सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

"रस्त्यावरच पोस्टर काढाल,
लोकांच्या मनातुन वैभवला कसा बाहेर काढणार...?"




सिँधुदुर्गात नक्की पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीत काँग्रेस समर्थक वावरतायेत तेच कळायला मार्ग नाही. कट्ट्यात वैभव नाईकांचा बँनर हटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. याअगोदरही कणकवलीत शिवाजी चौकात भाजपचा 'नमो नमन करुया' बँनर फाडला होता, कुडाळ प्रवेशद्वारावर लावलेला मनसेचा बँनर फाडण्याचा प्रयत्नही काही अज्ञातांनी केला. आता हे 'अज्ञात कार्यकर्ते' नेमके कोणाचे आहेत, हे वेगळ सांगायची गरज नाही. पक्षीय तेढ निर्माण करणा-या समाजकंटकांना अटक करुन शिक्षा करणे खुप दुरच राहिले, आता पोलिसयंत्रणा स्वतःच विरोधी पक्षांचे बँनर उतरवु पाहतायेत. पोलीसच सत्ताधा-यांना झुकते माप देणार असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडुन करायची...?

'पायाखालची वाळु सरकली की पक्षाचा तोल ढासळतो.' सध्या सिँधुदुर्गातील काँग्रेसची तशीच काहीशी बिकट अवस्था झाली आहे. त्यांना एवढच सांगु इच्छितो की,

'कोँबड झाकल म्हणुन सूर्य उगवायचा राहत नाही.'

त्यामुळे पोलिसांच्या मदतीने वैभव नाईकांचे बँनर हटवलात म्हणुन वैभव नाईकांना विधानसभा जिँकण्यापासुन तुम्ही रोखु शकणार नाही. गेली 10 वर्षे काँग्रेस सरकारने जी कुकर्म केली आहेत त्यांचा हिशेब चुकता करण्यासाठी लोक निवडणुकांची आतुरतेने वाट बघतायेत. येत्या निवडणुकांमध्ये सिँधुदुर्गची सुज्ञ जनता काँग्रेसला आडव पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यात विरोधकांचे बँनर हटवण्याच्या भ्याड कारवाया केल्यात तर उरलीसुरली मतेही गमावुन बसाल.

जे पोस्टर तुम्ही हटवु पाहत होता ती इतक्या दिवसात वैभवने सामान्य लोकांसाठी रस्त्यावर संघर्ष देऊन केलेली आंदोलने होती. म्हणुनच पोस्टरमधील आंदोलनाच्या छायचित्रांनी बिथरल्यानंतर ते पोस्टर हटवण्याचा घ्रुणास्पद प्रयत्न तुम्ही पोलिसांच्या मदतीने केला. अरे मुर्खाँनो, पोस्टर हटवाल पण वैभवने केलेल्या आंदोलनांच काय...? त्या आंदोलनांमुळेच वैभवने लोकांच्या मनात घर केले आहे. सिँधुदुर्गातील जनतेला वैभव नाईक आपलासा वाटु लागलाय आणि येत्या निवडणुकांमध्ये या आपुलकीचे रुपांतरच मतांमध्ये होणार आहे. आता लोकांच्या मनातुन वैभवला कसे हटवणार..??

काँग्रेसचा पराभव निश्चित झाला आहे त्यामुळे असली भ्याड क्रुत्ये करण्यापेक्षा मोठ्या मनाने पराभवाचा स्वीकार करा. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो.


वैभव नाईक, तुम्हाला 'लढ' म्हणा अस सांगायची गरज मला वाटत नाही कारण मला खात्री आहे की लढण्याचा गुण तुमच्या रक्तातच आहे. आज तुम्हाला 'सिँधुदुर्गचा ढाण्या वाघ' ही उपाधी जनतेनेच बहाल केली आहे. कणकवलीत तुमच्या एका डरकाळीने कधीकाळी कोकणात वाघ बनुन फिरणारे आता उंदीर बनुन बिळात जाऊन लपतात.

फारच थोड्या कालावधीत तुमच्या स्वभावाचा आणखी एक गुण माझ्या लक्षात येतोय की आंदोलन करताना तुमच्या स्वभावात जाणवणारी आक्रमकता इतर वेळी चुकुन सुद्धा दिसुन येत नाही. आंदोलन करताना शत्रुच्या अंगावर धावणारा वैभव इतर वेळी मात्र शांत, मनमिळाऊ आणि मुख्य म्हणजे सामान्यातल्या सामान्याशी आदराने बोलतो. राजकीय व्यक्तीँमध्ये हमखास आढळणारा अहंकार तुमच्या सावलीत सुद्धा दिसत नाही. कदाचित याच गुणामुळे तुम्ही लोकांना आपलेसे वाटत राहता. राजकरणात पुढे कितीही मोठी पदे मिळालीत तरी सामान्याशी जोडलेली ही नाळ अशीच सोबत ठेवा.
तुमच पुर्ण आयुष्यच समरांगण झालय आणि या लढाईत मी तुमच्या 'मागे' नाही तर खांद्याला खांदा देऊन तुमच्या 'सोबत' आहे. ही लढाई एवढ्यात संपणार नाही. बाळासाहेबांच्या जीवावर मोठे होऊन पुढे गद्दारी करणा-या खानदानाचा संपुर्ण राजकरणातुन बिमोड करत नाही तोपर्यँत ही लढाई चालुच राहिल. भविष्यात "जिल्हाप्रमुख वैभव नाईक" हे वाचण निदान मला तरी आवडणार नाही. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय जेव्हा या फोटोच्या खाली अभिमानाने लिहिलेले असेल-

"माननीय आमदार वैभवजी नाईक..."

इरादा आहे पक्का,
यंदाच देऊ धक्का...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा