गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

...तर इतिहास तुम्हाला जाब विचारेल

कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवतेँचा जेव्हा 1991 साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तेव्हा जेमतेम मी 1 वर्षाचा असेन. तोँडातुन बोबडे बोल देखील बाहेर पडत नव्हते. जेव्हा 20 वर्षाँचा झालो, कोकणचा राजकीय इतिहास वाचनात आला तेव्हा मीच घरच्यांना प्रश्न विचारला-

"बाबा, दंडवतेँसारखा कर्मयोगी निवडणुकीत कसा पराभुत होऊ शकतो...? एका सभ्य, विद्वान आणि मुख्य म्हणजे कोकण रेल्वे सत्यात उतरवणा-या कार्यक्षम खासदाराला नाकारण्या इतपत तुमची पिढी कशी काय बेईमान होऊ शकते...??"

मला उत्तर देताना बाबा शांतपणे म्हणाले-
"दंडवतेँना आमच्या पिढीने पराभुत केल ही खरी गोष्ट आहे. हेही खर की दंडवतेना निवडुन आणण्यात आमचे प्रयत्न अपुरे पडले. तु आमच्या पिढीकडे बोट दाखवु शकतोस पण मला किँवा घरच्यांना आणि आमच्यासारख्या दंडवतेँच्या अनेक कार्यकर्त्याँना जाब विचारु शकत नाहीस. दंडवतेँना निवडुन आणण्यासाठी एकही पैसा न घेता उन्हात किती मैल सायकल चालवुन प्रचार केला असेल याचा हिशेब आता आमच्याकडे नाही पण दंडवतेँच्या प्रचारासाठी रक्ताच पाणी केल एवढ मात्र नक्की...!दुर्देवाने या जगात बहुतांश वेळा सज्जनशक्तीचे प्रयत्न दुर्जनशक्तीसमोर अपुरेच पडतात. याचा अर्थ प्रयत्न करायचेच नाहीत असा होत नाही. त्यावेळी दंडवतेँना निवडुन आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले म्हणुनच आज तुला ताठ मानेने सांगु शकतो की दंडवतेँना पाडण्याच 'पाप' कोकणात ज्या लोकांनी केल त्या 'पापाचे भागीदार' आम्ही नव्हतो."

बाबांचे ते शब्द मला खुप काही शिकवुन गेले. त्यावेळीच मनाशी एक गोष्ट पक्की केली होती की कोकणच राजकरण पुन्हा पुर्वपदावर आणायच असेल तर दंडवतेँसारखा सभ्य, अभ्यासु आणि आपल्या भाषणांनी संसद गाजवणारा 'संसदपटु' कोकणचा खासदार बनवायला हवा. नंतर पाठिँबा देण्यासाठी 'दंडवतेँचा वारसदार' कोण बनु शकेल अशा नेत्यांचा शोध सुरु केला. तेव्हा घरातल्यांनीच उत्तर दिले दंडवतेँचा वारसदार शोधायची गरज नाही. सुरेश प्रभु हेच दंडवतेँचे खरे वारसदार आहेत. पण मला राजकरण समजेपर्यँत 2009 च्या निवडणुकीत दंडवतेँच्या वारसदाराचा म्हणजे सुरेश प्रभुंचा पराभव झाला होता.

तीन वर्षापुर्वी राजकरणाशी माझा काडीचाही संबंध नव्हता पण कोकणच्या मातीला वाचवण्याची इच्छा मनात कुठेतरी प्रबळ होत होती.'इच्छा तेथे मार्ग' उक्तीचा प्रत्यय माझ्या बाबतीत आला आणि फेसबुकच्या रुपात विचार मांडण्याच मोठ व्यासपीठ माझ्या मदतीला आल.

अस म्हणतात, इतिहासाची पुनरावव्रुत्ती होत असते. जे 1991 साली दंडवतेँच्या बाबतीत झाल, तोच इतिहास 2009 साली सर्वोत्क्रुष्ट केँद्रीय मंत्र्यांपैकी एक म्हणुन देशभरात नावाजलेल्या प्रभुंच्या नशीबी आला. प्रभुंचा निवडणुकीत पराभव झाला पण अवघ्या पाच वर्षात प्रभुंविना कोकणचे काय हाल होतील याची लोकांना जाणीव झाली. यंदा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कोकणची जनता आपली चुक सुधारुन सुरेश प्रभुंना निवडुन देणार याची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली होती आणि अचानक शिवसेनेत माशी शिँकली. प्रभुंना शिवसेनेकडुन पक्षाच तिकीट मिळणार नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. मला कोकणच्या राजकीय इतिहासातील चुक सुधारायची होती. दंडवतेँच्या वेळी माझ्या घरचे हतबल असतील पण प्रभुंच्या बाबतीत मी हतबल नव्हतो. फक्त यावेळी लढाई प्रभुंचे तिकीट कापु पाहणा-या शिवसेनेतील स्वकीयांशी होती आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठीच लेखणीचे शस्त्र वापरण्याचा निर्धार मी केला. प्रभुविरोधकांविरुद्ध शाब्दिक तोफ धडाडल्यानंतर साहजिकच मतदारसंघातुन प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रभुंना भाजप, मनसे, एनसीपीचा पुर्ण पाठिँबा आहे. अगदी काँग्रेसचे काही कार्यकर्ते प्रभुंना छुपा पाठिँबा देतात. प्रभुंना विरोध होतोय तो त्यांच्याच पक्षातुन...! शिवसेनेत तीन भिन्न मतप्रवाह आहेत. बहुतांश शिवसैनिकांना पक्षहितासाठी विजयाची खात्री असलेले प्रभु उमेदवार म्हणुन पाहिजे आहेत, कट्टर शिवसैनिक पक्षाने दगड दिला तरी निवडुन देऊ या भावनेने काम करतायेत आणि जे प्रभुंच्या उमेदवारीला विरोध करतायेत त्यांची एकच तक्रार आहे-

"प्रभु निवडणुकांवेळी कार्यकर्त्याँना पैसे देत नाहीत."

मला या शिवसैनिकांना अजिबात दोष द्यायचा नाही. आज त्यांच्यासारखे भगव्यासाठी रक्त देणारे शिवसैनिक आहेत म्हणुनच शिवसेना पक्ष मानाने उभा आहे. शिवाय घरात बसुन लेख लिहिणा-या माझ्यासारख्या लोकांना पक्षासाठी उन्हातान्हात भटकणा-या शिवसैनिकांची व्यथा कशी काय समजणार...? ज्या शिवसैनिकांचा चरितार्थ राजकरणावर अवलंबुन आहे त्या शिवसैनिकांना प्रभुंनी पैसा पुरवायलाच हवा या मताचा मी आहे.2009 च्या निवडणुकीत प्रभुंनी कार्यकर्त्याँना पैसा दिला नसेलही पण एवढ्या एका कारणासाठी त्यांना विरोध करायचा का...? कोकणात राणे कुटुंबीय आणि काँग्रेसला मुळापासुन उखडुन टाकत भगवा मानाने फडकवणे हे माननीय बाळासाहेबांचे अधुरे स्वप्न होते. प्रभुंना तिकीट दिल्यावर काँग्रेसचा नक्की पराभव होतोय आणि भगवा फडकवुन बाळासाहेबांचे स्वप्न देखील पुरे होतेय. अशा परिस्थितीत बाळासाहेबांच्या स्वप्नाला निवडणुकीतुन मिळणा-या पैशासाठी बगल देणे कितपत योग्य आहे याचा विचार एकदा करावाच लागेल. यंदाच्या निवडणुकीत प्रभुंचा विजय निश्चित असल्याने कार्यकर्त्याँवर कराव्या लागणा-या खर्चाची बोलणी प्रभुंना तिकीट देताना समोरासमोर बसुन करता येऊ शकते पण प्रभुंना तिकीट न देण्याचा टोकाचा निर्णय घेणे हा पर्याय असु शकत नाही.

प्रभुंच्या विजयाची राजकीय गणितं मी याअगोदरच्या लेखात मांडली आहेत आणि सिँधुदुर्गातील कित्येक पत्रकारांनाही ती ज्ञात आहेत. तरीही राणेँच्या भितीने म्हणा किँवा त्रयस्थाच्या भुमिकेत शिरल्यामुळे खाजगीत 'प्रभुच उमेदवार पाहिजेत' म्हणणा-या कोणत्याही पत्रकाराने आजतगायत वर्तमानपत्रात आपली भुमिका मांडलेली नाही. आज फेसबुकवरील माझ्या लेखांप्रमाणे वर्तमानपत्रात कोणीतरी पत्रकाराने लेख लिहुन शिवसेना पक्षश्रेष्ठीँना ग्राऊंड लेवलची जाणीव करुन देणे गरजेचे होते. जनतेचा काँग्रेसच्या उमेदवाराला तीव्र विरोध आहे याचा अर्थ असा नव्हे की शिवसेना कोणताही उमेदवार आमच्यावर लादेल आणि काँग्रेसला विरोध करण्यासाठी लोक झक मारत का होईना शिवसेनेच्या उमेदवाराला नंदीबैलाप्रमाणे माना डोलावतील. बाळासाहेबांप्रमाणे शिवसेना पक्षानेही कोकणच्या लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सुरेश प्रभूच शिवसेनेचे उमेदवार व्हावेत हिच जनसामान्यांची भावना आहे. मध्यंतरी संतापलेल्या लोकांना शांत करण्यासाठी प्रभुंना राज्यसभेवरुन खासदारकी देण्याच्या गोष्टी शिवसेनेकडुन केल्या जात होत्या. वेणुगोपाल धुत यांना राज्यसभा बहाल करुन सेनेने इकडेही लोकांच्या तोँडाला पाने पुसली आहेत.

केँद्रात मोदीँच सरकार येणार हे सांगायला आता कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. आपल्या कारकिर्दीत ऊर्जा आणि पर्यावरण खाते गाजवणा-या प्रभुंना मोदीसरकारमध्ये कँबिनेट दर्जाच महत्वाच खात मिळणार हेही निश्चितच आहे. 2002 नंतर तब्बल 12 वर्षानी कोकणच्या नशीबात केँद्रीय मंत्रीपदाचा योग आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर कोकण प्रांताचा होणारा विकास असा नजरेसमोर दिसतोय. अशा वेळी आपण सर्वाँनी शिवसेनेने प्रभुंनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षाकडे धरायला हवा. इतिहास चुक सुधारायची दुसरी संधी कोणालाच देत नसतो. दंडवतेँच्या राजकीय अस्तानंतर कोकणने खुप काही गमावले आहे आणि आता प्रभुंचा राजकीय अस्त उघड्या डोळ्यांनी बघण कोणालाच परवडणार नाही. 4 फेब्रुवारील शिवसेना उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक संपर्क, फोन, पत्र, ईमेल वाट्टेल त्या माध्यमातुन शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख यांची भेट घ्या. त्यांना आम्हाला प्रभुच उमेदवार पाहिजेत अन्यथा मत मागायला येऊ नका ही गोष्ट ठासुन सांगा. गेले 2 महिने मी प्रभुंचा प्रामाणिकपणे प्रचार केला, मला शक्य असेल त्या सर्व मार्गाँनी प्रभुंना उमेदवारी मिळवुन देण्याचा प्रयत्न केला, तरी सेनेने प्रभुंना उमेदवारी दिली नाही तर मला वैयक्तिक अपराधी वाटण्याचे काहीच कारण नाही. माझ्या प्रयत्नात कुठेही कसुर झालेली नाही. अगदी बाजी प्रभुंसारखी दोन्ही हातात शब्दांच्या तलवारी घेऊन एकट्याने शेवटपर्यँत खिँड लढवली.भविष्यात माझा पोरगा मला विचारेल की,
"तुमच्या पिढीने प्रभुंसारखे विद्वान शिवसेनेत एकटे पडलेले असताना त्यांना पाठिँबा का दिला नाही...?"
तेव्हा माझ्या वडीलांसारखेच मी माझ्या मुलाला अभिमानाने उत्तर देऊ शकेन की,
"बेटा, प्रभुंना उमेदवारी मिळावी म्हणुन मी एकट्याने झुंज दिली होती."

मित्रांनो, तुम्ही पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आहात...? प्रभुंची उमेदवारी सेनेकडुन काढुन घेतली जात असताना आम्ही शंडासारखे गप्प बसलो...?? नाही ना...??? मग अजुन चार दिवस शिल्लक आहेत. प्रभुनामाचा जप करुन शिवसेना नेत्यांना खडबडुन जागे करा. इतिहास घडवण्याची संधी वारंवार मिळत नसते. आपण एका ऐतिहासिक निवडणुकीचे जीवंत साक्षीदार असणार आहोत हे ध्यानात असु द्या.

लेखाच्या शेवटी 23 जानेवारीला प्रतिज्ञा करायला गेलेल्या शिवसेना तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुखांना एवढच सांगेन की बाळासाहेबांशी केलेल्या प्रतिज्ञेला जागा. त्वरित सेनाभवनात तिकीट वाटपासाठी बसलेल्या पक्षश्रेष्ठीँना मतदारसंघातील लोकांच्या प्रभुंप्रती असलेल्या भावना कळवा. प्रभुंना लोकसभेचे तिकीट मिळाले तर चिँता नसावी. विजय आपलाच आहे...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा