रविवार, ६ एप्रिल, २०१४

नाना पोटी, नाना कळा...!



"नाना पोटी, नाना कळा..."

ऐकलत का...! आपला तथाकथित क्रांतिवीर नाना पाटेकर हल्ली व्यथित झालाय. का तर म्हणे नानाला गेल्या 60 वर्षात कोणी मराठी माणुस पंतप्रधान झालेला बघायचा होता. नाना पाटेकर काही महिन्यापुर्वी 'प्रहार' वर्तमानपत्राच्या समारंभात असाच दुःखी झाला होता. त्यावेळी 'कोकणचा वाघ' पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला नाही याच नानाला दुःख होत. नानाच्या लेखी पडिक आणि ओसाड असलेल्या जमिनी लोक जैतापुर अणुप्रकल्पाला देत नाहीत, याचही प्रचंड दुःख होत. मला वाटत चित्रपटात काम करता करता नानाने साईड बाय साईड अणुशास्त्रातील पदवी संपादन केली असावी. जैतापुर अणुप्रकल्प कोकणच्या फायद्याचा कसा यावर एखादा शास्त्रज्ञ असल्याच्या अविर्भावात तो मुक्ताफळे उधळीत होता. नंतर थोड्याच दिवसात नानाला सिँचन घोटाळेबाज तटकरे प्रेमाचे झटके येऊ लागले. आता वर दिलेला नानाचा पुर्वेतिहास पाहता नानाला अचानाक 'मराठी पंतप्रधान' का पाहिजेय, ते तुमच्या एव्हाना लक्षात आलच असेल. समझनेवालोँको इशारा काफी होता है. नानाची अवस्था सध्या झापड लावलेल्या घोड्यासारखी झालीय. काँग्रेस-एनसीपीच्या प्रेमात बुडाल्याने तो अशी बडबड करतोय. नाना पाटेकर ज्या 'मराठी पंतप्रधाना'कडे बोट दाखवतोय तो नेता कधीच पंतप्रधानपदाच्या आसपास देखील पोहोचला नाही. पंतप्रधान बनण्याची संधी मराठी माणसाकडे चालुन आली होती. राजापुर मतदारसंघाचे माजी खासदार मधु दंडवतेँकडे ती संधी चालुन होती आणि तत्वांच्या पुजा-याने ती विनम्रतापुर्वक नाकारली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर मागच्या दाराने राज्यसभेतुन निवडुन जात किँवा अन्य मतदारसंघातुन निवडणुक लढवुन पुन्हा निवडुन येत मधु दंडवते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. नाना ज्या नेत्याला पंतप्रधानपदी बसवु इच्छितो त्याच्याकडे ही संधी चालुन आली असती तर हव्या तशा राजकीय माकडउड्या मारुन पंतप्रधानपद पदरात पाडुन घेतले असते. मात्र तत्वांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिल्याने दंडवतेनी पंतप्रधानपद नाकारले. माझ्या लोकांनी माझा पराभव केला तेव्हा मी पंतप्रधानपदी बसणे योग्य नव्हे हे दंडवतेँनी अवघ्या देशाला दाखवुन दिले. मराठी माणुस पंतप्रधान बनु शकला नाही कारण पंतप्रधानपद नाकारण्यासाठी लागणारे मोठे मन आणि निःस्वार्थी व्रुत्ती मधु दंडवतेँकडे होती. आम्हाला पंतप्रधानपद न मिळाल्याचे अजिबात दुःख नाही कारण पंतप्रधानपद विनम्रपणे नाकारणारा नेता देशा अन्यत्र कुठेच सापडणार नाही. तत्वांना प्राणापेक्षा जास्त जपणा-या दंडवतेँचा पुढच्या कित्येक पिढ्यांना अभिमानच राहिल. दंडवतेँचा उल्लेख आम्ही 'नाना' असाच करायचो आणि आज हे असले स्वार्थी आणि मिँधेगिरी करणारे 'नाना पाटेकर' जन्माला आले आहेत. नानाने किमान नावाची लाज बाळगली असती तरी खुप झाल असत.

आता नाना ज्या तथाकथित जाणत्या राजाला पंतप्रधानपद मिळाल नाही म्हणुन दुःखी आहे त्याबद्दल बोलु. नानाला आठवण करुन देऊ इच्छितो की काही शतकांपुर्वी महाराष्ट्रात जाणता राजा होऊन गेला होता.

'निश्चयाचा महामेरु, बहुत जनासि आधारु'
अशी त्याची ख्याती होती. तुमचा तथाकथित जाणता राजा
'भ्रष्टाचाराचा महामेरु, बहुत चोरांसि आधारु'
एवढ्या एकाच कामासाठी देशात ओळखला जातो.
म्हणे मराठी माणसे आपल्याच माणसांचे पाय ओढतात. अरे जा, जाऊन विचार त्या आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना की याला तुम्ही पंतप्रधानपदी पाहु इच्छिता का...? जा तिकडे लवासामध्ये जमिनी हडपलेल्या आदिवासी लोकांकडे आणि विचार त्यांना याला पंतप्रधान करुया का...?? असल्या भ्रष्टाचारी नेत्यास पंतप्रधान केल तर उद्या देश विकुन खायलाही मागेपुढे पाहणार नाही अशीच यांची व्रुत्ती आहे. मराठी लोक मुळातच समजुतदार आहेत आणि असल्या भ्रष्ट नेत्याला पंतप्रधानपदासाठी कधीच समर्थन करणार नाहीत.

भ्रष्टाचारी लोकांच्या व्यासपीठावर जाऊन भ्रष्टाचारविरोधी भाषणे कसली देतोस...? काय तर म्हणे लोक षंड आहेत आणि ते भ्रष्टाचारी नेत्यांना जाब विचारत नाहीत.
अरे जाब विचारत नसतीलही पण तुझ्यासारखी लाज-लज्जा सोडुन भ्रष्टाचारी नेत्यांसोबत दिवसा-ढवळ्या फिरत तरी नाहीत. आणखी किती लाचार होशील...? तु ज्या तटकरे, राणे, पवारांसोबत फिरतोस ते कोणी साधुपुरुष आहेत का...?? मग त्यांना का विचारत नाहीस की बाबांनो लोकांना अजुन किती लुबाडणार आहात...??? तिकडे तुझी बोबडी वळत असणार कारण त्यांची तळी उचलण्यासाठीच आजकाल तुला भरपुर मलिदा मिळतोय.

चित्रपटात देशप्रेम उफाळुन आले म्हणुन तुझ्यासारखा मतलबी मनुष्य देशभक्त होत नसतो. तस असत तर आज संजय दत्त तुरुंगात जाण्याऐवजी गांधीवादाचे धडे देत फिरला असता. चित्रपटात गांधीँचे धडे दिले म्हणुन संजय दत्त गांधी बनत नसतो, तो आतंकवादीच राहतो. अरे तुमच्यासारख्या चार कवडीच्या नटांची लायकीच काय असते...? फक्त भारतात मुर्खाँची कमी नाही म्हणुन ते चित्रपटातल्या भुमिका बघुन तुझ्यासारख्या तीनपाट नटाला देशभक्त समजण्याची चुक करुन बसतात. यापुढे चित्रपटातुन लोकांना देशभक्तीचे धडे देण्यापेक्षा काँग्रेस-एनसीपीच्या नेत्यांचा अधिक्रुत भाट बनलास तर आणखी पैसे मिळतील. बर झाल लवकरच तुझे खरे रंग दाखवलेस ते...! चित्रपटातुन देशभक्तीची नौटंकी पुरे झाली. तु सोँगाड्या आहेस आणि सोँगाड्याच राहशील. या नौटंकीच्या जोरावर तु सगळ्या लोकांना काही काळासाठी मुर्ख बनवु शकशील किँवा काही लोकांना कायमस्वरुपी मुर्ख बनवु शकशील पण सगळ्या लोकांना कायमस्वरुपी मुर्ख बनवु शकत नाहीस. यापुढे जनमानसात तुझी ओळख 'नाना लावतोय चुना' अशीच केली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा