सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

लेखांची माळ तुटली, भावना गुंतलेल्याच आहेत...!

कालच कणकवलीमध्ये तरुण भारतचा 'गुरवे नमः' सदराच्या निरोपाचा सोहळा पार पडला. काँलेजवाल्यांच्या कटकटीने कणकवली गाठु शकलो नाही. सोहळ्याला उपस्थित राहु शकलो नाही याच नक्कीच वाईट वाटतेय पण त्याहीपेक्षा अविनाश धर्माधिकारी सरांसारख्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्त्याचे विचार ऐकु शकलो नाही याच दुःख होतय.

आजच्या तरुण भारतमधील मेळाव्याला जमलेल्या श्रोत्यांचा फोटो पाहिला आणि मनातल्या मनात विजय शेट्टीँना सलाम ठोकला. एक पत्रकार म्हणुन विजय शेट्टी किती सरस आहेत हे वेगळं सांगायला नको पण कालच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील सर्वोत्क्रुष्ट आयोजकांमध्ये विजय शेट्टीँच नाव सामील झालय. 'गुरवे नमः' समारोप सोहळ्याच्या अगोदर पंधरा दिवस कार्यक्रमाच मार्केटिँग कस करायच असत याची शेट्टीँनी केलेली रचनाबद्ध आखणी भारावुन टाकणारी होती. आम्हाला एमबीए मार्केटिँगमध्ये शिकवले जाणारे कन्सेप्ट शेट्टीँनी पत्रकार पेशात राहुन प्रत्यक्षात आणुन दाखवले. खरच एका एमबीएच्या विद्यार्थ्याला लाजवेल असच विजय शेट्टीँच नियोजन होत. खास करुन रविवारच्या 'तरुण भारत'मध्ये विजय शेट्टीँनी लिहिलेला समारोपाचा लेख थेट भावनांना हात घालणारा होता. 'अश्रुंची झाली फुले' म्हणता म्हणता अलगद डोळ्यात अश्रु आणणारा होता. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात लोकांना प्रत्यक्ष सहभागी करुन घ्यायची किमया तरुण भारतने केली. 'गुरवे नमः' सदरात 382 लेख प्रसिद्ध झाले. म्हणजेच सिँधुदुर्गच्या कानाकोप-यात शिक्षणाचे पवित्र कार्य पार पाडत असलेल्या 382 गुरुंची संपुर्ण जिल्ह्याला ओळख झाली आणि त्या सर्वाँनाच एखाद्या पुरस्कारापलीकडचा पुरस्कार प्राप्त करुन दिला. महत्वाचे म्हणजे सामान्यातील सामान्य लोकांनी वर्तमानपत्रात व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. आपल्या लेखणीतुन गुरुप्रती असलेल्या भावना कागदावर उतरवल्या. या 382 पुष्पांपैकी 3 पुष्पे मी माझ्या गुरुंना अर्पण केली होती आणि शेवटच्या श्वासापर्यँत मला त्याचा अभिमानच राहिल. विजय शेट्टी या अवलिया पत्रकाराला, आयोजकाला मनापासुन धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा