रविवार, ६ एप्रिल, २०१४

'राज'करण परिपक्वतेचे...!



'राज'करण परिपक्वतेचे...!

आजच्या घडीला राज्याच्या राजकरणात शरद पवारांनंतर राजकीय चाली खेळण्यात जर कोणाला विशारद प्राप्त असेल तर ते नाव राज ठाकरेँचे आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाल. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेँची प्रत्येक राजकीय चाल फसत चालली होती पण आज मात्र त्यांनी एका दगडात चार-पाच पक्षी मारुन स्वतःचे राजकरण पुन्हा एकदा स्थिर केले. आता कसे ते पाहु.

राज ठाकरेँनी महायुतीत सामील होण्याचा प्रस्ताव अनेकदा धुडकारला कारण त्यांना स्वतःची वेगळी अशी स्पेस सोडायची नव्हती. शिवसेनेला विरोध करत मनसेचा जन्म झाला होता. त्यामुळेच महायुतीत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावुन बसणे राजना कधीच शक्य नव्हते. राज यांचा एक डोळा विधानसभा निवडणुकांवरही होता. मात्र महाराष्ट्रात असलेल्या मोदीँच्या लाटेमुळे महायुतीत सामील न होण्याचा निर्णय राजवरच शेकला. मध्यंतरी आपला मराठीचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी राजनी मोदीँवर गुजराती लोकांच्या अनुषंगाने टिका केली पण राज यांची ती खेळीसुद्धा अंगलट आली. राज ठाकरे काँग्रेस-एनसीपीचे एजंट असुन महायुतीचे नुकसान करण्यासाठी घाणेरडे राजकरण करतात, हा समज जनसामान्यांमध्ये पसरु लागला. त्यामुळेच मनसेचा जनाधार कमी होऊ लागला. त्यात करुन आम आदमी पार्टी राज्यात तिसरा पर्याय म्हणुन उभी ठाकल्याने मनसेची स्पेस व्यापु लागली. मध्यंतरी टोलचे फसलेले आंदोलन, त्याला लोकांचा मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या सर्वाँचाच परिपाक होता. सर्व्हेमध्येही मनसेला धड 1-2 जागाही मिळत नव्हत्या. आता अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करुन त्यांचा सगळीकडे पराभव झाला तर त्याचा विधानसभेत निश्चितच वाईट परिणाम होणार होता. 'झाकली मुठ सव्वा लाखाची' म्हणत लोकसभेला उमेदवार उभे न करता थेट विधानसभा लढवणे हाच एक पर्याय राज समोर होता. निवडणुका लढवल्या नाहीत तर कार्यकर्ते फार काळ पक्षात टिकणार नाहीत याची राजना जाणीव होती. अशा रितीने राज ठाकरे सर्व बाजुंनी चक्रव्युहात अडकले होते.

त्या परिस्थितीतही त्यांनी नितीन गडकरीँसोबत असलेली जवळीक आणखी वाढवण्यासाठी सर्वप्रथम ते नाशिकला एका कार्यक्रमात गडकरीँसोबत एकत्र आले. नंतर पुन्हा गडकरीँना खाजगीत भेटले. महायुतीत सामील होण्याची दारे राज ठाकरेँनी स्वतःच बंद करुन घेतल्याने तिकडे पुन्हा प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे भाजपसोबतच्या या भेटीगाठी शिवसेना नेत्यांना वाकुल्या दाखवत त्यांना चिथावण्यासाठीच होत्या. सारासार विचार करण्याची कोणतीही कुवत नसलेल्या शिवसेना नेत्यांनी भाजप-राजच्या भेटीबाबत आकांडतांडव सुरु केले आणि आपोआप राजच्या जाळ्यात अडकले. राजला चक्रव्युहातुन बाहेर पडण्याचा मार्ग शिवसेनेनेच मोकळा करुन दिला. राजला जे पाहिजे होते ते मिळाले होते आणि त्याचाच प्रत्यय आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आला.

आज मनसेने लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर करुन एकच संदेश दिला की,
"भाजपने आपली मदत मागितली म्हणुन भाजपच्या उमेदवारांविरुद्ध मी माझे उमेदवार उभे करणार नाही. नरेँद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान व्हावेत ही माझी इच्छा आहे. मनसेचे निवडुन आलेले उमेदवार मोदीँनाच पाठिँबा देतील. याउलट देवु केलेली मदत उन्मतपणे धुडकारणा-या शिवसेनेविरुद्ध मनसे निवडणुक लढवुन आपली ताकद दाखवुन देईल."
या सर्व प्रकारात राज ठाकरेँनी मराठी लोकांची सहानुभुती पुन्हा एकदा मिळवली आहे. मोदीँना पाठिँबा जाहिर केल्याने काँग्रेस एजंट हा शिक्का आपोआप फुसला गेलाय. आता मोदीच्या लाटेचा फायदा थेट राज ठाकरेँनाही मिळणार आहे. निवडणुकीला मत देताना लोक एवढाच विचार करणार की उमेदवार शिवसेना किँवा मनसे कोणाचाही निवडुन आला तरी पाठिँबा मोदीँनाच देणार आहे. त्यामुळे मनसे उमेदवाराची मते नक्कीच वाढणार. शिवाय राज ठाकरे मोठ्या मनाने शिवसेनेला मदत करु पाहत होते पण अहंकारी शिवसेना नेत्यांनी ती मदत स्वीकारली नाही. त्यामुळे मराठी लोकांमध्ये शिवसेनेप्रती नक्कीच संताप असेल. थोडक्यात आपल्या आततायीपणाने निवडणुकांच्या तोँडावर शिवसेनेने कचाट्यात सापडलेल्या मनसेला फुकटची सहानुभुती मिळवुन दिली आहे.

सांगायची गोष्ट एवढीच की राजकरण कधीही संयमाने करावे लागते. इकडे कोणीच कोणाचा कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो. गडकरी-राज भेटीवर बोँब मारायची शिवसेनेला काहीच गरज नव्हती. इकडे राजने समर्थनासाठी कोणत्या अटी पुढे केल्या नव्हत्या किँवा महायुतीत येण्यास उत्सुकताही दाखवली नव्हती. या भेटीनंतर संयम दाखवत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसती तर राजच्याच अडचणी वाढल्या असत्या. राजला एकट्या शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे करण्याची चाल खेळताच आली नसती. राज आणि मोदीँचे चांगले संबंध ही गोष्ट उघड होती. फक्त तोँडदेखली टिका ते मोदीँवर करत होते. त्यामुळे भाजपविरुद्ध राज ठाकरे एरव्ही उमेदवार उभे करणारच नव्हते. त्यामुळे एकट्या शिवसेनेविरुद्ध मनसेचे उमेदवार उभे करणे राजना धोरणात्मकरित्या अवघड होणार होते. राजच्या भाजपशी असलेल्या याच जवळकीचा शिवसेनेने फायदा करुन घेणे गरजेचे होते पण शेवटी बोँबाबोँब करुन यांनी आपल्याच पायावर धोँडा मारुन घेतला. उद्धवजीँच्या आसपास जे थिँक टँक म्हणुन फिरतात त्यांची टाळकी तपासण्याची वेळ आली आहे.

राजकरण करणा-याने प्रत्येक पायरीवर धुर्त आणि धोरणी असणे अत्यावश्यक असते. घडणा-या प्रत्येक घटनेचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करुन घेता येईल हे ज्याला कळते तोच राजकरणात टिकतो. डार्विनचा Survial to the fittest सिद्धांत राजकरणालाही लागु पडतो.
ज्याच्याकडे धुर्तपणा नाही, राजकीय चाली ओळखण्याची कुवत नाही तो पक्ष किँवा नेता काळाच्या ओघात संपत जातो. बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करुन उभारलेली शिवसेना हिँदुत्वाच्या रक्षणाखातर टिकलीच पाहिजे. फक्त शिवसेना कुठे चुकते आहे हे दाखवण्यासाठी हा लेख लिहिला. शिवसेना नेते आपले राजकरण भविष्यात सुधारतील अशी अपेक्षा करुया.

"एकच साहेब, बाळासाहेब...!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा