रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

नाते अपुले गुंतागुंतीचे...


आजकाल मुल-मुली जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा त्या नात्यावर चित्रपट किँवा डेली सोप सिरीयलचाच प्रभाव जास्त पडलेला दिसतो. प्रेमात असताना पडद्यावरील एखादी जोडी आपल्याला आदर्श वाटु लागते आणि आपल्यातील प्रेम देखील अगदी त्याच जोडीप्रमाणे फुलत जावे, अशी भाबडी आशा वाटते. दुर्देवाने पडद्यावरील जोड्या पाहणं आणि ख-या आयुष्यातील प्रेम निभावण यात जमीन आसमानाचा फरक असतो. नात हे कधीही फिल्मी असु शकत नाही. आपल नात फुलवण्यासाठी जितके शक्य असेल तितके प्रयत्न अवश्य करावे पण ते अगदी चित्रपटातील नात्याप्रमाणे आदर्शच असायला हवे हा अट्टाहास करु नये. नात आदर्श बनवण्याच्या नादात ते तुटण्याचीच शक्यता जास्त असते.चित्रपटात प्रियकर-प्रेयसीचे एकमेकांशी भांडण, नंतर प्रेयसीने रुसण आणि मग प्रियकराने तिची समजुत काढण हे पडद्यावर खुप रोमँटिक वाटत. आता तोच रोमान्स ख-या आयुष्यात अनुभवण्यासाठी तुम्ही कारण नसताना भांडण कराल तर प्रत्येक वेळी रुसल्यावर प्रियकरच येऊन समजुत काढेल ही अपेक्षा करणे चुकीचे.
काही जोडप्यांची एकमेकांमध्ये जितकी जास्त भांडण होतील तितक आपल एकमेकांवर जास्त प्रेम आहे, अशी भंपक समजुत झालेली असते. चित्रपट पाहुन असले मुर्खासारखे निष्कर्ष काढु नका. तुमच्यात सतत भांडणे होत असतील तर तुमच्या दोघांची मानसिकता पुर्णपणे विरुद्ध दिशांना जाणारी आहे आणि अशी नाती फार काळ टिकत नाहीत. अनेकदा स्वभावात साम्य नसल,अगदी परस्परविरोधी स्वभाव असले तरी काही जोडपी सुंदरपणे नात निभावुन नेतात कारण त्यांच्यात प्रेम निभावण्यासाठी लागणारे सामंजस्य असते आणि या सामंजस्यामुळेच त्यांच्यातील प्रेम उत्तरोत्तर वाढत जाते.कुठल्याही नात्यात प्रेयसीच्या मित्रावरुन किँवा प्रियकराच्या मैत्रीणीवरुन संशय घेत काही लोक विनाकरण भांडण करत स्वतःला मानसिक त्रास करुन घेतात. त्यापेक्षा अंतर्मुख होऊन अशा फालतु गोष्टीँना विनाकारण महत्व देत दोघांनाही मनस्ताप करुन घेण्यापेक्षा नात्याला जास्त महत्व देणे केव्हाही चांगले. तुम्हाला तिच्या सानिध्यात आल्यावर पुर्ण समाधानी, मोकळ, सुरक्षित आणि आनंदी वाटत असेल तर तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे अस समजायला काहीच हरकत नाही. प्रेमात आपल्यासाठी आपल्या जोडीदाराने बदलाव ही अपेक्षाच करण मुळी चुकीच असत कारण जोडीदार आहे तसा स्वीकारला जातो तेव्हा त्या नात्याचा पाया अधिक घट्ट झालेला असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा गुणदोषांसकट केलेला स्वीकार त्या नात्याच्या खरेपणावर शिक्कामोर्तब करतो. अशावेळी ते नात आपोआप फुलत राहत. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे गुण-दोष सगळ काही माहित असत आणि त्याचमुळे प्रत्येक गोष्टीवर सामंजस्याने तोडगा काढण्यास मदत होते.एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारल्यामुळे परस्परांबाबत लागणारा आदर आपोआप मिळतो. नात्यामध्ये परस्परांबाबतची मत, जाणीवा, आचारविचार यांचा आदर राखण फार महत्वाच असत. एखाद्या प्रसंगी आपला जोडीदार कसा रिअँक्ट होईल हे ग्रुहीत धरलेल असेल तर बहुतांश वेळा तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. केवळ जोडीदारामुळे तुम्हाला तुमची स्वप्न, करिअर, प्राधान्यक्रम बदलावे लागत असतील तर तुम्ही त्या नात्यात वाहवत चालला आहात. म्हणुनच सांगतो जेव्हा तुम्हाला स्वतःला कुणासाठी बदलाव लागत नाही तेव्हा तुम्ही परमेश्वराने तुमच्यासाठी बनवलेल्या जोडीदारासोबत आहात याची खात्री बाळगावी. आयुष्यात प्रत्येकालाच ज्यांना आपल मानाव अशी माणस भेटतातच असे नाही. काही वेळा आपली माणस भेटतात पण आयुष्यभरासाठी आपली साथ न देता अर्ध्यावरच सोडुन जातात. त्यामुळे तुमच्या सुदैवाने तुम्हाला कोणी सुयोग्य जोडीदार भेटला असेल तर खुळचट फिल्मी कल्पनांनी त्याला तुम्ही गमावु नये यासाठीच हा लेख लिहायचा प्रपंच केला कारण आयुष्यात काही खास नात्यांमुळे निर्माण झालेल्या पोकळ्या कधीच भरुन येत नसतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा