काय करणार...! कलियुगातील पक्षांकडुन यापेक्षा वेगळ्या उमेदवाराची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.

आम्ही दगडाला निवडुन आणु हे पक्षाप्रती भावनिक होऊन म्हणणे समजण्यासारखे आहे पण व्यावहारिक जीवनात दगड क्वचितच निवडुन येतात. अन्यथा एव्हाना संबंध महाराष्ट्रात भगवा फासलेले दगड नेतेपदी मिरवताना दिसले असते.

आता याच दगडाच बघा ना...! यापुर्वी विधानसभा निवडणुकीत मुंबईमधील मतदारसंघात या दगडाला लोकांनी एकदा नव्हे तर सलग दोनदा पायदळी तुडवले आहे. म्हणुनच मागच्या दाराने विधानपरिषदेत जायची वेळ आली. आता मुंबईसारख्या शहरात दगडाला उमेदवार मानणारे सेना कार्यकर्ते कमी आहेत का...?मग तरीसुद्धा या दगडाचा मुंबईत पराभव का झाला...? कारण निवडणुकांमध्ये कोणत्याही दगडाला मत द्यायला फक्त त्या त्या पक्षाचे भावुक कार्यकर्ते नसतात तर आमच्यासारखे सामान्य लोक देखील असतात. विचार करुन मत देणारे लोक पक्षाने उभ्या केलेल्या दगडांना त्यांची योग्य ती लायकी दाखवतात आणि एका चांगल्या उमेदवारालाच आपले बहुमुल्य मत देऊन निवडुनही देतात. जनतेने विधानसभेला दोनदा नाकारल्यानंतर माझ्यासारखा कोणी असता तर राजकरण सोडुन संन्यास घेऊन हिमालयात गेला असता. मात्र काही निर्लज्ज लोकांमध्ये कोडगेपणा ठासुन भरलेला असतो. विधानसभेत दोनदा पराभव झाल्यानंतर मुंबईतला मतदारसंघ सोडुन फरार झाले आणि इकडे कोकणात थेट लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी आले. हे म्हणजे बारावीत शास्त्र शाखेत नापास झालेल्या पोराने इंजिनिअरीँगची डिग्री मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे. अरे पोरा, अगोदर बारावी तर पास हो. मग इंजिनीअरीँगच बघु...! पण कोण काय करणार...? हे राजकरण आहे इकडे फक्त पैसा बोलतो. पक्षश्रेष्ठीँच्या समोर पैशांच्या पेट्या टाकल्या की त्यांचे कान बहिरे होऊन, सामान्य लोक कोणाला उमेदवारी द्यायला सांगतायेत ते ऐकुच येत नाही. त्याचबरोबर पैशांच्या बंडलांसमोर पक्षश्रेष्ठीँची द्रुष्टीदेखील अंध होऊन जाते. त्यांना स्पर्धेत असलेला 'सभ्य आणि विद्वान' उमेदवार दिसतच नाही. अरे, पैशाने विकले जाऊन दगडांना उमेदवारी द्याल पण निवडणुकीत मत देणा-या मतदारांना कसे विकत घ्याल...? अशा दगडांना उमेदवारी दिल्यामुळेच साहेबांनी रक्ताच पाणी करुन उभारलेल्या सोन्यासारख्या पक्षाचा आज 'दगड' व्हायची वेळ आली आहे. पैशांच्या धुंदीत मश्गुल होऊन भान हरपलेल्या मदांधांना हे कोणी समजवावे...? साहेबांनी रत्नपारख्याच्या नजरेने एक-एक हिरा जमवुन पक्ष बांधला आणि आज थिल्लर पैशांपायी साहेबांच्या त्या हि-यांनाच बाजुला करुन दगडांना पुढे आणुन तुम्ही नक्की काय साध्य करू पाहत आहात...? हरामखोरांनो, साहेबांनी ऊन्हातान्हात फिरुन, उभ आयुष्य खर्च करुन, उभारलेल्या पक्षाचा त्यांच्या पश्चात विध्वंस करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही...??

शिक्षणाचाच विषय आला म्हणुन एक गोष्ट सांगतो, राजापुर मतदारसंघाने आजपर्यँत नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू अशा विद्वान उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे C.A, L.L.B, Phd, B.Com अशा एकापेक्षा एक पदव्या मिळवलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बुद्धिमत्तेने नावाजलेल्या उमेदवाराला नाकारुन ज्या दगडाला पुढे आणत आहात त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे...? की बुद्धिमत्तेच्या निकषावरही उमेदवाराच्या डोक्यात 'दगड'च भरलेले आहेत...?? कोकणच्या लोकांनी आजपर्यँत बुद्धिमान उमेदवारालाच आपले बहुमुल्य मत देऊन मतदारसंघाचा वारसा जपलेला आहे. त्यामुळे मतदानापुर्वी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाहिर करावीच लागेल.

अजुनही काही लोक प्रभुंना पक्ष राज्यसभेवर पाठवणार अशी खोटारडी आश्वासने देत आहेत. त्या अर्धवटांना एवढच सांगेन की राज्यसभेची जागा याअगोदरच उद्योगपती धुत आणि संजय काकडे यांना बहाल केलेली आहे. यातील संजय काकडेँनी इयत्ता सातवी पास एवढे उच्चशिक्षण घेतले आहे. आता राज्यसभेत एवढे उच्चशिक्षित उमेदवार पाठवणारा पक्ष लोकसभेला कोणत्या दर्जाचे उमेदवार देईल हे वेगळे सांगायला नको.

काही कार्यकर्ते सांगतात त्यानुसार धुत यांनी यापुर्वी खासदारकीच्या काळात फार मोठा जनसंपर्क ठेवला असेल किँवा काकडेँनी संघटना उभारली असेल. त्यामुळेच प्रभुंना डावलुन या दोन महाशयांना राज्यसभेची सीट बहाल केली असावी. नाही का...?

असो, मांजर डोळे बंद करुन दुध पिते कारण त्याला वाटते आपण दुध पितोय हे जगाला कळणार नाही. प्रत्यक्षात दुनियेला सगळ माहित असत. "ये पब्लिक है, सब जानती है." धुत किँवा काकडे यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी किती पेट्या देऊन पक्षसेवा केली हे शेँबड्या पोरालाही माहित आहे. त्याच पक्षाने लोकसभा उमेदवारी दगडांना कशी बहाल केली हे वेगळ सांगायची गरज वाटत नाही.

शेवटी इतकच सांगेन की, घोड्यांच्या शर्यतीत रंग फासलेल्या गाढवाला उतरवता येईलही पण शर्यतीला सुरुवात होताच जेव्हा तो गाढव आडवातिडवा धावु लागतो तेव्हा लोकांना लगेच कळत-

"अरेच्चा हा घोडा नाही...! हा तर गाढव आहे."

कोकणच दुर्देव इतकच की नाथ पै, मधु दंडवते यांच्या उमेदवारीने पवित्र झालेल्या या मतदारसंघात प्रथमच घोड्यांची नव्हे तर गाढवांची शर्यत होत आहे. फक्त आम्ही या 'गाढवांच्या शर्यतीत घोड्याला उतरवु पाहत होतो पण उमेदवारी देणा-या गाढवांना शेवटी 'दुसरा गाढव'च शर्यतीसाठी योग्य वाटला. दुर्देवाने आता कोणता गाढव शर्यतीत जिँकतोय, हे आम्हाला पाहायचय.

आपल्या मतदारसंघातील गाढवांच्या शर्यतीचे साक्षीदार होण्याअगोदर मधु दंडवतेँनी डोळे मिटले आणि मोठ्या संकटातुन सुटले. अन्यथा आज त्यांच संवेदनशील मन नक्कीच दुखावल असत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा